शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विकासापासून मांजरसुंबे गड उपेक्षित

By admin | Updated: July 11, 2016 00:55 IST

ज्ञानेश दुधाडे -अहमदनगर गर्भगिरी पर्वत रांगेत शेकडो वर्षांपासून दिमाखात उभा असणारा मांजरसुंबे गड आजही पर्यटनाच्या दृष्टीने उपेक्षित आहे.

ज्ञानेश दुधाडे -अहमदनगरगर्भगिरी पर्वत रांगेत शेकडो वर्षांपासून दिमाखात उभा असणारा मांजरसुंबे गड आजही पर्यटनाच्या दृष्टीने उपेक्षित आहे. नगर शहरापासून अवघ्या २० किलोमीटर असणाऱ्या या गडाला ऐतिहासिक, भौगोलिक महत्व असून या ठिकाणी प्रशासनाने लक्ष दिल्यास हा गड पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. विशेषकरून या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्या आजही सर्वांसाठी कुतुहलाचा विषय ठरणार आहे. नगर तालुक्यात वांबोरीरोडवर गर्भगिरी पर्वत रांगेत गोरक्षनाथ गडाशेजारी मांजरसुंबे गड आहे. निजामशाहीच्या काळात सलाबत खान नावाच्या सरदाराने हा गड बांधलेला आहे. औरंगाबादकडून होणाऱ्या मोगल स्वाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या गडावरून टेहळणी करण्यात येत होती. या ठिकाणी वांबोरीच्या दिशेने दिसणारे मंजर (दृष्य) अतिशय सुंदर होते. त्यावेळी मुस्लीम सरदार ‘मंजर ए सुभा’ असे या ठिकाणाला म्हणत होते. पुढे याच मंजर ए सुभाचे मांजरसुंबा झाले असावे, असे म्हटले जाते.या गडावर दोन बुरू ज असून एका पडलेल्या महलाचे अवशेष आहेत. या महालाच्या भिंती आजही या गडाच्या रुबाबाची साक्ष देत आहेत. महालाच्या भिंतीशेजारी साधारण २०० फूट लांब आणि १०० फूट रुंद आणि साधारण ८ फूट खोल एवढा मोठा तलाव आहे. या तलावात वांबोरीच्या बाजूने गडाच्या डोंगरात असणाऱ्या पाण्याच्या टाक्यातून हत्तीच्या मोटेव्दारे पाणी उपसा करण्यात येत होता. गडावर दोन बुरूज आणि एका महालाचे अवशेष शिल्लक आहेत. महालाच्या दोन भिंती शिल्लक आहेत. मात्र, भिंतींची उंची २० फुटापेक्षा अधिक आहे. या ठिकाणी दावल मलिक हे पिराचे ठिकाण आहे. बुुरूज आणि महालाच्या भिंतीवर अनेक प्रेमवीरांनी आपली नावे कोरून त्या ठिकाणी विद्रूपीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी अनेक संस्था, तरूण गु्रप यांनी श्रमदान करून गडाची डागडुजीचा प्रयत्न केलेला आहे. दुष्काळातही पाणी असणाऱ्या टाक्यावांबोरीच्या दिशेने गडावरून २० ते २५ फूट खाली डोंगर कोरून त्या ठिकाणी पाच पाण्याच्या टाक्या तयार करण्यात आलेल्या आहेत. या टाक्यांतील पाणी हत्तीच्या मोटेने गडावर उपसण्यात येत होते. हा वास्तूशास्त्रचा अद्भूत नमुना आहे. या ठिकाणी जाण्यासाठी अरूंद वाट असून अनेक ठिकाणी पायऱ्या कोसळलेल्या आहेत. या पाण्याच्या टाक्यात दुष्काळातही मुबलक पाणीसाठा असतो. टाक्यांची स्वच्छता झालेली नसल्याने शेवाळ साचले आहे.