शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीमधून सीनासाठी पाणी नाहीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 17:40 IST

शासनाने कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी सीना धरणात सोडण्यास परवानगी दिली. सीना धरणात पाणी सोडण्यासाठी बोगदाही झाला.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : शासनाने कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी सीना धरणात सोडण्यास परवानगी दिली. सीना धरणात पाणी सोडण्यासाठी बोगदाही झाला. मात्र २००५ च्या कायद्यानुसार महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने सीना धरणात सिंचनासाठी कुकडीचे पाणी सोडण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत सीना धरणाचा पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहेसीना प्रकल्पामधे कुकडी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करणारी राज्य शासनाच्या विरोधातील याचिका अ‍ॅड. कैलास शेवाळे, अ‍ॅड. शिवाजी अनुभले, मिलींद बागल यांनी केली होती.याचिकेचा निर्णय १५ जुलै १९ रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला. या याचिकेवर निर्णय देताना प्राधिकरणाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली. परंतु पूर्वीचे १.२ टीमसी पाणी काढून घेतले. त्यामुळे सीना धरणात शेतीसाठी सोडले जाणारे कुकडीचे पाणी यापुढे बंद होणार आहे. फक्त उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली तरच कुकडीचे १०० एमसीएफटी पाणी सीना धरणात सोडले जाणार आहे. त्यामुळे सीनाचा पाणी प्रश्न सुटण्याऐवजी अडचणीचा झाला आहे.सीना प्रकल्पामधे कुकडी डाव्या कालव्यातून ओव्हरफ्लोचे १.२ टीमसी पाणी सोडण्यासाठी भोसे खिंड बोगदा प्रकल्प शासनाने राबविला. त्यास पाणी उपलब्ध नाही.त्यानंतर शासनाने श्वेत पत्रिका काढली व विशेष तपासणी पथक नेमले. या पथकाच्या अहवालानुसार भोसे खिंड बोगदा दोषयुक्त प्रकल्पाच्या यादीत गेला आहे.पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी हा बोगदा प्रकल्प कुकडी प्रकल्पास समावेश करणेसाठी प्रयत्न केला. किमान ०.४ टीमसी पाणी समावेश कुकडी प्रकल्प अहवालात तरतुद करणेबाबत प्रयत्न केले. झाले उलटे शासनाने फक्त ०.१ टीमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. याचीकाकर्त्यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या कोर्टात धाव घेतली. ०.१ टीमसी पाणी जाऊन फक्त टंचाई काळात पिण्याच्या पाण्यावर बोळवण झाली. प्रा. राम शिंदे तसेच याचिकाकर्त्यांचे प्रयत्न जरी प्रामाणिक असले तरी अर्धवट माहितीच्या आधारे अहवाल सादर करण्यात आले. पूर्वी मंजुर होते ते पाणी पण नवीन कायद्याच्या माध्यमातून कमी झाले आहे.विसापूर व साकळाई अडचणीतमहाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नवीन धोरणानुसार १०० उपलब्ध असेल. सिंचनासाठी पाणी दिले जात आहे. शासनाने राजकीय मतपेटी डोळ्यासमोर ठेऊन उचल अथवा कालव्यांना पाणी देण्यावर धोरण घेतले. तर त्यांना ब्रेक लावले जात आहे. भविष्यात विसापूर खालील सिंचन धोक्यात येणार आहे तर साकळाईचा जन्म होणे अवघड आहे. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा