शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षं घेता का द्राक्षं, फक्त १० रुपये किलो; व्यापाऱ्यांची नगरकडे पाठ, शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 15:28 IST

सध्या व्यापारी द्राक्षे खरेदी करण्यासाठी बागेकडे फिरकायला तयार नाहीत, असे चित्र आहे. आठ ते दहा रुपये किलो दरानेही व्यापारी माल खरेदीला इच्छुक नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : नगर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना यंदा अभूतपूर्व संकटाचा सामना करावा लागत आहे. द्राक्ष खरेदीसाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांची अक्षरश: विनवणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मालासह बागेची छाटणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. जिल्ह्यात सुमारे २० ते २५ हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष उत्पादन घेतले जाते. यंदा सरासरी १५ ते १७ टन एवढे विक्री उत्पादन झाले. मे महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात किलोमागे ५० रुपये दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी उशिराने बागेची छाटणी केली होती. मात्र असे काहीही घडले नाही.

नाशिकमधील मालाची मागील महिन्यातच पूर्णपणे विक्री झालेली होती. त्यामुळे जिल्ह्यातील मालाला व्यापाऱ्यांची पसंती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र सध्या व्यापारी द्राक्षे खरेदी करण्यासाठी बागेकडे फिरकायला तयार नाहीत, असे चित्र आहे. आठ ते दहा रुपये किलो दरानेही व्यापारी माल खरेदीला इच्छुक नाहीत.

लोणी येथील द्राक्ष बागायतदार संघटनेचे प्रमुख नेते सुनील विखे यांची पाच एकर द्राक्षबाग आहे. त्यांचा माल काढणीला आला असून, पुढील आठवड्यात तो खराब होणार आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी नकार दिल्यामुळे ते स्वत: नाशिक जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. तेथील वाईन कंपन्यांना माल खरेदीसाठी त्यांनी गळ घातली आहे. मात्र दहा रुपये किलो दराने आपणच कंपनीपर्यंत माल पोहोच करावा. तोडणी व वाहतुकीचा भार उचलावा, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. यातून एकही रुपया हातात पडणार नाही, असे विखे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

उक्कलगाव (ता. श्रीरामपूर) येथील इंद्रनाथ थोरात यांनी यंदा रासायनिक खते व औषधांची बिलेही द्राक्ष उत्पादकांना अदा करता येणार नाहीत, अशी माहिती दिली. १७० दिवस माल बागेत राहिला तर तो खराब होतो. पुढील वर्षी त्यामुळे उत्पादनाला फटका बसतो. आज बागेतच माल टाकून देण्याची वेळ आल्याचे थोरात म्हणाले.

या गोष्टींमुळे बसला फटका

सरकारने दीड महिन्यापूर्वीच द्राक्षनिर्यातीवर बंदी आणली. त्यामुळे निर्यातक्षम मालही स्थानिक बाजारात पडून राहिला. त्याचबरोबर मार्च महिन्यातच पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे द्राक्षांची नैसर्गिक वाढ कमी झाली. माल पक्व झाल्यामुळे घडातील द्राक्षांची गळती होते. त्यामुळे व्यापारी माल खरेदी करायला इच्छुक नाहीत, असे चित्र आहे.