शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादीचा पाठिंबा

By | Updated: December 6, 2020 04:21 IST

अहमदनगर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर निदर्शने करण्यात ...

अहमदनगर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर निदर्शने करण्यात आली. यात दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देऊन शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हा युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे, शारदा लगड, प्रदेश सरचिटणीस अंबादास गारुडकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, अशोक बाबर, सबाजीराव गायकवाड, किसनराव लोटके, उद्धव दुसुंगे, सुहास कासार, केशव बेरड, रत्नाकर ठाणगे, सीताराम काकडे, आबासाहेब सोनवणे, मनोज कोकाटे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी भाषणात भाजप सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजप सरकार आडमुठी भूमिका घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून प्रश्‍न सोडविण्यास तयार नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याची तयारी भाजप सरकारने चालवली आहे. हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेले असतानादेखील केंद्र सरकार डोळेझाक करीत आहे. भर थंडीत आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर थंड पाण्याचा मारा केला जातोय. शेतकऱ्यांचे प्रश्‍न न सोडवता, मुठभर भांडवलदारांच्या फायद्यासाठी शेतकरीविरोधी धोरण राबविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शेलार यांनी शेतकरी विरोधी असलेल्या कृषी विधेयकाचा निषेध करून, शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला. तर भाजप सरकार भांडवलदारांच्या दावणीला बांधले गेले असून, त्यांचे हित जपण्यासाठी अशा पद्धतीने निर्णय घेत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला तातडीने हमीभाव देण्यात यावा, तसेच कृषीविषयक विधेयक तातडीने मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली.

----------------

फोटो - ०३ राष्ट्रवादी आंदोलन

केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर निदर्शने करून दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.