शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

निघोजचे आॅनर किलिंग :सहा महिन्यांपासून दोन्ही कुटुंब तणावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 12:19 IST

दोन वर्षांपूर्वी कै. संदीप वराळ हत्याकांडाने हादरलेले निघोज आता आॅनर किलिंगच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले आहे. आंतरजातीय विवाहातून पित्यानेच मुलीचा खून केल्याची थरारक आणि तेवढीच माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने निघोज नि:शब्द झाले आहे.

भास्कर कवादनिघोज : दोन वर्षांपूर्वी कै. संदीप वराळ हत्याकांडाने हादरलेले निघोज आता आॅनर किलिंगच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले आहे. आंतरजातीय विवाहातून पित्यानेच मुलीचा खून केल्याची थरारक आणि तेवढीच माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने निघोज नि:शब्द झाले आहे. मुलीचा मृत्यू झाल्याची वार्ता येताच शहरावर शोककळा पसरली.पारनेर तालुक्यातील निघोज गावामध्ये उत्तरप्रदेश व बिहारसह परभणी, जालना, बीड, सोलापुर, लातूर या जिल्ह्यातून गवंडी व शेतमजुरीसाठी अनेक कुटुंब स्थलांतरित झालेली आहेत. अशा स्थलांतरित कुटुंबातील सदस्यांची संख्या पाच हजारांच्या आसपास आहे. रणसिंग कुटुंब हे अनेक वर्षापासून व तर भरतीया कुटुंब तीन-चार वर्षांपासून निघोजमध्ये स्थायिक आहे. रणसिंग कुटुंब गवंडी काम करते, तर भरतीया कुटुंब शेतमजुरी करीत होते. या दोन्ही कुटुंबातील मंगेश आणि रुक्मिणी यांचे प्रेम जुळले आणि त्यांनी विवाह केला. घरच्यांच्या विरोधात विवाह केल्याने दोन्ही कुटुंबातील संबंध सहा महिन्यापासून तणावग्रस्तच बनले. दोघांमध्ये स्वयंपाक करण्यावरुन भांडण झाले. रुक्मिणी ही माहेरी गेली. मंगेश हा रुक्मिणीला आणण्यासाठी गेला असता मंगेश व मुलीची आई, वडील, काका, मामा यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाली. मंगेशसोबत जाऊ नको, असा हट्ट रुक्मिणीच्या नातेवाईकांनी धरला आणि दुसरीकडे रुक्मिणीने मंगेशचा हात घट्ट धरला. यावेळी रागाच्या भरात मुलीच्या नातेवाईकांनी दोघांना मारहाण केली. घरात त्यांना कोंडले आणि घरातच रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यावर कळस म्हणजे रुक्मिणीच्या नातेवाईकांनी घर बंद करुन ते निघून गेले. आरडाओरडा झाल्याने शेजारच्यांनी घर उघडून दोघांना सरकारी रुग्णवाहिकेतून पुणे येथे ससून रुग्णालयात हलविले. ही घटना निघोजमध्ये मध्यवस्तीत घडली. त्यामुळे निघोजकरांच्या काळजाचा ठोकाच चुकला.पोलिसांसमोर आव्हानआंतरजातीय विवाहानंतर दोन्ही कुटुंबामध्ये समन्वय न राहिल्यास अशा घटना रोखणेही पोलिसांसमोर आव्हानच बनले आहे. पोलीस प्रशासनाबरोबर ग्रामपंचायतीकडेही निघोजमध्ये वास्तव्यास असणाºया बाहेरील राज्यातील व्यक्तिंची माहिती असणे आता गरजेचे झाले आहे. अन्यथा निघोजमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असे ग्रामस्थ सांगत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर