शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

विकासापासून मांजरसुंबे गड उपेक्षित

By admin | Updated: July 11, 2016 00:55 IST

ज्ञानेश दुधाडे -अहमदनगर गर्भगिरी पर्वत रांगेत शेकडो वर्षांपासून दिमाखात उभा असणारा मांजरसुंबे गड आजही पर्यटनाच्या दृष्टीने उपेक्षित आहे.

ज्ञानेश दुधाडे -अहमदनगरगर्भगिरी पर्वत रांगेत शेकडो वर्षांपासून दिमाखात उभा असणारा मांजरसुंबे गड आजही पर्यटनाच्या दृष्टीने उपेक्षित आहे. नगर शहरापासून अवघ्या २० किलोमीटर असणाऱ्या या गडाला ऐतिहासिक, भौगोलिक महत्व असून या ठिकाणी प्रशासनाने लक्ष दिल्यास हा गड पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. विशेषकरून या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्या आजही सर्वांसाठी कुतुहलाचा विषय ठरणार आहे. नगर तालुक्यात वांबोरीरोडवर गर्भगिरी पर्वत रांगेत गोरक्षनाथ गडाशेजारी मांजरसुंबे गड आहे. निजामशाहीच्या काळात सलाबत खान नावाच्या सरदाराने हा गड बांधलेला आहे. औरंगाबादकडून होणाऱ्या मोगल स्वाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या गडावरून टेहळणी करण्यात येत होती. या ठिकाणी वांबोरीच्या दिशेने दिसणारे मंजर (दृष्य) अतिशय सुंदर होते. त्यावेळी मुस्लीम सरदार ‘मंजर ए सुभा’ असे या ठिकाणाला म्हणत होते. पुढे याच मंजर ए सुभाचे मांजरसुंबा झाले असावे, असे म्हटले जाते.या गडावर दोन बुरू ज असून एका पडलेल्या महलाचे अवशेष आहेत. या महालाच्या भिंती आजही या गडाच्या रुबाबाची साक्ष देत आहेत. महालाच्या भिंतीशेजारी साधारण २०० फूट लांब आणि १०० फूट रुंद आणि साधारण ८ फूट खोल एवढा मोठा तलाव आहे. या तलावात वांबोरीच्या बाजूने गडाच्या डोंगरात असणाऱ्या पाण्याच्या टाक्यातून हत्तीच्या मोटेव्दारे पाणी उपसा करण्यात येत होता. गडावर दोन बुरूज आणि एका महालाचे अवशेष शिल्लक आहेत. महालाच्या दोन भिंती शिल्लक आहेत. मात्र, भिंतींची उंची २० फुटापेक्षा अधिक आहे. या ठिकाणी दावल मलिक हे पिराचे ठिकाण आहे. बुुरूज आणि महालाच्या भिंतीवर अनेक प्रेमवीरांनी आपली नावे कोरून त्या ठिकाणी विद्रूपीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी अनेक संस्था, तरूण गु्रप यांनी श्रमदान करून गडाची डागडुजीचा प्रयत्न केलेला आहे. दुष्काळातही पाणी असणाऱ्या टाक्यावांबोरीच्या दिशेने गडावरून २० ते २५ फूट खाली डोंगर कोरून त्या ठिकाणी पाच पाण्याच्या टाक्या तयार करण्यात आलेल्या आहेत. या टाक्यांतील पाणी हत्तीच्या मोटेने गडावर उपसण्यात येत होते. हा वास्तूशास्त्रचा अद्भूत नमुना आहे. या ठिकाणी जाण्यासाठी अरूंद वाट असून अनेक ठिकाणी पायऱ्या कोसळलेल्या आहेत. या पाण्याच्या टाक्यात दुष्काळातही मुबलक पाणीसाठा असतो. टाक्यांची स्वच्छता झालेली नसल्याने शेवाळ साचले आहे.