शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विकासापासून मांजरसुंबे गड उपेक्षित

By admin | Updated: July 11, 2016 00:55 IST

ज्ञानेश दुधाडे -अहमदनगर गर्भगिरी पर्वत रांगेत शेकडो वर्षांपासून दिमाखात उभा असणारा मांजरसुंबे गड आजही पर्यटनाच्या दृष्टीने उपेक्षित आहे.

ज्ञानेश दुधाडे -अहमदनगरगर्भगिरी पर्वत रांगेत शेकडो वर्षांपासून दिमाखात उभा असणारा मांजरसुंबे गड आजही पर्यटनाच्या दृष्टीने उपेक्षित आहे. नगर शहरापासून अवघ्या २० किलोमीटर असणाऱ्या या गडाला ऐतिहासिक, भौगोलिक महत्व असून या ठिकाणी प्रशासनाने लक्ष दिल्यास हा गड पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. विशेषकरून या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्या आजही सर्वांसाठी कुतुहलाचा विषय ठरणार आहे. नगर तालुक्यात वांबोरीरोडवर गर्भगिरी पर्वत रांगेत गोरक्षनाथ गडाशेजारी मांजरसुंबे गड आहे. निजामशाहीच्या काळात सलाबत खान नावाच्या सरदाराने हा गड बांधलेला आहे. औरंगाबादकडून होणाऱ्या मोगल स्वाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या गडावरून टेहळणी करण्यात येत होती. या ठिकाणी वांबोरीच्या दिशेने दिसणारे मंजर (दृष्य) अतिशय सुंदर होते. त्यावेळी मुस्लीम सरदार ‘मंजर ए सुभा’ असे या ठिकाणाला म्हणत होते. पुढे याच मंजर ए सुभाचे मांजरसुंबा झाले असावे, असे म्हटले जाते.या गडावर दोन बुरू ज असून एका पडलेल्या महलाचे अवशेष आहेत. या महालाच्या भिंती आजही या गडाच्या रुबाबाची साक्ष देत आहेत. महालाच्या भिंतीशेजारी साधारण २०० फूट लांब आणि १०० फूट रुंद आणि साधारण ८ फूट खोल एवढा मोठा तलाव आहे. या तलावात वांबोरीच्या बाजूने गडाच्या डोंगरात असणाऱ्या पाण्याच्या टाक्यातून हत्तीच्या मोटेव्दारे पाणी उपसा करण्यात येत होता. गडावर दोन बुरूज आणि एका महालाचे अवशेष शिल्लक आहेत. महालाच्या दोन भिंती शिल्लक आहेत. मात्र, भिंतींची उंची २० फुटापेक्षा अधिक आहे. या ठिकाणी दावल मलिक हे पिराचे ठिकाण आहे. बुुरूज आणि महालाच्या भिंतीवर अनेक प्रेमवीरांनी आपली नावे कोरून त्या ठिकाणी विद्रूपीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी अनेक संस्था, तरूण गु्रप यांनी श्रमदान करून गडाची डागडुजीचा प्रयत्न केलेला आहे. दुष्काळातही पाणी असणाऱ्या टाक्यावांबोरीच्या दिशेने गडावरून २० ते २५ फूट खाली डोंगर कोरून त्या ठिकाणी पाच पाण्याच्या टाक्या तयार करण्यात आलेल्या आहेत. या टाक्यांतील पाणी हत्तीच्या मोटेने गडावर उपसण्यात येत होते. हा वास्तूशास्त्रचा अद्भूत नमुना आहे. या ठिकाणी जाण्यासाठी अरूंद वाट असून अनेक ठिकाणी पायऱ्या कोसळलेल्या आहेत. या पाण्याच्या टाक्यात दुष्काळातही मुबलक पाणीसाठा असतो. टाक्यांची स्वच्छता झालेली नसल्याने शेवाळ साचले आहे.