शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

अमृत पाणी योजनेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST

शहराची अमृत पाणी योजना अंतिम टप्प्यात लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन अमृत पाणी पुरवठा ...

शहराची अमृत पाणी योजना अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन अमृत पाणी पुरवठा योजनेत अनेक अडथळे होते. महापालिकेने सातत्याने पाठपुरावा केल्याने ३२ कि. मी. चे काम पूर्ण झाले असून, ही योजना अंतिम टप्प्यात आली आहे. ही योजना महिनाभरात पूर्ण होऊन शहराला ४५ लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.

केंद्र शासनाने अमृत पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली. महापालिकेमार्फत योजनेचे काम सुरू आहे. सन २०१७ मध्ये मुळा धरण येथून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले. जलवाहिनी टाकण्याच्या कामात अनेक अडथळे होते. शेतकऱ्यांनीही सुरुवातीला शेतातून पाइप टाकण्यास विरोध केला होता. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली. तत्कालीन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पाठपुरावा केला. स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनीही पाणी योजनेची पाहणी केली. महापालिकेतील सर्वच पदाधिकाऱ्यांनी पाणी योजनेत येणारे अडथळे दूर करण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. ही योजना ३५ कि.मी.ची आहे. यापैकी ३२ कि.मी. पर्यंत पाइप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३ कि.मी.चे काम पुढील महिनाभरात पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अमृत पाणी योजना पूर्ण करण्यासाठी सन २०१९ पर्यंत ठेकेदाराला मुदत होती; परंतु पाणी योजनेत अनेक अडथळे आले. शेतकऱ्यांनी महापालिकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे पाणी योजनेत मोठा अडथळा आला; परंतु पदाधिकारी व प्रशासनाने एकत्र येत अडथळ्यांवर मात करत जलवाहिनीचे काम पूर्ण केले असून, विळदघाट येथील जलशुद्धीकरण केंद्राचे कामही अंतिम टप्प्यात आहे. वसंत टेकडी येथील जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. या जलकुंभात ५० लाख लीटर पाणी साठविता येणार आहे. त्यामुळे शहराला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.

.....

१०७ कोटींची पाणी योजना

सुमारे १०७ कोटी रुपये खर्चून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढील एक महिन्यात पाणी योजना पूर्ण करण्याचा आदेश ठेकेदाराला देण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला महापालिकेकडून सहकार्य करण्यात येत आहे. मनपा आयुक्त शंकर गोरे प्रत्यक्ष कामाची पाहणी करून अडथळे दूर करत आहेत.

....

नवीन ४ लाख ५० हजार लीटर पाणी मिळणार

अमृत पाणी योजना पूर्ण झाल्यास शहराला ४ लाख ५० हजार लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. अमृत पाणी योजना पूर्ण झाल्यास शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होऊन सर्वच भागांना समान पाणी देणे शक्य होणार आहे.