शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अमृत पाणी योजनेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST

शहराची अमृत पाणी योजना अंतिम टप्प्यात लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन अमृत पाणी पुरवठा ...

शहराची अमृत पाणी योजना अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन अमृत पाणी पुरवठा योजनेत अनेक अडथळे होते. महापालिकेने सातत्याने पाठपुरावा केल्याने ३२ कि. मी. चे काम पूर्ण झाले असून, ही योजना अंतिम टप्प्यात आली आहे. ही योजना महिनाभरात पूर्ण होऊन शहराला ४५ लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.

केंद्र शासनाने अमृत पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली. महापालिकेमार्फत योजनेचे काम सुरू आहे. सन २०१७ मध्ये मुळा धरण येथून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले. जलवाहिनी टाकण्याच्या कामात अनेक अडथळे होते. शेतकऱ्यांनीही सुरुवातीला शेतातून पाइप टाकण्यास विरोध केला होता. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली. तत्कालीन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पाठपुरावा केला. स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनीही पाणी योजनेची पाहणी केली. महापालिकेतील सर्वच पदाधिकाऱ्यांनी पाणी योजनेत येणारे अडथळे दूर करण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. ही योजना ३५ कि.मी.ची आहे. यापैकी ३२ कि.मी. पर्यंत पाइप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३ कि.मी.चे काम पुढील महिनाभरात पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अमृत पाणी योजना पूर्ण करण्यासाठी सन २०१९ पर्यंत ठेकेदाराला मुदत होती; परंतु पाणी योजनेत अनेक अडथळे आले. शेतकऱ्यांनी महापालिकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे पाणी योजनेत मोठा अडथळा आला; परंतु पदाधिकारी व प्रशासनाने एकत्र येत अडथळ्यांवर मात करत जलवाहिनीचे काम पूर्ण केले असून, विळदघाट येथील जलशुद्धीकरण केंद्राचे कामही अंतिम टप्प्यात आहे. वसंत टेकडी येथील जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. या जलकुंभात ५० लाख लीटर पाणी साठविता येणार आहे. त्यामुळे शहराला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.

.....

१०७ कोटींची पाणी योजना

सुमारे १०७ कोटी रुपये खर्चून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढील एक महिन्यात पाणी योजना पूर्ण करण्याचा आदेश ठेकेदाराला देण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला महापालिकेकडून सहकार्य करण्यात येत आहे. मनपा आयुक्त शंकर गोरे प्रत्यक्ष कामाची पाहणी करून अडथळे दूर करत आहेत.

....

नवीन ४ लाख ५० हजार लीटर पाणी मिळणार

अमृत पाणी योजना पूर्ण झाल्यास शहराला ४ लाख ५० हजार लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. अमृत पाणी योजना पूर्ण झाल्यास शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होऊन सर्वच भागांना समान पाणी देणे शक्य होणार आहे.