शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीतील उर्जास्त्रोतांचे पुनरुज्जीवन गरजेचे- अशोक दलवाई; कृषी विद्यापीठात किसान आधार संमेलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 16:31 IST

भारत हा कृषिप्रधान देश असून आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतीशिवाय सार्वत्रिक विकास शक्य नाही.  उद्याच्या भविष्यासाठी शेतीकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. शेतीमधील नैसर्गिक उर्जास्त्रोताचे पुनरुजीवन करुन शेती भविष्यात हजारो वर्ष चांगल्या स्थितीत राहू शकेल. पयार्याने मानवाचे जीवनमान उंचावेल, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कोरडवाहू क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी केले.

राहुरी  :  भारत हा कृषिप्रधान देश असून आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतीशिवाय सार्वत्रिक विकास शक्य नाही.  उद्याच्या भविष्यासाठी शेतीकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. शेतीमधील नैसर्गिक उर्जास्त्रोताचे पुनरुजीवन करुन शेती भविष्यात हजारो वर्ष चांगल्या स्थितीत राहू शकेल. पयार्याने मानवाचे जीवनमान उंचावेल, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कोरडवाहू क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन आणि आत्मा, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित किसान आधार संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी दलवाई बोलत होते.  डॉ. अशोक दलवाई यांच्या हस्ते शुक्रवारी संमेलनाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा होते. प्रास्ताविक आणि स्वागत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. शदर गडाख यांनी केले. दलवाई पुढे म्हणाले, आज संपूर्ण जगाला जागतिक तापमानवाढीची समस्या भेडसावत आहे. माती व जमिनीतील पाण्याची प्रत खराब झाल्यामुळे आजची शेती धोक्यात आली आहे. मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी शेतीतील जैविक घटकांचे अवशेष पुन्हा मातीत मिसळवणे गरजेचे आहे. निसर्गाने मोफत दिलेल्या उर्जास्त्रोतांचा जास्तीत जास्त वापर करुन उर्जेची गरज भागवली पाहिजे. गेल्या चार वर्षात केंद्र सरकार शेती क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल करुन कृषी विस्ताराचे धोरण आखत आहे. पीक उत्पादन घेताना उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे आहे. शिवाजीराव जगताप यांनी कृषी विभागाचा आढावा सादर केला. डॉ. रावश्यान इस्मायलो यांनी आपले मनोगत रशियन भाषेत व्यक्त केले. अनुवाद डॉ.रविप्रकाश दाणी यांनी केला. कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, डॉ. प्रतापराव भोसले यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगरु डॉ. रविप्रकाश दाणी, उझबेकिस्तान येथील नमणगन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेचे डॉ. रावश्यान इस्मायलो, कामधेनु विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य प्रतापराव भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, डॉ. अशोक फरांदे,  सोपान कासार,  विजय कोते, विद्यापीठ अभियंता  मिलिंद ढोके, सुनीता पाटील, नाथाजी चौगुले उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.भगवान देशमुख यांनी केले. आभार डॉ. अशोक फरांदे यांनी मानले.