शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

मुंबईत होणार आमदारांचे राष्ट्रीय संमेलन, १५ ते १७ जूनदरम्यान एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटतर्फे आयोजन

By चंद्रकांत शेळके | Updated: June 8, 2023 20:18 IST

National Conference of MLAs in Mumbai: पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटतर्फे मुंबई येथील बीकेसी जीओ सेंटरमध्ये दि. १५ ते १७ जूनदरम्यान राष्ट्रीय विधायक संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

- चंद्रकांत शेळके अहमदनगर : पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटतर्फे मुंबई येथील बीकेसी जीओ सेंटरमध्ये दि. १५ ते १७ जूनदरम्यान राष्ट्रीय विधायक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी देशभरातील अडीच हजार आमदार उपस्थित राहतील, अशी अपेक्षा संयोजन समितीने व्यक्त केली आहे.

पद्मश्री पोपटराव पवार, संमेलन संयोजन समितीचे सदस्य योगेश पाटील यांनी गुरुवारी नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संमेलनाविषयी माहिती दिली. पुणे येथील एमआयटी स्कूल ॲाफ गव्हर्न्मेंटतर्फे हे संमेलन आयोजित केले आहे. भारतातील सर्व विधानसभा व विधानपरिषदेचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहे. नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रिय समाज निर्माण करण्यासाठी भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील २००० पेक्षा अधिक आमदार राष्ट्रीय विधायक संमेलनामध्ये एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर विचारविनिमय करणार आहेत.

राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मिकता व राष्ट्रीय सर्वांगीण शाश्वत विकास या मध्यवर्ती विचार त्रिसूत्रीचा प्रमुख उद्देश ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचे उदघाटन १६ जूनला होईल. तसेच १७ जूनला या संमेलनाचा समारोप होईल. संमेलनात ४० समांतर सत्र आणि गोलमेज परिषद होणार आहे. लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील चाकूरकर, मनोहर जोशी तसेच लोकसभेचे सभापती ओम बिल हे या संमेलनाचे मार्गदर्शक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या विचार चिंतनामधून हे संमेलन होत आहे. संमेलनात सार्वजनिक जीवनातील तणाव व्यवस्थापन, शाश्वत विकासाची साधने आणि प्रभाव, कल्याणकारी योजना, आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कौतुकास्पद विधानपद्धती, आपला मतदारसंघ विकसित करण्याची कला आणि कौशल्य, आदी विषयांवर मार्गदर्शन, चर्चा होणार आहे.

प्रत्येक सत्रामध्ये ५० आमदार चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक सत्राचे अध्यक्षपद विधानसभेचे सभापती, विधान परिषदेचे अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता हे भूषविणार आहेत. वेगवेगळ्या राज्यातील आमदारांना एकमेकांमध्ये संवाद घडविणे, सुशासनाच्या मुद्द्यांवर आणि लोकशाहीला शक्तिशाली बनविण्यासाठी संमेलनात चर्चा होईल. त्यामुळे या संमेलनातून देशातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघात शाश्वत स्वरूपाचा सर्वांगीण विकास साधण्याची नवचेतना, नवप्रेरणा, अभिनव व्यापक दृष्टी आणि निश्चित दिशा मिळेल, अशी अपेक्षा संयोजकांनी व्यक्त केली. 

टॅग्स :MLAआमदारPoliticsराजकारणMumbaiमुंबई