शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

नगरचे नागपूर संकटात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 15:40 IST

नगरचे नागपूर म्हणून प्रसिद्ध असणारे नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथील ५०० एकर संत्रा बागा दुष्काळी परिस्थितीमुळे जळाल्या आहेत़ संत्रा बागांना देण्यासाठी पाणीच नसल्याने शेतकरी व फळबागा संकटात सापडल्या आहेत.

योगेश गुंडअहमदनगर : नगरचे नागपूर म्हणून प्रसिद्ध असणारे नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथील ५०० एकर संत्रा बागा दुष्काळी परिस्थितीमुळे जळाल्या आहेत़ संत्रा बागांना देण्यासाठी पाणीच नसल्याने शेतकरी व फळबागा संकटात सापडल्या आहेत. फक्त संत्र्यामुळे कोट्यवधींचे उत्पन्न मिळवणारे शेतकरी आता आर्थिक चक्रव्यूहात सापडले आहेत़गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याला वसलेले, तिन्ही बाजूंनी उंच डोंगररांगा असणारे नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी हे गाव संत्रा उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. हलकी व वाळवट जमीन, पाण्याचा निचरा करण्याची क्षमता असणारी माती, गार व स्वच्छ हवामान यामुळे या गावात संत्राचे फळ मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या गावात सुमारे ५०० एकर क्षेत्रावर संत्रा फळांची लागवड करण्यात आली. मात्र सतत दोन वर्षांपासून तालुक्यात दुष्काळ पडत असल्याने या बागांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सुमारे ३०० एकर संत्रा बागा पाण्याअभावी शेतकऱ्यांनी तोडून त्याचे सरपण केले. पाण्याअभावी गेल्या दोन वर्षांपासून या गावातील संत्रा फळांचे उत्पादन ठप्प झाले आहे. काही शेतकऱ्यांनी टँकरने विकतचे पाणी आणून कशाबशा बागा जगवण्याचा प्रयत्न चालवला आहे. विकतच्या पाण्यासाठी एकरी ५० हजारांचा खर्च येत असल्याने उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नाही़ त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक चक्रव्यूहात सापडला आहे़ काही शेतकरी संत्रा बागांऐवजी डाळिंब लागवडीकडे वळाले आहेत.येथील संत्रा नगर, पुणे, मुंबई, केरळ येथे विक्रीसाठी जातात. अनेक व्यापारी थेट गावात येऊन संत्रा खरेदी करतात. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे संत्रा फळांचे उत्पादन कमालीचे घटले आहे.संत्रा फळांच्या विक्रीतून सर्व खर्च वजा करता एकरी ६० ते ७० हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न शेतकºयांना मिळते. एकरी १० टन इतक्या फळांचे उत्पादन शेतकरी घेत होते. मात्र, यंदा हाती काहीच न लागल्याने शेतकरी उद्ध्वस्त होत आहे़आमच्याकडे पाच एकर संत्रा बाग होती़ मात्र सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आता केवळ अडीच एकर संत्रा बाग आहे़ निम्म्या बागा आम्ही तोडल्या आहेत. पाणी नसल्याने संत्रा बागा जळून चालल्या होत्या. सरकारने फळबागा जगवण्यासाठी योजना राबवल्या तरच भविष्यात फळबागा जगवता येईल. -कमालभाई शेख, संत्रा उत्पादक शेतकरीआमच्याकडे दोन एकरची संत्रा बाग होती़ मात्र पाण्याअभावी आम्ही बाग काढून टाकली़ तीन शेततळे आहेत. मात्र ते सर्व कोरडेठाक आहेत. संत्रा बाग नसल्याने आमचे वर्षाला पाच लाखांचे नुकसान झाले आहे. -सुभाष वाघ, माजी सरपंच, पिंपळगाव उज्जैनी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर