शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘निळवंडे’चे पाणी कोपरगावला मिळणार - हरिभाऊ बागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 18:02 IST

पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यावर सर्वांचा हक्क आहे. त्यामुळे राज्य सरकार निळवंडे धरणातून कोपरगाव शहराला पिण्याचे पाणी देईल, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुरूवारी येथे दिली.

कोेपरगाव : पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यावर सर्वांचा हक्क आहे. त्यामुळे राज्य सरकार निळवंडे धरणातून कोपरगाव शहराला पिण्याचे पाणी देईल, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुरूवारी येथे दिली.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिीट्यूट कार्यस्थळावर बागडे यांनी आपत्ती निवारण पथकाचे उद्घाटन केले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकरराव कोल्हे होते. महंत रमेशगिरी महाराज, दत्तात्रय कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, शिर्डीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके, माजी नगराध्यक्ष अभय शेळके, संजय सातभाई, दिलीप दारूणकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, गटनेते योगेश बागुल रवींद्र पाठक, भाजप शहराध्यक्ष कैलास खैरे आदी उपस्थित होते.बिपीन कोल्हे म्हणाले, ब्रिटीश काळापासून तालुका अवर्षणग्रस्त असल्याने बारमाही गोदावरी कालव्यांची निर्मिती करून पाटपाणी दिले. मात्र कायमस्वरूपी पाणी मिळण्यावर सरकारने भर द्यावा. निळवंडे धरणातून शिर्डी व कोपरगावला पिण्याचे पाणी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून अध्यादेश काढला. मात्र काही विघ्नसंतोषी शुक्राचार्य पाईपलाईनला अडथळा आणत आहेत. देव त्यांना सुबुध्दी देवो. शहराला पिण्याचे पाणी मिळो, अशी टिपण्णी त्यांनी केली.कोल्हे यांनी शाल, हार-तुरे, गुच्छ न स्वीकारता शालेय साहित्य व वृक्षांचे वाटप केले. आमदार स्नेहलता कोल्हे, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजीवनी फाऊंडेशनचे सुमित कोल्हे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी स्वागत केले. मच्छिंद्र टेके यांनी प्रास्ताविक केले. प्रशासकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी आपत्ती निवारण पथकाविषयी माहिती दिली. प्रा. साहेबराव दवंगे यांनी सूत्रसंचालन केले. भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी आभार मानले.

शहर व मतदार संघातील पिण्यासह शेतीचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी पक्ष बदलला. गेल्या निवडणुकीत नवीन पक्ष असूनही कार्यकर्त्यांनी मोलाची साथ दिल्यानेच आमदारकी मिळाली. निळवंडे धरण कालवाप्रश्नी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ न देता राखीव साठ्यातून शिर्डी व कोपरगावला पिण्याचे पाणी घेत आहे. मात्र काहींनी वावड्या उठवून चालविलेला विरोध निरर्थक आहे. युती सरकारच्या माध्यमातून १० वर्षातील विकासाचा बॅकलॉग आपण भरून काढला आहे.-स्नेहलता कोल्हे, आमदार.आमदार स्नेहलताताई, तुम्ही चिंता करू नका. तुमचे सर्व प्रश्न सभागृहात मांडा. त्यासाठी सभापती या नात्याने भरपूर वेळ देईल.-हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव