शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

माहेश्वरी समाजाच्या उन्नतीसाठी योगदानाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 05:58 IST

मूळचा राजस्थानचा माहेश्वरी समाज आज महाराष्ट्राच्या कानाकोपºयात विखुरलेला आहे. राजकारणापासून ते शासकीय, व्यावसायिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात चोख कर्तव्य बजावत कुशलतेच्या जोरावर समाजाने यश मिळविले आहे

नेवासा (जि. अहमदनगर) : मूळचा राजस्थानचा माहेश्वरी समाज आज महाराष्ट्राच्या कानाकोपºयात विखुरलेला आहे. राजकारणापासून ते शासकीय, व्यावसायिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात चोख कर्तव्य बजावत कुशलतेच्या जोरावर समाजाने यश मिळविले आहे. मुळातच बुद्धिमान असल्याने अनेक मुख्यमंत्र्यांचे खास सल्लागार माहेश्वरी समाजच राहिलेला आहे, आता सर्वांना मिळून उपेक्षित व गरजू माहेश्वरी समाज बांधवांच्या उन्नतीसाठी योगदान द्यायचे आहे, असे आवाहन अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष शामसुंदर सोनी यांनी केले.देवगड येथे माहेश्वरी समाजाच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय नवचेतना महासभेची रविवारी सांगता झाली. व्यासपीठावर महासभेचे संघटन मंत्री अजय काबरा, माहेश्वरी महासभेचे उपसभापती अशोक बंग, संयुक्त मंत्री सतीश चरखा, प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी, जिल्हाध्यक्ष विठ्ठलदास असावा, जोत्स्ना लाहोटी, भिकूदास मर्दा, सत्यनारायण लाहोटी, अंजनीकुमार मुंदडा, ब्रिजलाल तोष्णीवाल, दिनेश सोमाणी होते.सोनी म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत माहेश्वरी समाजाची घटणारी लोकसंख्या चिंतनीय आहे. ३० लाखांची संख्या दहा लाखांवर आल्याचा अंदाज आहे. माहेश्वरी समाजाच्या हुशार तरूण व तरूणींच्या उच्च अभ्यासक्रमासाठी दिल्ली येथे अद्ययावत वसतिगृह उभारले जाणार आहे.संगमनेर येथील श्रीमती ललिता मालपाणी यांना राज्यस्तरीय महेश भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. रचनात्मक कला- शकुं तला सारडा (संगमनेर), कला क्षेत्रासाठी स्वाती अट्टल (सोनई, ता.नेवासा), १०० टक्के गुण प्राप्त करून दहावीत उत्तीर्ण झालेली सीया रामेश्वर जाजू (शेवगाव), कार्योपलब्धी पुरस्कारात शासकीय सेवा पुरस्कार सुमित मुंदडा (गंगापूर, जि.औरंगाबाद), सार्वजनिक कार्य पुरस्कार - डॉ. प्रेमकुमार भट्टड (दौंड, जि. पुणे), शैक्षणिक पुरस्कार - वर्षा झंवर-दोडिया (परभणी), साहित्य पुरस्कार - माया धुप्पड (जळगाव), उद्योग पुरस्कार - जितेंद्र राठी (जालना), ग्रामीण उद्योग पुरस्कार - आशिष मंत्री (जालना) यांना सन्मानित करण्यात आले. विशेष सार्वजनिक कार्य पुरस्कार - किशोर सोनी (औरंगाबाद), कला पुरस्कार - भूषण तोष्णीवाल (पुणे), व्यवसाय पुरस्कार - सोनाली भुतडा (औंध, पुणे) यांचाही गौरव करण्यात आला. राज्यातील माहेश्वरी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.