शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

निघोजचे आॅनर किलिंग :सहा महिन्यांपासून दोन्ही कुटुंब तणावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 12:19 IST

दोन वर्षांपूर्वी कै. संदीप वराळ हत्याकांडाने हादरलेले निघोज आता आॅनर किलिंगच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले आहे. आंतरजातीय विवाहातून पित्यानेच मुलीचा खून केल्याची थरारक आणि तेवढीच माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने निघोज नि:शब्द झाले आहे.

भास्कर कवादनिघोज : दोन वर्षांपूर्वी कै. संदीप वराळ हत्याकांडाने हादरलेले निघोज आता आॅनर किलिंगच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले आहे. आंतरजातीय विवाहातून पित्यानेच मुलीचा खून केल्याची थरारक आणि तेवढीच माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने निघोज नि:शब्द झाले आहे. मुलीचा मृत्यू झाल्याची वार्ता येताच शहरावर शोककळा पसरली.पारनेर तालुक्यातील निघोज गावामध्ये उत्तरप्रदेश व बिहारसह परभणी, जालना, बीड, सोलापुर, लातूर या जिल्ह्यातून गवंडी व शेतमजुरीसाठी अनेक कुटुंब स्थलांतरित झालेली आहेत. अशा स्थलांतरित कुटुंबातील सदस्यांची संख्या पाच हजारांच्या आसपास आहे. रणसिंग कुटुंब हे अनेक वर्षापासून व तर भरतीया कुटुंब तीन-चार वर्षांपासून निघोजमध्ये स्थायिक आहे. रणसिंग कुटुंब गवंडी काम करते, तर भरतीया कुटुंब शेतमजुरी करीत होते. या दोन्ही कुटुंबातील मंगेश आणि रुक्मिणी यांचे प्रेम जुळले आणि त्यांनी विवाह केला. घरच्यांच्या विरोधात विवाह केल्याने दोन्ही कुटुंबातील संबंध सहा महिन्यापासून तणावग्रस्तच बनले. दोघांमध्ये स्वयंपाक करण्यावरुन भांडण झाले. रुक्मिणी ही माहेरी गेली. मंगेश हा रुक्मिणीला आणण्यासाठी गेला असता मंगेश व मुलीची आई, वडील, काका, मामा यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाली. मंगेशसोबत जाऊ नको, असा हट्ट रुक्मिणीच्या नातेवाईकांनी धरला आणि दुसरीकडे रुक्मिणीने मंगेशचा हात घट्ट धरला. यावेळी रागाच्या भरात मुलीच्या नातेवाईकांनी दोघांना मारहाण केली. घरात त्यांना कोंडले आणि घरातच रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यावर कळस म्हणजे रुक्मिणीच्या नातेवाईकांनी घर बंद करुन ते निघून गेले. आरडाओरडा झाल्याने शेजारच्यांनी घर उघडून दोघांना सरकारी रुग्णवाहिकेतून पुणे येथे ससून रुग्णालयात हलविले. ही घटना निघोजमध्ये मध्यवस्तीत घडली. त्यामुळे निघोजकरांच्या काळजाचा ठोकाच चुकला.पोलिसांसमोर आव्हानआंतरजातीय विवाहानंतर दोन्ही कुटुंबामध्ये समन्वय न राहिल्यास अशा घटना रोखणेही पोलिसांसमोर आव्हानच बनले आहे. पोलीस प्रशासनाबरोबर ग्रामपंचायतीकडेही निघोजमध्ये वास्तव्यास असणाºया बाहेरील राज्यातील व्यक्तिंची माहिती असणे आता गरजेचे झाले आहे. अन्यथा निघोजमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असे ग्रामस्थ सांगत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर