शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा गुरुवारी नगरमध्ये; श्रीगोंदा, शेवगाव, राहुरी, अकोले, कोपरगावात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:18 IST

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारविरोधात सुरू करण्यात आलेली हल्लाबोल यात्रा गुरुवारी नगरमध्ये येत आहे. श्रीगोंदा येथून उत्तर विभागाच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे़ श्रीगोंदा येथून शेवगाव, राहुरी, अकोले आणि कोपरगाव तालुक्यांत सभा होईल.

ठळक मुद्देतनपुरे, काळे, जगताप, पिचड, ढाकणे मैदानातश्रीगोंद्यात बड्या नेत्यांच्या प्रवेशाची चर्चानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरातून नगर जिल्ह्यातील हल्लाबोल यात्रेला गुरुवारी सुरुवात होईल.

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारविरोधात सुरू करण्यात आलेली हल्लाबोल यात्रा गुरुवारी नगरमध्ये येत आहे. श्रीगोंदा येथून उत्तर विभागाच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. श्रीगोंदा येथून शेवगाव, राहुरी, अकोले आणि कोपरगाव तालुक्यांत सभा होईल, अशी महिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.विविध मागण्यांसाठी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर हल्लाबोल आंदोलन हाती घेण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातून ही यात्रा कोपरगावमार्गे नाशिक जिल्ह्यात जाणार आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरातून नगर जिल्ह्यातील हल्लाबोल यात्रेला गुरुवारी सुरुवात होईल. तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. निवेदनानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे.गुरुवारी श्रीगोंद्यासह शेवगाव आणि राहुरी शहरात मोर्चा काढून सभा घेण्यात येणार आहे. राहुरी येथे सायंकाळी साडेसात वाजता सभा होणार असून, शिर्डी येथे मुक्काम असणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता अकोले येथील अगस्ती महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा होणार असून, कोपरगाव येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकात सायंकाळी ४ वाजता सभा होणार आहे. कोपरगावमार्गे यात्रा नाशिकडे रवाना होणार असल्याचे घुले म्हणाले. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजूषा गुंड, सरचिटणीस सोमनाथ धूत आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा विभाजनाबाबत घुलेंची सावध भूमिका

पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना घुले म्हणाले, जिल्हा विभाजनाचा विषय गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे़ जिल्ह्याच्या विभाजनाचा विषय सरकारच्या अखत्यारित आहे. पक्षाची बांधणी सुरू आहे. जुन्या नेत्यांना सोबत घेण्याबाबतचा निर्णय श्रेष्ठी घेतील. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, त्यानुसार रणनीती ठरविली जाईल.

तनपुरे, काळे, जगताप, पिचड, ढाकणे मैदानात

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सक्रिय झाले आहेत. श्रीगोंद्यात आमदार राहुल जगताप, शेवगावमध्ये माजी आमदार चंद्रशेखर घुले, नेवासा तालुक्यात विठ्ठलराव लंघे, श्रीरामपूरमध्ये अविनाश आदिक, राहुरीत प्राजक्ता तनपुरे, कोपरगावमध्ये आशुतोष काळे, अकोल्यात माजी मंत्री मधुकरराव पिचड हल्लाबोलच्या तयारी लागले आहेत. नगर शहरात आंदोलन नाही़ पण, आमदार संग्राम जगताप यांनी आंदोलनाची जोरदार तयारी सुरू केली आहे़ राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदारही हल्लाबोलच्या निमित्ताने सक्रिय झाल्याने राष्ट्रवादीत नवचैतन्य निर्माण झाले आहे.

श्रीगोंद्यात बड्या नेत्यांच्या प्रवेशाची चर्चा

उत्तर महाराष्ट्राच्या हल्लाबोल यात्रेची सुरुवात श्रीगोंद्यातून होत आहे. श्रीगोंदा तालुक्यात आंदोलनाची तयारी सुरू आहे. आंदोलनाच्या वेळी श्रीगोंदा तालुक्यातील दोन बड्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या श्रीगोंद्यात आहे. त्यांना सोबत घेऊन तालुक्यातील विरोधकांवर हल्लाबोल करण्याची तयारी जगताप यांनी सुरू केल्याचेही बोलले जात आहे.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAhmednagarअहमदनगर