शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नगरचे नागपूर संकटात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 15:40 IST

नगरचे नागपूर म्हणून प्रसिद्ध असणारे नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथील ५०० एकर संत्रा बागा दुष्काळी परिस्थितीमुळे जळाल्या आहेत़ संत्रा बागांना देण्यासाठी पाणीच नसल्याने शेतकरी व फळबागा संकटात सापडल्या आहेत.

योगेश गुंडअहमदनगर : नगरचे नागपूर म्हणून प्रसिद्ध असणारे नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथील ५०० एकर संत्रा बागा दुष्काळी परिस्थितीमुळे जळाल्या आहेत़ संत्रा बागांना देण्यासाठी पाणीच नसल्याने शेतकरी व फळबागा संकटात सापडल्या आहेत. फक्त संत्र्यामुळे कोट्यवधींचे उत्पन्न मिळवणारे शेतकरी आता आर्थिक चक्रव्यूहात सापडले आहेत़गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याला वसलेले, तिन्ही बाजूंनी उंच डोंगररांगा असणारे नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी हे गाव संत्रा उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. हलकी व वाळवट जमीन, पाण्याचा निचरा करण्याची क्षमता असणारी माती, गार व स्वच्छ हवामान यामुळे या गावात संत्राचे फळ मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या गावात सुमारे ५०० एकर क्षेत्रावर संत्रा फळांची लागवड करण्यात आली. मात्र सतत दोन वर्षांपासून तालुक्यात दुष्काळ पडत असल्याने या बागांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सुमारे ३०० एकर संत्रा बागा पाण्याअभावी शेतकऱ्यांनी तोडून त्याचे सरपण केले. पाण्याअभावी गेल्या दोन वर्षांपासून या गावातील संत्रा फळांचे उत्पादन ठप्प झाले आहे. काही शेतकऱ्यांनी टँकरने विकतचे पाणी आणून कशाबशा बागा जगवण्याचा प्रयत्न चालवला आहे. विकतच्या पाण्यासाठी एकरी ५० हजारांचा खर्च येत असल्याने उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नाही़ त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक चक्रव्यूहात सापडला आहे़ काही शेतकरी संत्रा बागांऐवजी डाळिंब लागवडीकडे वळाले आहेत.येथील संत्रा नगर, पुणे, मुंबई, केरळ येथे विक्रीसाठी जातात. अनेक व्यापारी थेट गावात येऊन संत्रा खरेदी करतात. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे संत्रा फळांचे उत्पादन कमालीचे घटले आहे.संत्रा फळांच्या विक्रीतून सर्व खर्च वजा करता एकरी ६० ते ७० हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न शेतकºयांना मिळते. एकरी १० टन इतक्या फळांचे उत्पादन शेतकरी घेत होते. मात्र, यंदा हाती काहीच न लागल्याने शेतकरी उद्ध्वस्त होत आहे़आमच्याकडे पाच एकर संत्रा बाग होती़ मात्र सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आता केवळ अडीच एकर संत्रा बाग आहे़ निम्म्या बागा आम्ही तोडल्या आहेत. पाणी नसल्याने संत्रा बागा जळून चालल्या होत्या. सरकारने फळबागा जगवण्यासाठी योजना राबवल्या तरच भविष्यात फळबागा जगवता येईल. -कमालभाई शेख, संत्रा उत्पादक शेतकरीआमच्याकडे दोन एकरची संत्रा बाग होती़ मात्र पाण्याअभावी आम्ही बाग काढून टाकली़ तीन शेततळे आहेत. मात्र ते सर्व कोरडेठाक आहेत. संत्रा बाग नसल्याने आमचे वर्षाला पाच लाखांचे नुकसान झाले आहे. -सुभाष वाघ, माजी सरपंच, पिंपळगाव उज्जैनी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर