शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

राहाता पंचायत समितीसह तीन ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:20 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या ऑनलाईन उपस्थितीत २४ एप्रिल रोजी पंचायत राज दिनानिमित्त सन ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या ऑनलाईन उपस्थितीत २४ एप्रिल रोजी पंचायत राज दिनानिमित्त सन २०२०-२०२१ मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती यांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण १७ पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायती यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ३ ग्रामपंचायती व १ पंचायत समिती पात्र झालेल्या होत्या. पंचायत समिती राहाता यांना पंचायत समिती स्तरावरील सामान्य विभागातील पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच राहाता तालुक्यातील ग्रामपंचायत चंद्रापूर व लोहगाव यांना सामान्य विभागातील पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार व लोणी बुद्रूक (ता. राहाता) यांना ग्राम विकास आराखडा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी राहाता पंचायत समिती सभापती नंदा तांबे, उपसभापती, तसेच गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्यासह ग्रामपंचायत पुरस्कारार्थी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत चंद्रापूर, लोहगाव व लोणी बुद्रूक यांना पुरस्कृत करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी उपस्थित राहून पुरस्कार प्राप्त पंचायत राज संस्थांचे अभिनंदन व नियोजन केले.

------------

फोटो मेलवर

२४ पंचायत राज पुरस्कार

पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार अंतर्गत नगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समिती आणि राहाता तालुक्यातीलच लोणी बुद्रूक, चंद्रापूर व लोहगाव या तीन ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांनीही पुरस्कार प्राप्त संस्थांचे अभिनंदन केले.