शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कुकडीमधून सीनासाठी पाणी नाहीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 17:40 IST

शासनाने कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी सीना धरणात सोडण्यास परवानगी दिली. सीना धरणात पाणी सोडण्यासाठी बोगदाही झाला.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : शासनाने कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी सीना धरणात सोडण्यास परवानगी दिली. सीना धरणात पाणी सोडण्यासाठी बोगदाही झाला. मात्र २००५ च्या कायद्यानुसार महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने सीना धरणात सिंचनासाठी कुकडीचे पाणी सोडण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत सीना धरणाचा पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहेसीना प्रकल्पामधे कुकडी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करणारी राज्य शासनाच्या विरोधातील याचिका अ‍ॅड. कैलास शेवाळे, अ‍ॅड. शिवाजी अनुभले, मिलींद बागल यांनी केली होती.याचिकेचा निर्णय १५ जुलै १९ रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला. या याचिकेवर निर्णय देताना प्राधिकरणाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली. परंतु पूर्वीचे १.२ टीमसी पाणी काढून घेतले. त्यामुळे सीना धरणात शेतीसाठी सोडले जाणारे कुकडीचे पाणी यापुढे बंद होणार आहे. फक्त उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली तरच कुकडीचे १०० एमसीएफटी पाणी सीना धरणात सोडले जाणार आहे. त्यामुळे सीनाचा पाणी प्रश्न सुटण्याऐवजी अडचणीचा झाला आहे.सीना प्रकल्पामधे कुकडी डाव्या कालव्यातून ओव्हरफ्लोचे १.२ टीमसी पाणी सोडण्यासाठी भोसे खिंड बोगदा प्रकल्प शासनाने राबविला. त्यास पाणी उपलब्ध नाही.त्यानंतर शासनाने श्वेत पत्रिका काढली व विशेष तपासणी पथक नेमले. या पथकाच्या अहवालानुसार भोसे खिंड बोगदा दोषयुक्त प्रकल्पाच्या यादीत गेला आहे.पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी हा बोगदा प्रकल्प कुकडी प्रकल्पास समावेश करणेसाठी प्रयत्न केला. किमान ०.४ टीमसी पाणी समावेश कुकडी प्रकल्प अहवालात तरतुद करणेबाबत प्रयत्न केले. झाले उलटे शासनाने फक्त ०.१ टीमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. याचीकाकर्त्यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या कोर्टात धाव घेतली. ०.१ टीमसी पाणी जाऊन फक्त टंचाई काळात पिण्याच्या पाण्यावर बोळवण झाली. प्रा. राम शिंदे तसेच याचिकाकर्त्यांचे प्रयत्न जरी प्रामाणिक असले तरी अर्धवट माहितीच्या आधारे अहवाल सादर करण्यात आले. पूर्वी मंजुर होते ते पाणी पण नवीन कायद्याच्या माध्यमातून कमी झाले आहे.विसापूर व साकळाई अडचणीतमहाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नवीन धोरणानुसार १०० उपलब्ध असेल. सिंचनासाठी पाणी दिले जात आहे. शासनाने राजकीय मतपेटी डोळ्यासमोर ठेऊन उचल अथवा कालव्यांना पाणी देण्यावर धोरण घेतले. तर त्यांना ब्रेक लावले जात आहे. भविष्यात विसापूर खालील सिंचन धोक्यात येणार आहे तर साकळाईचा जन्म होणे अवघड आहे. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा