शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शासनाच्या विरोधात नसून सोबतच : सयाजी शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 13:53 IST

महाराष्टÑ शासन वृक्ष लागवडीचे काम तळमळीने करते आहे. त्यांचे काम सर्वांनीच बघायला हवे. मी शासनाच्या विरोधात नसून त्यांच्या सोबतच आहे.

संगमनेर : महाराष्टÑ शासन वृक्ष लागवडीचे काम तळमळीने करते आहे. त्यांचे काम सर्वांनीच बघायला हवे. मी शासनाच्या विरोधात नसून त्यांच्या सोबतच आहे. मागे जे काही बोललो ते कुठल्याही हेतूने बोललो नव्हतो. त्यात कुठलाही स्वार्थ नव्हता. वाईट इतकेच वाटते की, कालपरवा पर्यंत जे चांगले बोलत होते. ते बोलेनासे झाले. मी एवढेच बोलेन, कागदोपत्री झाडे लावू नका. तर एखादे झाड लावून त्याच्याबरोबर सेल्फी घ्या, असे प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीवेळी म्हणाले.सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या वतीने व्यापक प्रमाणात वनीकरण, जलसंधारणाची कामे गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील विविध भागात खास करून अवर्षणप्रवण भागात होत आहेत. या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील डोंगरावर दोन वर्षांपूर्वी २६ हजार रोपे लावण्यात आली. या रोपांची योग्य वाढ झाली असून त्या रोपांचा दुसरा वाढदिवस अभिनेते शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी साजरा करण्यात आला. कार्यक्रमानंतर त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिलखुलास चर्चा केली.अभिनेते शिंदे म्हणाले, नेहमी तेच तेच काम करून एकसुरीपणा येतो. मग कंटाळा देखील येतो. त्यातूनच असे जाणवले की झाडांची भाषा ही महान भाषा आहे. झाडांजवळ गेल्यास आपल्याला आनंदच मिळतो. ते तपश्चयेर्ला बसलेले ॠ षीमुनीच वाटतात. वृक्षारोपणाचे काम केवळ मीच करत नसून अनेक जण या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचेही कौतुक आपण करायला हवे. झाडांसारखे निस्वार्थी कोणीही नाहीत. म्हणून झाडांवर प्रेम करा, झाडे लावा. त्यांच्या इतका आनंद तुम्हाला कोणीच देणार नाही. झाडे आपल्याला कधीच फसवत नाहीत. असेही ते म्हणाले.जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत, डॉ. सुनीता राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यकम्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वसंत बंदावणे, शाहिर तुळशीराम जाधव, अर्जुन वाळके, वेल्हाळ्याचे सरपंच गोपीनाथ सोनवणे, कासारा दुमालाचे सरपंच शरद खतोडे, राहूल लंके, प्रा. सुशांत सातपुते, वंदना बंदावणे, संजय राऊत, हरी ढमाले, संदीप सातपुते, संजय सोनवणे, अशोक खैरनार, कृष्णामाई जाधव, जयश्री जाधव, किरण खैरनार, सोमनाथ सोनवणे, बजरंग जेडगुले, राहूल वर्पे, रोहिदास बर्गे आदी उपस्थित होते. शाहिर प्रा. जाधव व समुहाने निसर्ग गीतांचे सादरीकरण केले. तालुक्यातील शाळांतील विद्यार्थ्यांनी नृत्यांमधून पर्यावरण संदर्भात प्रबोधन केले. यावेळी संगमनेर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर