शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विकासापासून मांजरसुंबे गड उपेक्षित

By admin | Updated: July 11, 2016 00:55 IST

ज्ञानेश दुधाडे -अहमदनगर गर्भगिरी पर्वत रांगेत शेकडो वर्षांपासून दिमाखात उभा असणारा मांजरसुंबे गड आजही पर्यटनाच्या दृष्टीने उपेक्षित आहे.

ज्ञानेश दुधाडे -अहमदनगरगर्भगिरी पर्वत रांगेत शेकडो वर्षांपासून दिमाखात उभा असणारा मांजरसुंबे गड आजही पर्यटनाच्या दृष्टीने उपेक्षित आहे. नगर शहरापासून अवघ्या २० किलोमीटर असणाऱ्या या गडाला ऐतिहासिक, भौगोलिक महत्व असून या ठिकाणी प्रशासनाने लक्ष दिल्यास हा गड पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. विशेषकरून या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्या आजही सर्वांसाठी कुतुहलाचा विषय ठरणार आहे. नगर तालुक्यात वांबोरीरोडवर गर्भगिरी पर्वत रांगेत गोरक्षनाथ गडाशेजारी मांजरसुंबे गड आहे. निजामशाहीच्या काळात सलाबत खान नावाच्या सरदाराने हा गड बांधलेला आहे. औरंगाबादकडून होणाऱ्या मोगल स्वाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या गडावरून टेहळणी करण्यात येत होती. या ठिकाणी वांबोरीच्या दिशेने दिसणारे मंजर (दृष्य) अतिशय सुंदर होते. त्यावेळी मुस्लीम सरदार ‘मंजर ए सुभा’ असे या ठिकाणाला म्हणत होते. पुढे याच मंजर ए सुभाचे मांजरसुंबा झाले असावे, असे म्हटले जाते.या गडावर दोन बुरू ज असून एका पडलेल्या महलाचे अवशेष आहेत. या महालाच्या भिंती आजही या गडाच्या रुबाबाची साक्ष देत आहेत. महालाच्या भिंतीशेजारी साधारण २०० फूट लांब आणि १०० फूट रुंद आणि साधारण ८ फूट खोल एवढा मोठा तलाव आहे. या तलावात वांबोरीच्या बाजूने गडाच्या डोंगरात असणाऱ्या पाण्याच्या टाक्यातून हत्तीच्या मोटेव्दारे पाणी उपसा करण्यात येत होता. गडावर दोन बुरूज आणि एका महालाचे अवशेष शिल्लक आहेत. महालाच्या दोन भिंती शिल्लक आहेत. मात्र, भिंतींची उंची २० फुटापेक्षा अधिक आहे. या ठिकाणी दावल मलिक हे पिराचे ठिकाण आहे. बुुरूज आणि महालाच्या भिंतीवर अनेक प्रेमवीरांनी आपली नावे कोरून त्या ठिकाणी विद्रूपीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी अनेक संस्था, तरूण गु्रप यांनी श्रमदान करून गडाची डागडुजीचा प्रयत्न केलेला आहे. दुष्काळातही पाणी असणाऱ्या टाक्यावांबोरीच्या दिशेने गडावरून २० ते २५ फूट खाली डोंगर कोरून त्या ठिकाणी पाच पाण्याच्या टाक्या तयार करण्यात आलेल्या आहेत. या टाक्यांतील पाणी हत्तीच्या मोटेने गडावर उपसण्यात येत होते. हा वास्तूशास्त्रचा अद्भूत नमुना आहे. या ठिकाणी जाण्यासाठी अरूंद वाट असून अनेक ठिकाणी पायऱ्या कोसळलेल्या आहेत. या पाण्याच्या टाक्यात दुष्काळातही मुबलक पाणीसाठा असतो. टाक्यांची स्वच्छता झालेली नसल्याने शेवाळ साचले आहे.