शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

आयुष्मान कार्ड काढण्यात नगर जिल्हा राज्यात प्रथम; राज्यात ९२ लाखांचा टप्पा पार

By चंद्रकांत शेळके | Updated: December 21, 2023 21:33 IST

राज्यात गेल्या तीन महिन्यांत एकूण ९२ लाख ६९ हजार कार्ड काढण्यात आले आहेत.

अहमदनगर : पाच लाखांचा कौटुंबिक आरोग्य विमा असलेली राज्य व केंद्र सरकारच्याआयुष्मान भारत जन आरोग्य योजनेत नगर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात सर्वाधिक ६ लाख ३९ हजार आयुष्मान कार्ड नगर जिल्ह्याने लाभार्थ्यांना दिले आहेत. दरम्यान, राज्यात गेल्या तीन महिन्यांत एकूण ९२ लाख ६९ हजार कार्ड काढण्यात आले आहेत.

प्रारंभी केवळ दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना असलेली आयुष्मान भारत जनआरोग्य योजना आता टप्प्याटप्प्याने सर्वांनाच लागू होत आहे. केंद्राच्या आयुष्मान भारत योजनेद्वारे पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. दुसरीकडे राज्यात महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येतच होती. आता या दोन्ही योजना एकत्र करण्यात आल्या असून, दोन्ही योजनांचे मिळून एकच आयुष्मान कार्ड देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच शिधापत्रिकाधारक आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवास प्रमाणपत्र असणाऱ्यास या योजनेचा फायदा होणार आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे १३ लाख ८२ हजार ६६२, तर महात्मा फुले योजनेचे १७ लाख ८२ हजार ४५३ लाभार्थी आहेत. असे एकूण ३१ लाख ६५ हजार १२४ लाभार्थ्यांना आता आयुष्मान कार्डचे वाटप आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. त्यांपैकी गेल्या तीन महिन्यांत ६ लाख ३९ हजार कार्ड काढले असून एकूण कार्डचा आकडा ११ लाखांच्या पुढे गेला आहे.

दरम्यान, हे कार्ड काढण्यात नगर जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत म्हणजे १३ सप्टेेंबरपासून १७ डिसेंबरपर्यंत राज्यात एकूण ९२ लाख ६९ हजार ७१४ आयुष्मान कार्ड काढण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक ६ लाख ३९ हजार ३७४ कार्ड काढून नगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

जिल्ह्यात ४२ खासगी रुग्णालयांत मिळणार उपचारया योजने अंतर्गत वर्षभरात एका कुटुंबास ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. त्यासाठी जिल्हा रुग्णालय व ४२ खासगी रुग्णालयांची निवड जिल्ह्यात करण्यात आलेली आहे. त्यातील १४ खासगी रुग्णालये नगर शहरातील आहेत. हे कार्ड असेल तर कोणताही रुग्ण या खासगी रुग्णालयांत ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार घेऊ शकतो.

सर्व लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे. मोबाइलमध्येही ते काढता येते. शिवाय सर्व ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र, आशा सेविका किंवा ग्रामपंचायत योजनेतील रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्रांच्या मदतीने हे कार्ड काढता येते.- डाॅ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी

गेल्या तीन महिन्यातील कार्डनिर्मितीअहमदनगर - ६ लाख ३९ हजारनाशिक - ६ लाख २७ हजारसांगली - ५ लाख ६१ हजारपुणे - ४ लाख ६७ हजारनागपूर - ५ लाख ९० हजारऔरंगाबाद - २ लाख ४८ हजारकोल्हापूर - ४ लाख ६७ हजार. 

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतAhmednagarअहमदनगरGovernmentसरकार