शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
5
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
6
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
7
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
8
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
9
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
10
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
11
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
12
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
13
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
14
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
15
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
16
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
17
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
18
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
19
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
20
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!

सरकारला नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 00:52 IST

कोपरगाव : निळवंडे धरणाचे कालवे तातडीने पूर्ण करावेत, हा प्रकल्प पंतप्रधान सिंचन योजनेत समाविष्ट करावा व लाभक्षेत्रातील १८२ अवर्षणग्रस्त गावांना प्रथम प्राधान्याने पाणी द्यावे

कोपरगाव : निळवंडे धरणाचे कालवे तातडीने पूर्ण करावेत, हा प्रकल्प पंतप्रधान सिंचन योजनेत समाविष्ट करावा व लाभक्षेत्रातील १८२ अवर्षणग्रस्त गावांना प्रथम प्राधान्याने पाणी द्यावे, या मागण्यांसाठी निळवंडे कालवा कृतिसमितीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे केंद्र व राज्य सरकारला नोटिसा बजाविण्यात आल्याची माहिती विक्रांत काळे व नानासाहेब जवरे यांनी दिली. निळवंडे धरणाचे काम पूर्ण होऊन २००८ पासून त्यात पाणी साठविण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या नियमानुसार धरणाच्या भिंतीबरोबरच कालवे व वितरणव्यवस्था होणे अभिप्रेत होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी जलसंपदा विभागावर दबाव आणून भिंतीचे काम पूर्ण केले. पण, उजवा व डाव्या कालव्यांसह वितरणव्यवस्था अपूर्ण ठेवली. वरील १८२ गावांना पाणी मिळावे, म्हणून कृतिसमितीने अनेकदा आंदोलने केली. केंद्र सरकारच्या वेगवर्धित सिंचन प्रकल्पात याचा समावेश करण्यासाठी १७ प्रकारांच्या मान्यता मिळविल्या. तरीही राज्य सरकारकडून स्टेट फायनान्स क्लिअरन्सद्वारे २० टक्केरकमेची हमी मिळाली नाही. त्यामुळे समितीने अ‍ॅड. अजित काळे यांच्यामार्फत ५ आॅक्टोबरला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी १० आॅक्टोबरला होऊन न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला नोटिसा बजाविल्याचे काळे व जवरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, राहूरी व सिन्नर या ७ तालुक्यांतील १८२ गावे अवर्षणग्रस्त असून, सततच्या दुष्काळाने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे स्थलांतर होत आहे. मुबलक शेती असूनही शेतकऱ्यांना मोलमजुरीसाठी जाणे भाग पडत होते. त्यामुळे शासनाने १९७० साली या गावांमधील ६४ हजार २६० हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी निळवंडे धरण मंजूर केले.