शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

प्लास्टिक पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : राज्य शासनाकडून पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या व विघटन न होणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी आणली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : राज्य शासनाकडून पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या व विघटन न होणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी आणली आहे. बंदी असूनही कोपरगाव शहरात आजही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. अशा पिशव्यांचा वापर करणाऱ्या अथवा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नगरपरिषदेमार्फत वारंवार कारवाई केली जाते. त्यामुळे व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात असून प्लास्टिक पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

कोपरगाव शहरात मोठी बाजारपेठ असल्याने अगदीच छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत मोठी दुकाने आहेत. या बाजारपेठेत विविध खरेदीसाठी तालुक्यासह इतर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. गेल्या अनेक वर्षांत ग्राहकांनाच मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांची सवय लागल्याने सेवा म्हणून व्यावसायिकांना ती दुकानात ठेवावीच लागत आहे. त्यावर पर्याय म्हणून ५० मायक्रोनच्या वरील प्लास्टिक पिशव्या वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर त्यापेक्षा खालची प्लास्टिक पिशवी वापरली तर दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे.

यानुसार अनेकवेळा नगरपरिषदेकडून प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली. परंतु, व्यापारी देखील आता ५० मायक्रोनच्या वरील पिशव्या वापरत आहेत. तरीही नगर परिषदेकडून कारवाई केली जाते. विशेष म्हणजे, ही कारवाई करताना पिशव्या किती मायक्रोनच्या आहेत हे तपासण्यासाठी कोणतेही यंत्र अथवा तंत्र नगर परिषदेकडे नाही. त्यामुळे चूक असल्यास प्रशासनाने अवश्य कारवाई करावी, अशी भावना व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.

.............

असे आहेत शहरातील व्यावसायिक

॰ खासगी व्यावसायिक दुकानदार- १०५७

॰ नगर परिषद गाळे धारक - ६५३

॰ सर्वच प्रकारचे पथविक्रेते - १३६८

॰ आठवडे बाजारातील सर्वच विक्रेते- २१५०

..............

कोपरगावात बहुतांश व्यावसायिक हे ५० मायक्राॅनपेक्षा अधिकच्या प्लास्टिक पिशव्या वापरतात. मात्र, काही पिशव्यांवर फक्त तसा शिक्का मारलेला असतो. तशा पिशव्यांच्या मायक्रोनची आमच्याकडे असलेल्या यंत्राने तपासणी केल्यानंतर कारवाई केली जाते.

- सुनील गोर्डे, उपमुख्याधिकारी, कोपरगाव

..........

सिंगल यूज प्लास्टिक पिशवी वापरण्यास समर्थन नाही. परंतु, व्यापारी वर्गाने ५० मायक्राॅनच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यास सुरुवात केली आहे. या पिशव्यांचे विघटन होते, असे देखील लिहिलेले असते. नगर परिषदेकडून अशी कारवाई होते, त्यावेळी पिशव्यांची तपासणी करून कारवाई करा म्हटले, तर त्यांच्याकडे तपसणीसाठी कोणतेही यंत्र, तंत्र नसते. त्यामुळे व्यावसायिकांना नियमात असताना देखील कारवाईला सामोरे जावे लागते.

- सुधीर डागा, कार्याध्यक्ष, व्यापारी महासंघ, कोपरगाव