शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

द्राक्षं घेता का द्राक्षं, फक्त १० रुपये किलो; व्यापाऱ्यांची नगरकडे पाठ, शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 15:28 IST

सध्या व्यापारी द्राक्षे खरेदी करण्यासाठी बागेकडे फिरकायला तयार नाहीत, असे चित्र आहे. आठ ते दहा रुपये किलो दरानेही व्यापारी माल खरेदीला इच्छुक नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : नगर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना यंदा अभूतपूर्व संकटाचा सामना करावा लागत आहे. द्राक्ष खरेदीसाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांची अक्षरश: विनवणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मालासह बागेची छाटणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. जिल्ह्यात सुमारे २० ते २५ हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष उत्पादन घेतले जाते. यंदा सरासरी १५ ते १७ टन एवढे विक्री उत्पादन झाले. मे महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात किलोमागे ५० रुपये दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी उशिराने बागेची छाटणी केली होती. मात्र असे काहीही घडले नाही.

नाशिकमधील मालाची मागील महिन्यातच पूर्णपणे विक्री झालेली होती. त्यामुळे जिल्ह्यातील मालाला व्यापाऱ्यांची पसंती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र सध्या व्यापारी द्राक्षे खरेदी करण्यासाठी बागेकडे फिरकायला तयार नाहीत, असे चित्र आहे. आठ ते दहा रुपये किलो दरानेही व्यापारी माल खरेदीला इच्छुक नाहीत.

लोणी येथील द्राक्ष बागायतदार संघटनेचे प्रमुख नेते सुनील विखे यांची पाच एकर द्राक्षबाग आहे. त्यांचा माल काढणीला आला असून, पुढील आठवड्यात तो खराब होणार आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी नकार दिल्यामुळे ते स्वत: नाशिक जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. तेथील वाईन कंपन्यांना माल खरेदीसाठी त्यांनी गळ घातली आहे. मात्र दहा रुपये किलो दराने आपणच कंपनीपर्यंत माल पोहोच करावा. तोडणी व वाहतुकीचा भार उचलावा, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. यातून एकही रुपया हातात पडणार नाही, असे विखे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

उक्कलगाव (ता. श्रीरामपूर) येथील इंद्रनाथ थोरात यांनी यंदा रासायनिक खते व औषधांची बिलेही द्राक्ष उत्पादकांना अदा करता येणार नाहीत, अशी माहिती दिली. १७० दिवस माल बागेत राहिला तर तो खराब होतो. पुढील वर्षी त्यामुळे उत्पादनाला फटका बसतो. आज बागेतच माल टाकून देण्याची वेळ आल्याचे थोरात म्हणाले.

या गोष्टींमुळे बसला फटका

सरकारने दीड महिन्यापूर्वीच द्राक्षनिर्यातीवर बंदी आणली. त्यामुळे निर्यातक्षम मालही स्थानिक बाजारात पडून राहिला. त्याचबरोबर मार्च महिन्यातच पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे द्राक्षांची नैसर्गिक वाढ कमी झाली. माल पक्व झाल्यामुळे घडातील द्राक्षांची गळती होते. त्यामुळे व्यापारी माल खरेदी करायला इच्छुक नाहीत, असे चित्र आहे.