शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 00:52 IST

कोपरगाव : निळवंडे धरणाचे कालवे तातडीने पूर्ण करावेत, हा प्रकल्प पंतप्रधान सिंचन योजनेत समाविष्ट करावा व लाभक्षेत्रातील १८२ अवर्षणग्रस्त गावांना प्रथम प्राधान्याने पाणी द्यावे

कोपरगाव : निळवंडे धरणाचे कालवे तातडीने पूर्ण करावेत, हा प्रकल्प पंतप्रधान सिंचन योजनेत समाविष्ट करावा व लाभक्षेत्रातील १८२ अवर्षणग्रस्त गावांना प्रथम प्राधान्याने पाणी द्यावे, या मागण्यांसाठी निळवंडे कालवा कृतिसमितीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे केंद्र व राज्य सरकारला नोटिसा बजाविण्यात आल्याची माहिती विक्रांत काळे व नानासाहेब जवरे यांनी दिली. निळवंडे धरणाचे काम पूर्ण होऊन २००८ पासून त्यात पाणी साठविण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या नियमानुसार धरणाच्या भिंतीबरोबरच कालवे व वितरणव्यवस्था होणे अभिप्रेत होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी जलसंपदा विभागावर दबाव आणून भिंतीचे काम पूर्ण केले. पण, उजवा व डाव्या कालव्यांसह वितरणव्यवस्था अपूर्ण ठेवली. वरील १८२ गावांना पाणी मिळावे, म्हणून कृतिसमितीने अनेकदा आंदोलने केली. केंद्र सरकारच्या वेगवर्धित सिंचन प्रकल्पात याचा समावेश करण्यासाठी १७ प्रकारांच्या मान्यता मिळविल्या. तरीही राज्य सरकारकडून स्टेट फायनान्स क्लिअरन्सद्वारे २० टक्केरकमेची हमी मिळाली नाही. त्यामुळे समितीने अ‍ॅड. अजित काळे यांच्यामार्फत ५ आॅक्टोबरला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी १० आॅक्टोबरला होऊन न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला नोटिसा बजाविल्याचे काळे व जवरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, राहूरी व सिन्नर या ७ तालुक्यांतील १८२ गावे अवर्षणग्रस्त असून, सततच्या दुष्काळाने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे स्थलांतर होत आहे. मुबलक शेती असूनही शेतकऱ्यांना मोलमजुरीसाठी जाणे भाग पडत होते. त्यामुळे शासनाने १९७० साली या गावांमधील ६४ हजार २६० हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी निळवंडे धरण मंजूर केले.