शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेत पर्यावरणपूरक पर्यटन विकासाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 16:49 IST

जैवविविधतेचे लेणे व पर्यटनाचा नैसर्गिक वारसा लाभलेल्या अकोले तालुक्याने पर्यटन विकासाच्या माध्यमातून कात टाकली आहे.

हेमंत आवारीअकोले : जैवविविधतेचे लेणे व पर्यटनाचा नैसर्गिक वारसा लाभलेल्या अकोले तालुक्याने पर्यटन विकासाच्या माध्यमातून कात टाकली आहे. यातून पर्यटन विकासाला चालना मिळत आहे. आदिवासींचा आर्थिकस्तर उंचावण्यास हातभार लागत आहे. दरम्यान पर्यावरणपूरक पर्यटन विकास करण्याची गरज आहे. यासाठी हौशी पर्यटकांनी स्वयंशिस्त पाळून निसर्गाची हानी टाळावी, असे निसर्गप्रेमींना वाटते. शिखरस्वामिनी कळसूबाई, रामायणाची साक्ष असलेला आज्यापर्वत, लव-कुश यांचे जन्मस्थळ असलेला कोदनी येथील वाल्मिकऋषींचा तातोबागड, अगस्तीऋषी आश्रम, २६ गड किल्ले, हरिश्चंद्रगड, रतनगड, बित्तमगड, पट्टाकिल्ला, आंबित व्हॅली, कोंबड किल्ला, भैरवगड, दुर्गम फोफसंडी-बिताका आदिवासी पारंपरिक लोककला जतन करणारी खेडी, वनौषधी, रानपक्षी, रानफुल, वन्यजीव जंगल अन् शेखरु, बिबट्या तसेच ब्रिटिशकालीन भंडारदरा धरण ही पर्यटनाची बलस्थाने आहेत. आता निळवंडे धरणाची त्यात भर पडली आहे. अकोले तालुका जैवविविधतेसाठी ‘हॉट स्पॉट’ म्हणून ओळखला जातो. जंगलात हिरडा, बेहडा, खैर, सादडा, करंज, बांबू, कारवी, आंबा, काजू, फणस, करवंद झाडे दिसतात. खोकर, भेकर, रानमांजर, लांडगा, तरस, साळींदर, रानडुक्कर आदी जंगली प्राणी आढळतात. कोथळे, तोलारखिंड, हरिश्चंद्र रानात राष्ट्रीय पक्षी शेखरू दिसतोच. विश्रामगड परिसरात गिधड, घार, घुबड, वेडा राघू आकाशात घिरट्या घालतात. वाशेरे घाटात मोर फेर धरताना दिसतात. ६२९ वनस्पती, ५१२ रानफुल तर १५७ प्रकारचे पक्षी तालुक्यात असल्याने निर्सगप्रेमींचा सतस राबता आहे. प्रत्येक ऋतूत वेगळेपण दडलेले असून निसर्ग पर्यटन वृध्दिंगत होत आहे. दरम्यान भंडारदरा परिसरात काजवा महोत्सवासाठी आलेल्या पर्यटक साम्रद येथील गूढरम्य सांदन दरीची सफर करण्याचा आनंद घेतात. दरवर्षी मान्सूनच्या आगमनाची अवंता देत भंडारदरा परिसर लक्ष लक्ष काजव्यांच्या प्रकाश फुलांनी उजळून निघतो. दिवसभर सांदन दरीची सफर करायची. रात्री काजवे पाहण्याचा आनंद द्विगुणीत करतात.शेकरु दुर्मिळ; बिबटे बागायती क्षेत्राकडेदुर्मिळ होत चालेला ‘शेकरु’ या प्राण्याची संख्या तालुक्यातील हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्यात कोथळ्याच्या रानात पाचपटीने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. अभयारण्य क्षेत्रात केवळ नऊ ‘बिबटे’आढळल्याने जंगलातील बिबट्यांनी आपला मुक्काम बागायती ऊस क्षेत्राकडे वळविला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अभयारण्यक्षेत्रात वानर, माकड व रानडुक्कर यांच्यासह पक्ष्यांची संख्या वाढलेली आहे. तर चिमणी- कावळ्यांची संख्या कमालीची घटली आहे. राष्ट्रीय पक्षी ‘मोर’यांची संख्या ३२ असून रतनवाडीच्या पाणवठ्यावर १० निलगायी तसेच घाटनदेवी पाणवठ्यावर एक ‘रानगवा’आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. पाणी टंचाईचे सावट असताना देखील वन्यजीव विभागाने अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करुन पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी धडपड चालू ठेवली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर