शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जुन्या सिने सुवर्णयुगाच्या स्मृतीत रमले नगरकर रसिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:43 IST

१९५० आणि ६० चे दशक हिंदी चित्रपटांच्या दृष्टीने सुवर्णकाळ म्हटले जाते. दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद या त्रिमूर्तींनी हा काळ गाजविला.

विनायक डिक्करअहमदनगर : १९५० आणि ६० चे दशक हिंदी चित्रपटांच्या दृष्टीने सुवर्णकाळ म्हटले जाते. दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद या त्रिमूर्तींनी हा काळ गाजविला. अर्थात त्यांच्यासोबत अनेक अभिनेत्यांचे चित्रपटही यावेळी प्रदर्शित व्हायचे पण दिलीप, राज आणि देव यांची जादू त्या पिढीने अनुभवली. सुरुवातीच्या काळात सिनेमा तांत्रिकदृष्ट्या आजच्याइतका प्रगत नसायचा तरीही या कृष्णधवल चित्रपटांनी रसिकांना खिळवून ठेवले.याच सुवर्णयुगाच्या स्मृती पुन्हा एकदा नगरकरांना अनुभवायास मिळणार आहेत. त्याची सुरुवातही झाली आहे. जुन्या काळात गाजलेले हिंदी-मराठी चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. सिने नॉस्टाल्जिया या उपक्रमांतर्गत त्याची सुरुवात १० जुुलैपासून आशा चित्रपटगृहात झाली आहे. मधुमती, श्री ४२० आणि सीआयडी हे चित्रपट आतापर्यंत दाखविण्यात आले. प्रत्येक आठवड्यात बुधवार आणि गुरुवारी सायंकाळी या चित्रपटांचे शो आयोजित केले आहेत. दि.३१ आणि १ रोजी अशोककुमार, मधुबाला यांचा ‘हावडा ब्रिज’ पाहता येईल. चित्रपट जरी जुनी असले तरी सध्याच्या काळानुरूप ध्वनीव्यवस्था त्यासाठी आहे. नगरचे ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक नंदकिशोर आढाव आणि दिलीप अकोलकर यांनी उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. किमान एक वर्षभर हा उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी रसिकांना आपल्या सूचना, अभिप्रायदेखील कळविता येणार आहे. आशा चित्रपटगृहाचे मालक विलास करंदीकर यांचेही बहुमोल सहकार्य या उपक्रमास लाभणार आहे. हा उपक्रम वर्षभर चालू राहिल्यास त्याची विक्रम म्हणून नोंद होईल. नगरकर रसिकांना उत्तमोत्तम दर्जेदार चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याचा आनंद मिळणार आहे. व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, के.आसिफ, रामानंद सागर, गुरूदत्त, बी. आर. चोप्रा, एस.मुखर्जी आदी दिग्दर्शक तर प्रभात, जेमिनी, वासन अशा नामांकित बॅनरचे चित्रपट या उपक्रमात समाविष्ट असणार आहेत.उपक्रमास प्रतिसाद देऊन यात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर