शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डास तिहेरी तलाकवरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अमान्य : मौलाना बसतवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 15:29 IST

मतांसाठी धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप केला जात असून तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर तेच केले जात आहे. प्रत्येक सामाजिक बाबीचा राजकीय स्वार्थासाठी लाभ उठविण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

श्रीरामपूर : तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला मान्य नाही. ब्रिटिशांनी अंमलात आणलेला मुस्लिम विवाह क ायदा आजही अस्तित्वात असून शरीयतवरच आमचा विश्वास कायम आहे. हिंदू स्त्रियांना समानतेचा अधिकार नाकारला जात असताना दुस-या बाजूला मुस्लिम महिला संकटात असल्याचा दुष्प्रचार केला जात आहे, असा आरोप बोर्डाचे सचिव मौलाना अतिक अहमद बसतवी यांनी केला आहे.मतांसाठी धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप केला जात असून तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर तेच केले जात आहे. प्रत्येक सामाजिक बाबीचा राजकीय स्वार्थासाठी लाभ उठविण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.औरंगाबाद, मालेगाव नंतर श्रीरामपूरमध्ये आयोजित राज्यातील २९ व्या मुस्लिम क ौटुंबिक न्यायालयाच्या उद्घाटनासाठी आले असता ते सोमवारी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मौलाना तरबेज आलम काझमी, मौलाना क ाझी शफीकूर रहमान, मौलाना अन्वर नदवी, काझी अशफाक आदी उपस्थित होते. न्यायालय भरले आहे. येथून उचित न्याय निवाडे केले जातील असे मौलाना बसतवी यावेळी म्हणाले. मौलाना इर्शादुल्लाह मखदुमी हे न्यायालयाचे कामकाज पाहणार आहेत. नगर जिल्ह्यातील वैवाहिक, मालमत्ता, तलाक व इतर दहा वैयक्तिक दिवाणी वादांची येथे सोडवणूक केली जाणार आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या न्यायालयांची लवकरच उभारणी करणार असल्याचे मौलाना बसतवी यांनी यावेळी सांगितले.ते म्हणाले क ी, देशात ३ क ोटी खटले पडून आहेत. प्रत्येक खटल्यावर सरकारी तिजोरीतून दहा लाख रुपये खर्च होत आहेत. वेळ व पैसा खर्च करण्यापेक्षा प्रत्येक धर्मातील क ौटुंबिक वादांचा निपटारा आपापल्या स्तरावर करणे उचित ठरेल. समाजातील गरीब घटकांकडे वकिलांच्या शुल्कासाठी पैसे नाहीत. त्यामुळे त्यांना न्यायापासून वंचित रहावे लागत आहे. इस्लाम, शरीयत आणि हदिसमध्ये जे सांगितले आहे त्याच गोष्टींवर आम्ही अंमल करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या तलाकवरील निकालानंतर महिलांना न्याय मिळण्याऐवजी अनेक जटील समस्या तयार झाल्या आहेत. त्या आता समोर येऊ लागल्या आहेत.

वंदे मातरम् राष्ट्रगीत नव्हे

वंदे मातरम् हे भारताचे राष्ट्रगीत नसून त्यास कोणताही घटनात्मक आधार नाही. त्याची सक्ती करणारे देशभक्त कसे काय असू शकतात?, असा सवाल काझी अशफाक यांनी यावेळी केला. बोर्ड ही बिगर राजकीय संस्था असून गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही राजकीय भूमिका घेतली जाणार नाही. बोर्डाच्या एखाद्या सदस्याची भूमिका ही वैयक्तिक असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHigh Courtउच्च न्यायालयMuslimमुस्लीम