शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

नगरचे नागपूर संकटात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 15:40 IST

नगरचे नागपूर म्हणून प्रसिद्ध असणारे नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथील ५०० एकर संत्रा बागा दुष्काळी परिस्थितीमुळे जळाल्या आहेत़ संत्रा बागांना देण्यासाठी पाणीच नसल्याने शेतकरी व फळबागा संकटात सापडल्या आहेत.

योगेश गुंडअहमदनगर : नगरचे नागपूर म्हणून प्रसिद्ध असणारे नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथील ५०० एकर संत्रा बागा दुष्काळी परिस्थितीमुळे जळाल्या आहेत़ संत्रा बागांना देण्यासाठी पाणीच नसल्याने शेतकरी व फळबागा संकटात सापडल्या आहेत. फक्त संत्र्यामुळे कोट्यवधींचे उत्पन्न मिळवणारे शेतकरी आता आर्थिक चक्रव्यूहात सापडले आहेत़गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याला वसलेले, तिन्ही बाजूंनी उंच डोंगररांगा असणारे नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी हे गाव संत्रा उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. हलकी व वाळवट जमीन, पाण्याचा निचरा करण्याची क्षमता असणारी माती, गार व स्वच्छ हवामान यामुळे या गावात संत्राचे फळ मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या गावात सुमारे ५०० एकर क्षेत्रावर संत्रा फळांची लागवड करण्यात आली. मात्र सतत दोन वर्षांपासून तालुक्यात दुष्काळ पडत असल्याने या बागांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सुमारे ३०० एकर संत्रा बागा पाण्याअभावी शेतकऱ्यांनी तोडून त्याचे सरपण केले. पाण्याअभावी गेल्या दोन वर्षांपासून या गावातील संत्रा फळांचे उत्पादन ठप्प झाले आहे. काही शेतकऱ्यांनी टँकरने विकतचे पाणी आणून कशाबशा बागा जगवण्याचा प्रयत्न चालवला आहे. विकतच्या पाण्यासाठी एकरी ५० हजारांचा खर्च येत असल्याने उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नाही़ त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक चक्रव्यूहात सापडला आहे़ काही शेतकरी संत्रा बागांऐवजी डाळिंब लागवडीकडे वळाले आहेत.येथील संत्रा नगर, पुणे, मुंबई, केरळ येथे विक्रीसाठी जातात. अनेक व्यापारी थेट गावात येऊन संत्रा खरेदी करतात. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे संत्रा फळांचे उत्पादन कमालीचे घटले आहे.संत्रा फळांच्या विक्रीतून सर्व खर्च वजा करता एकरी ६० ते ७० हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न शेतकºयांना मिळते. एकरी १० टन इतक्या फळांचे उत्पादन शेतकरी घेत होते. मात्र, यंदा हाती काहीच न लागल्याने शेतकरी उद्ध्वस्त होत आहे़आमच्याकडे पाच एकर संत्रा बाग होती़ मात्र सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आता केवळ अडीच एकर संत्रा बाग आहे़ निम्म्या बागा आम्ही तोडल्या आहेत. पाणी नसल्याने संत्रा बागा जळून चालल्या होत्या. सरकारने फळबागा जगवण्यासाठी योजना राबवल्या तरच भविष्यात फळबागा जगवता येईल. -कमालभाई शेख, संत्रा उत्पादक शेतकरीआमच्याकडे दोन एकरची संत्रा बाग होती़ मात्र पाण्याअभावी आम्ही बाग काढून टाकली़ तीन शेततळे आहेत. मात्र ते सर्व कोरडेठाक आहेत. संत्रा बाग नसल्याने आमचे वर्षाला पाच लाखांचे नुकसान झाले आहे. -सुभाष वाघ, माजी सरपंच, पिंपळगाव उज्जैनी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर