शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डास तिहेरी तलाकवरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अमान्य : मौलाना बसतवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 15:29 IST

मतांसाठी धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप केला जात असून तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर तेच केले जात आहे. प्रत्येक सामाजिक बाबीचा राजकीय स्वार्थासाठी लाभ उठविण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

श्रीरामपूर : तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला मान्य नाही. ब्रिटिशांनी अंमलात आणलेला मुस्लिम विवाह क ायदा आजही अस्तित्वात असून शरीयतवरच आमचा विश्वास कायम आहे. हिंदू स्त्रियांना समानतेचा अधिकार नाकारला जात असताना दुस-या बाजूला मुस्लिम महिला संकटात असल्याचा दुष्प्रचार केला जात आहे, असा आरोप बोर्डाचे सचिव मौलाना अतिक अहमद बसतवी यांनी केला आहे.मतांसाठी धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप केला जात असून तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर तेच केले जात आहे. प्रत्येक सामाजिक बाबीचा राजकीय स्वार्थासाठी लाभ उठविण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.औरंगाबाद, मालेगाव नंतर श्रीरामपूरमध्ये आयोजित राज्यातील २९ व्या मुस्लिम क ौटुंबिक न्यायालयाच्या उद्घाटनासाठी आले असता ते सोमवारी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मौलाना तरबेज आलम काझमी, मौलाना क ाझी शफीकूर रहमान, मौलाना अन्वर नदवी, काझी अशफाक आदी उपस्थित होते. न्यायालय भरले आहे. येथून उचित न्याय निवाडे केले जातील असे मौलाना बसतवी यावेळी म्हणाले. मौलाना इर्शादुल्लाह मखदुमी हे न्यायालयाचे कामकाज पाहणार आहेत. नगर जिल्ह्यातील वैवाहिक, मालमत्ता, तलाक व इतर दहा वैयक्तिक दिवाणी वादांची येथे सोडवणूक केली जाणार आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या न्यायालयांची लवकरच उभारणी करणार असल्याचे मौलाना बसतवी यांनी यावेळी सांगितले.ते म्हणाले क ी, देशात ३ क ोटी खटले पडून आहेत. प्रत्येक खटल्यावर सरकारी तिजोरीतून दहा लाख रुपये खर्च होत आहेत. वेळ व पैसा खर्च करण्यापेक्षा प्रत्येक धर्मातील क ौटुंबिक वादांचा निपटारा आपापल्या स्तरावर करणे उचित ठरेल. समाजातील गरीब घटकांकडे वकिलांच्या शुल्कासाठी पैसे नाहीत. त्यामुळे त्यांना न्यायापासून वंचित रहावे लागत आहे. इस्लाम, शरीयत आणि हदिसमध्ये जे सांगितले आहे त्याच गोष्टींवर आम्ही अंमल करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या तलाकवरील निकालानंतर महिलांना न्याय मिळण्याऐवजी अनेक जटील समस्या तयार झाल्या आहेत. त्या आता समोर येऊ लागल्या आहेत.

वंदे मातरम् राष्ट्रगीत नव्हे

वंदे मातरम् हे भारताचे राष्ट्रगीत नसून त्यास कोणताही घटनात्मक आधार नाही. त्याची सक्ती करणारे देशभक्त कसे काय असू शकतात?, असा सवाल काझी अशफाक यांनी यावेळी केला. बोर्ड ही बिगर राजकीय संस्था असून गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही राजकीय भूमिका घेतली जाणार नाही. बोर्डाच्या एखाद्या सदस्याची भूमिका ही वैयक्तिक असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHigh Courtउच्च न्यायालयMuslimमुस्लीम