शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

लोणी हवेलीत घडला नैसर्गिक चमत्कार

By admin | Updated: May 9, 2016 23:46 IST

विनोद गोळे ल्ल पारनेर जानेवारीतच पाण्याअभावी अनेकांचे बोअर बंद पडले़ शेतातील पिके जळाली़ बोअरचे पाणी बंद होऊन पाच महिने उलटल्यानंतर अचानक बंद बोअरमधून खळाखळा

विनोद गोळे ल्ल पारनेरजानेवारीतच पाण्याअभावी अनेकांचे बोअर बंद पडले़ शेतातील पिके जळाली़ बोअरचे पाणी बंद होऊन पाच महिने उलटल्यानंतर अचानक बंद बोअरमधून खळाखळा पाणी वाहू लागले़ या बोअरच्या पाण्याने विहिरीही भरल्याचा चमत्कार पारनेर तालुक्यातील लोणी हवेली हे गाव गेल्या चार दिवसांपासून अनुभवत आहे़ ऐन दुष्काळात खळाखळा वाहते पाणी पाहण्यासाठी बघ्यांची येथे गर्दी होत आहे़पारनेर शहरापासून सात कि़ मी. अंतरावर असणाऱ्या लोणी हवेली गावाने सर्वाधिक बंधारे बांधल्याने तेथे पाणी टंचाई कमी आहे. लोणी हवेलीतील खडकवाडी भाग परिसरातील शेतकऱ्यांच्या बोअरचे पाणी जानेवारीतच संपल्याने कांदा पाण्याअभावी वाळून गेला. सध्या सगळ्यांच्या जमिनी पडीक आहेत. त्या परिसराला गावातील विहिरीतून पाणी मिळावे म्हणून उपसरपंच संजय कोल्हे पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न करीत होते. पण गुरुवारी खडकवाडी परिसरातील राजेंद्र सीताराम सोंडकर यांना स्वत:च्या बोअरमधून पाण्याचा खळखळ आवाज ऐकू आला़ त्यांनी बोअर सुरू केला तर चक्क बंद पडलेल्या बोअरमधून मोठ्या प्रमाणात पाणी आले. सलग आठ तास बोअर चालल्यानंतर त्यांची विहिरही तुडुंब भरली. ही माहिती समजताच सरपंच सुभाष दुधाडे, उपसरपंच संजय कोल्हे, दादाभाऊ कोल्हे, ग्रामसेवक सुनील दुधाडे, शरद कोल्हे, बाजीराव दुधाडे, अशोक दुधाडे, योगेश कोल्हे, निलेश वाखारे यांच्यासह अनेकांनी खडकवाडी गाठली. राजेंद्र सोंडकर यांच्या बोअरमधून दीड इंचापर्यंत पाणी वाहत होते़ त्यांच्याच शेजारील सोपान तुकाराम कोल्हे, भास्कर विठ्ठल कोल्हे, सागर बाजीराव कोल्हे,जयराम सोनु कोल्हे,दिनानाथ त्रिंबक कोल्हे,पोपट माधव कोल्हे,राजेंद्र सिताराम कोल्हे, तुकाराम नामदेव कोल्हे,माधव कोल्हे यांच्या बोअरलाही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे़ आम्ही दिवसभर बोअर चालू ठेवले आहेत तरी पाणी बंदझालेनाही,असे सागर कोल्हे यांनी सांगीतले.हे पाणी आले कोठून?लोणी हवेलीच्या खडकवाडी परिसराला हंगा तलावाचा फुगवटा आहे. तेथील पाण्याचे झरे मोकळे झाल्याने पाणी येत असेल, असा अंदाज सरपंच सुभाष दुधाडे यांनी व्यक्त केला़ परंतु जानेवारीतच या सर्व बोअरचे पाणी कसे गेले, असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे नक्की पाणी आले कोठून, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे़