शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये नव्या नेतृत्वाला कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:19 IST

पाथर्डी : ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील गावोगावी तरुणांच्या हाती सत्ता देण्यास मतदारांची उत्सुकता दिसून आली. सतत उपलब्घ होऊ शकणाऱ्या कार्यकर्त्याला ...

पाथर्डी : ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील गावोगावी तरुणांच्या हाती सत्ता देण्यास मतदारांची उत्सुकता दिसून आली. सतत उपलब्घ होऊ शकणाऱ्या कार्यकर्त्याला मतदारांनी प्रथम पसंती दिली. प्रस्थापितांना नाकारत गावपातळीवरील नवीन नेतृत्व उदयाला येण्यास ग्रामपंचायतीचा कौल निर्णायक ठरला.

ग्रामपंचायत ही अशी एकच संस्था आहे तेथे सात पिढ्यांच्या वैरापासून जमिनीच्या बांधाचाही मतासाठी विचार होतो. नातेगोते, भावकी, गावकी अशा विविध बाबींचा तपशीलवार अभ्यास करण्यास मतदारांचे मुक्त व्यासपीठ म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जाते. पक्षीय राजकारणापेक्षा उमेदवाराच्या कर्तुत्वाचा सातबारा मतदारांनी पाहिला. त्यामुळे सर्व आमिषांचा मनमुराद आनंद लुटूनही काही गावांमध्ये मतदारांनी चोखंदळपणे मतदान केले.

कासारपिंपळगाव येथे आमदार मोनिका राजळे यांच्या विकासकामांना मतदारांनी साथ दिली. त्यांच्या आघाडीला पुन्हा संधी दिली. तसेच त्यांच्या गटाच्या इतर ग्रामपंचायतींमध्येही मतदारांनी त्यांना संधी दिली. कारखाना, विविध सोसायट्या आदींकडून पुरेपूर सहकार्य मिळावे यासाठी सहकारावर वर्चस्व असलेल्या राजळेंच्या शब्दाला किंमत दिली. अकोला गावात राष्ट्रवादीचे नेते ॲड. प्रताप ढाकणे यांना ग्रामपंचायत राखण्यात यश आले नाही. तालुक्याच्या राजकारणातील सतत लक्षवेधी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे नेते अर्जुनराव शिरसाट यांनाही त्यांच्याच गावात त्यांच्या विचाराचे माणसे बसवता आले नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नसले तरी त्यांच्या विचाराची माणसे ग्रामपंचायतीत नाहीत हे मात्र निश्चित. तालुक्यातील येळी ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या अधिक संवेदनक्षम व तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय हालचालीचे केंद्र म्हणून पाहिले जाते. गावच्या विकासाला वाहून घेत जलसंधारणाची चळवळ संपूर्ण जिल्ह्यात लोकसहभागातून यशस्वी करून युवा नेते संजय बडे यांनी सलग पाचवेळा पंचायतीची सत्ता स्वत:कडे राखत तालुक्यात राजकीय इतिहास घडविला.

प्रमुख राजकीय पक्षांनी पक्षीय चेहरा देण्याऐवजी कर्तृत्ववान उमेदवाराला संधी देण्याचे धोरण अवलंबले. त्यामुळे पक्षीय बलाबल ग्रामपंचायत निवडणुकीतील स्पष्ट होऊ शकत नाही. तालुक्यातील १०७ पैकी ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणूका अत्यंत चुरशीने झाल्या.

------

ग्रामीण भागाचा चेहरा बदलणार..

नवीन सरपंच व उपसरपंच निवडले गेले. बहुतांशी ठिकाणी तरुण व सुशिक्षित सरपंच व उपसरपंच निवडून आल्याने आता खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा चेहरा बदलण्यास सुरुवात होणार आहे. या निवडणूक निकालावरून नेत्यांना बोध घेऊन आगामी बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणुकांची व्यूहरचना करावी लागणार आहे.