शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

राजकीय फायद्यासाठी कोणी नगरची बदनामी करू नये - खासदार दिलीप गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 16:30 IST

केडगावमध्ये झालेले दुहेरी हत्याकांड निषेधार्थच आहे. परंतु त्यानंतर जे राजकारण सुरू झालं ते दुर्दैवी आहे. जो तो नगरमध्ये येऊन नगरचा कसा बिहार झाला याचे दाखले देत आहे. परंतु नगरला विकासाचा मोठा वारसा आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांवर टीका करून चर्चेत राहण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

अहमदनगर : केडगावमध्ये झालेले दुहेरी हत्याकांड निषेधार्थच आहे. परंतु त्यानंतर जे राजकारण सुरू झालं ते दुर्दैवी आहे. जो तो नगरमध्ये येऊन नगरचा कसा बिहार झाला याचे दाखले देत आहे. परंतु नगरला विकासाचा मोठा वारसा आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हा विकासासाठी योगदान दिलेले आहे. राज्यात नगरकडे मानाने पाहिजे जाते. त्यामुळे कोणी राजकीय फायद्यासाठी नगरची बदनामी करू नये, अशी अपेक्षा खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केली.

दिलीप गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, केडगाव येथे शिवसैनिकांची हत्या झाल्याने शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नगरमध्ये येत त्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच पक्षाच्या वतीने कुटुंबाला आर्थिक मदतही केली. त्यांच्या या भूमिकेचे मी स्वागत करतो. परंतु त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच नगरची कायदा-सुव्यवस्था बिघडली असून, नगरचा बिहार झाल्याचे वक्तव्य केले. त्याचे मी खंडण करतो. कोणतेही विषय कोणत्याही ठिकाणी करणे चुकीचे आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी या जिल्हा विकासासाठी योगदान दिलेले आहे. राजकारणात आपला जिल्हा नेहमी दिशा देणारा ओळखला जातो. गेल्या काही दिवसांत नगरमध्ये ज्या घटना घडल्या त्या वैयक्तिक स्तरावरच्या आहेत. परंतु राजकीय फायद्यासाठी चुकीची वक्तव्ये करून कोणी जर जिल्ह्यातील ६० लाख जनतेला वेढीस धरत असेल तर ते चुकीचे आहे. राज्यात नगर जिल्हा उत्कृष्ट आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील राजकारणी परिवाराने कुठल्याही गुंडगिरीला समर्थन केलेले नाही. त्यामुळे नगरचे नाव कोणी बदमान करू नये, एवढीच आपली इच्छा आहे, असे गांधी म्हणाले.शिवसेनेकडे विकासाचा अजेंडा नसल्याने टीकागेल्या चार वर्षात केंद्र व राज्य हातात हात घालून विकासात्मक कामे करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कामाचा धडाका लावला आहे. चांगल्या गोष्टी होत आहेत म्हणून वारंवार मुख्यमंत्र्यांवर टीका केली जाते. शिवसेनेकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर टीका करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न ते करतात, असा टोला गांधी यांनी शिवसेनेला लगावला.केडगाव प्रकरणाशी भाजपचा संबंध नाहीकेडगाव प्रकरण स्थानिक राजकारणातून घडले आहे. त्याचा भाजप पक्षाशी कोणताही संबंध नाही. यात भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव जरी आले असले तरी ते पोलिसांना पूर्ण सहकार्य करीत आहेत. गुुन्हा दाखल झाल्यानंतर ते स्वत: पोलिसांत हजर झाले. पोलीस आपल्या परीने तपास करीत आहेत. सत्य काय ते बाहेर येईल.पालिका निवडणुकीत सेनेशी युती अशक्ययेत्या महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेबरोबर युती किंवा त्यांच्याबरोबर जाणार नाही. राज्यात कोठेही भाजपने सेनेशी युती केली, तरी नगरमध्ये ती होणार नाही, असे गांधी यांनी ठणकावून सांगितले. महानगरपालिकेत नगरसेवकांपेक्षा ठेकेदार जास्त झालेत , त्यामुळे शहरात विकासकामे रखडली, असेही ते शेवटी म्हणाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDilip Gandhiखा. दिलीप गांधी