शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाथर्डी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये नव्या नेतृत्वाला कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:19 IST

पाथर्डी : ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील गावोगावी तरुणांच्या हाती सत्ता देण्यास मतदारांची उत्सुकता दिसून आली. सतत उपलब्घ होऊ शकणाऱ्या कार्यकर्त्याला ...

पाथर्डी : ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील गावोगावी तरुणांच्या हाती सत्ता देण्यास मतदारांची उत्सुकता दिसून आली. सतत उपलब्घ होऊ शकणाऱ्या कार्यकर्त्याला मतदारांनी प्रथम पसंती दिली. प्रस्थापितांना नाकारत गावपातळीवरील नवीन नेतृत्व उदयाला येण्यास ग्रामपंचायतीचा कौल निर्णायक ठरला.

ग्रामपंचायत ही अशी एकच संस्था आहे तेथे सात पिढ्यांच्या वैरापासून जमिनीच्या बांधाचाही मतासाठी विचार होतो. नातेगोते, भावकी, गावकी अशा विविध बाबींचा तपशीलवार अभ्यास करण्यास मतदारांचे मुक्त व्यासपीठ म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जाते. पक्षीय राजकारणापेक्षा उमेदवाराच्या कर्तुत्वाचा सातबारा मतदारांनी पाहिला. त्यामुळे सर्व आमिषांचा मनमुराद आनंद लुटूनही काही गावांमध्ये मतदारांनी चोखंदळपणे मतदान केले.

कासारपिंपळगाव येथे आमदार मोनिका राजळे यांच्या विकासकामांना मतदारांनी साथ दिली. त्यांच्या आघाडीला पुन्हा संधी दिली. तसेच त्यांच्या गटाच्या इतर ग्रामपंचायतींमध्येही मतदारांनी त्यांना संधी दिली. कारखाना, विविध सोसायट्या आदींकडून पुरेपूर सहकार्य मिळावे यासाठी सहकारावर वर्चस्व असलेल्या राजळेंच्या शब्दाला किंमत दिली. अकोला गावात राष्ट्रवादीचे नेते ॲड. प्रताप ढाकणे यांना ग्रामपंचायत राखण्यात यश आले नाही. तालुक्याच्या राजकारणातील सतत लक्षवेधी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे नेते अर्जुनराव शिरसाट यांनाही त्यांच्याच गावात त्यांच्या विचाराचे माणसे बसवता आले नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नसले तरी त्यांच्या विचाराची माणसे ग्रामपंचायतीत नाहीत हे मात्र निश्चित. तालुक्यातील येळी ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या अधिक संवेदनक्षम व तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय हालचालीचे केंद्र म्हणून पाहिले जाते. गावच्या विकासाला वाहून घेत जलसंधारणाची चळवळ संपूर्ण जिल्ह्यात लोकसहभागातून यशस्वी करून युवा नेते संजय बडे यांनी सलग पाचवेळा पंचायतीची सत्ता स्वत:कडे राखत तालुक्यात राजकीय इतिहास घडविला.

प्रमुख राजकीय पक्षांनी पक्षीय चेहरा देण्याऐवजी कर्तृत्ववान उमेदवाराला संधी देण्याचे धोरण अवलंबले. त्यामुळे पक्षीय बलाबल ग्रामपंचायत निवडणुकीतील स्पष्ट होऊ शकत नाही. तालुक्यातील १०७ पैकी ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणूका अत्यंत चुरशीने झाल्या.

------

ग्रामीण भागाचा चेहरा बदलणार..

नवीन सरपंच व उपसरपंच निवडले गेले. बहुतांशी ठिकाणी तरुण व सुशिक्षित सरपंच व उपसरपंच निवडून आल्याने आता खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा चेहरा बदलण्यास सुरुवात होणार आहे. या निवडणूक निकालावरून नेत्यांना बोध घेऊन आगामी बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणुकांची व्यूहरचना करावी लागणार आहे.