शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच नियुक्तीबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितला पालकमंत्र्यांचा अधिकार, मुश्रिफ यांचे अण्णांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 11:40 IST

पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा शासनाचाच एक प्रतिनिधी असतो. त्यामुळे यामध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याचे कारण नाही, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना तत्काळ दिलेल्या पत्रात म्हटले आहे.  या पत्रात पालकमंत्र्यांचे काय अधिकार असतात, हेच मुश्रिफ यांनी अण्णांना पटवून दिले आहे.

अहमदनगर : कोरोनाच्या स्थितीमध्ये सर्वच शासकीय यंत्रणा काम करते आहे. अशा स्थितीत निवडणुका घेता येणे शक्य नाही. त्यामुळे कायद्याचा आधार आणि विधी विभागाने दिलेला सल्ला यानुसारच ग्रामपंचायतीवर योग्य व्यक्तीची निवड करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना दिलेले आहेत. पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा शासनाचाच एक प्रतिनिधी असतो. त्यामुळे यामध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याचे कारण नाही, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना तत्काळ दिलेल्या पत्रात म्हटले आहे.  या पत्रात पालकमंत्र्यांचे काय अधिकार असतात, हेच मुश्रिफ यांनी अण्णांना पटवून दिले आहे.

ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश हा राजकीय हेतुने प्रेरीत असून यामुळे घोडेबाजार होईल. पालकमंत्र्यांना प्रशासक नियुक्तीचा अधिकार हा घटनाबाह्य असल्याचे अण्णा हजारे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळविले होते. त्याला मंत्री मुश्रिफ यांनी तत्काळ उत्तर दिले आहे. पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा शासनाचा प्रतिनिधी म्हणूनच कामकाज पाहत असतो. विविध समित्यांवरील सदस्य पालकमंत्रीच नियुक्त करतात. जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचा भाग म्हणून पालकमंत्री कार्यरत असतो. जिल्ह्याच्या नियोजन मंडळाचा तो अध्यक्ष असतो. जिल्ह्याच्या आपत्कालीन स्थितीमध्ये जिल्हा प्रशासन व शासन यामध्ये तो दुवा म्हणून काम करतो. पालकमंत्र्यांना माझ्या स्वत:च्या सहीने पत्र देऊन चांगल्या, कार्यक्षम व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे. चुकीचे काही झाल्यास नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार ग्रामविकास खात्याला आले. याबाबत उच्च न्यायालयातही याचिका दाखल झालेल्या आहेत. याबाबत न्यायालयाचाही निर्णय स्वागतार्ह असेल, असे मुश्रिफ यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे