शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

‘निळवंडे’चे पाणी कोपरगावला मिळणार - हरिभाऊ बागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 18:02 IST

पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यावर सर्वांचा हक्क आहे. त्यामुळे राज्य सरकार निळवंडे धरणातून कोपरगाव शहराला पिण्याचे पाणी देईल, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुरूवारी येथे दिली.

कोेपरगाव : पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यावर सर्वांचा हक्क आहे. त्यामुळे राज्य सरकार निळवंडे धरणातून कोपरगाव शहराला पिण्याचे पाणी देईल, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुरूवारी येथे दिली.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिीट्यूट कार्यस्थळावर बागडे यांनी आपत्ती निवारण पथकाचे उद्घाटन केले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकरराव कोल्हे होते. महंत रमेशगिरी महाराज, दत्तात्रय कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, शिर्डीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके, माजी नगराध्यक्ष अभय शेळके, संजय सातभाई, दिलीप दारूणकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, गटनेते योगेश बागुल रवींद्र पाठक, भाजप शहराध्यक्ष कैलास खैरे आदी उपस्थित होते.बिपीन कोल्हे म्हणाले, ब्रिटीश काळापासून तालुका अवर्षणग्रस्त असल्याने बारमाही गोदावरी कालव्यांची निर्मिती करून पाटपाणी दिले. मात्र कायमस्वरूपी पाणी मिळण्यावर सरकारने भर द्यावा. निळवंडे धरणातून शिर्डी व कोपरगावला पिण्याचे पाणी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून अध्यादेश काढला. मात्र काही विघ्नसंतोषी शुक्राचार्य पाईपलाईनला अडथळा आणत आहेत. देव त्यांना सुबुध्दी देवो. शहराला पिण्याचे पाणी मिळो, अशी टिपण्णी त्यांनी केली.कोल्हे यांनी शाल, हार-तुरे, गुच्छ न स्वीकारता शालेय साहित्य व वृक्षांचे वाटप केले. आमदार स्नेहलता कोल्हे, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजीवनी फाऊंडेशनचे सुमित कोल्हे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी स्वागत केले. मच्छिंद्र टेके यांनी प्रास्ताविक केले. प्रशासकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी आपत्ती निवारण पथकाविषयी माहिती दिली. प्रा. साहेबराव दवंगे यांनी सूत्रसंचालन केले. भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी आभार मानले.

शहर व मतदार संघातील पिण्यासह शेतीचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी पक्ष बदलला. गेल्या निवडणुकीत नवीन पक्ष असूनही कार्यकर्त्यांनी मोलाची साथ दिल्यानेच आमदारकी मिळाली. निळवंडे धरण कालवाप्रश्नी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ न देता राखीव साठ्यातून शिर्डी व कोपरगावला पिण्याचे पाणी घेत आहे. मात्र काहींनी वावड्या उठवून चालविलेला विरोध निरर्थक आहे. युती सरकारच्या माध्यमातून १० वर्षातील विकासाचा बॅकलॉग आपण भरून काढला आहे.-स्नेहलता कोल्हे, आमदार.आमदार स्नेहलताताई, तुम्ही चिंता करू नका. तुमचे सर्व प्रश्न सभागृहात मांडा. त्यासाठी सभापती या नात्याने भरपूर वेळ देईल.-हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव