शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

माहेश्वरी समाजाच्या उन्नतीसाठी योगदानाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 05:58 IST

मूळचा राजस्थानचा माहेश्वरी समाज आज महाराष्ट्राच्या कानाकोपºयात विखुरलेला आहे. राजकारणापासून ते शासकीय, व्यावसायिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात चोख कर्तव्य बजावत कुशलतेच्या जोरावर समाजाने यश मिळविले आहे

नेवासा (जि. अहमदनगर) : मूळचा राजस्थानचा माहेश्वरी समाज आज महाराष्ट्राच्या कानाकोपºयात विखुरलेला आहे. राजकारणापासून ते शासकीय, व्यावसायिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात चोख कर्तव्य बजावत कुशलतेच्या जोरावर समाजाने यश मिळविले आहे. मुळातच बुद्धिमान असल्याने अनेक मुख्यमंत्र्यांचे खास सल्लागार माहेश्वरी समाजच राहिलेला आहे, आता सर्वांना मिळून उपेक्षित व गरजू माहेश्वरी समाज बांधवांच्या उन्नतीसाठी योगदान द्यायचे आहे, असे आवाहन अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष शामसुंदर सोनी यांनी केले.देवगड येथे माहेश्वरी समाजाच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय नवचेतना महासभेची रविवारी सांगता झाली. व्यासपीठावर महासभेचे संघटन मंत्री अजय काबरा, माहेश्वरी महासभेचे उपसभापती अशोक बंग, संयुक्त मंत्री सतीश चरखा, प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी, जिल्हाध्यक्ष विठ्ठलदास असावा, जोत्स्ना लाहोटी, भिकूदास मर्दा, सत्यनारायण लाहोटी, अंजनीकुमार मुंदडा, ब्रिजलाल तोष्णीवाल, दिनेश सोमाणी होते.सोनी म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत माहेश्वरी समाजाची घटणारी लोकसंख्या चिंतनीय आहे. ३० लाखांची संख्या दहा लाखांवर आल्याचा अंदाज आहे. माहेश्वरी समाजाच्या हुशार तरूण व तरूणींच्या उच्च अभ्यासक्रमासाठी दिल्ली येथे अद्ययावत वसतिगृह उभारले जाणार आहे.संगमनेर येथील श्रीमती ललिता मालपाणी यांना राज्यस्तरीय महेश भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. रचनात्मक कला- शकुं तला सारडा (संगमनेर), कला क्षेत्रासाठी स्वाती अट्टल (सोनई, ता.नेवासा), १०० टक्के गुण प्राप्त करून दहावीत उत्तीर्ण झालेली सीया रामेश्वर जाजू (शेवगाव), कार्योपलब्धी पुरस्कारात शासकीय सेवा पुरस्कार सुमित मुंदडा (गंगापूर, जि.औरंगाबाद), सार्वजनिक कार्य पुरस्कार - डॉ. प्रेमकुमार भट्टड (दौंड, जि. पुणे), शैक्षणिक पुरस्कार - वर्षा झंवर-दोडिया (परभणी), साहित्य पुरस्कार - माया धुप्पड (जळगाव), उद्योग पुरस्कार - जितेंद्र राठी (जालना), ग्रामीण उद्योग पुरस्कार - आशिष मंत्री (जालना) यांना सन्मानित करण्यात आले. विशेष सार्वजनिक कार्य पुरस्कार - किशोर सोनी (औरंगाबाद), कला पुरस्कार - भूषण तोष्णीवाल (पुणे), व्यवसाय पुरस्कार - सोनाली भुतडा (औंध, पुणे) यांचाही गौरव करण्यात आला. राज्यातील माहेश्वरी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.