शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

नगरला सर्वोत्कृष्ट भूजल पुनरूज्जीवन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 16:56 IST

राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये झालेल्या कामांची दखल राष्ट्रीय पातळीवरून घेण्यात आली असून, केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्राची सर्वोष्कृष्ट राज्य म्हणून निवड झाली आहे. यात नगरला सर्वोत्कृष्ट भूजल पुनरूज्जीवन पुरस्कार मिळाला आहे.

अहमदनगर : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये झालेल्या कामांची दखल राष्ट्रीय पातळीवरून घेण्यात आली असून, केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्राची सर्वोष्कृष्ट राज्य म्हणून निवड झाली आहे. यात नगरला सर्वोत्कृष्ट भूजल पुनरूज्जीवन पुरस्कार मिळाला आहे. सोमवारी पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे यांनी तो दिल्लीत स्वीकारला.केंद्रीय जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय जल पुरस्कार २०१८मध्ये महाराष्ट्र राज्याने जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेल्या कामागिरीची नोंद घेतली आहे. जलयुक्त शिवार अभियानाद्वारे महाराष्ट्रातील सुमारे १६ हजार गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. तसेच या कामांमुळे अनेक गावांतील भूजल पातळीत वाढ होऊन पाण्याची टंचाई दूर झाली आहे. गेल्या वर्षात टँकरच्या संख्येतही घट झाली होती. राज्य शासनाच्या या कामाची दखल केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये घेण्यात आली आहे. या पुरस्कारात सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. यात विविध गटात राज्याला दहा पुरस्कार मिळाले. त्यात भूजल पुनरुज्जीवन विभागात नगरला प्रथम पुरस्कार मिळाला.पुरस्काराबद्दल जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. गेल्या चार वर्षात या योजनेमध्ये चांगले काम झाले. सचिव एकनाथ डवले म्हणाले की, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, नदी पुनरुज्जीवन या सारख्या योजनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या व शेतीच्या विकासासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत.लोणारे यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुकजलयुक्त शिवार अभियानामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे यांनी राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले़ नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेले नाविण्यापूर्ण उपक्रम राज्यासाठी मार्गदर्शक असल्याचे सांगत लोणारे यांनी तयार केलेल्या जलयुक्त शिवार अभियान या पुस्तिकेचे विमोचनही फडणवीस यांनी मुंबई येथे केले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर