शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सरपंच नियुक्तीबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितला पालकमंत्र्यांचा अधिकार, मुश्रिफ यांचे अण्णांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 11:40 IST

पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा शासनाचाच एक प्रतिनिधी असतो. त्यामुळे यामध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याचे कारण नाही, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना तत्काळ दिलेल्या पत्रात म्हटले आहे.  या पत्रात पालकमंत्र्यांचे काय अधिकार असतात, हेच मुश्रिफ यांनी अण्णांना पटवून दिले आहे.

अहमदनगर : कोरोनाच्या स्थितीमध्ये सर्वच शासकीय यंत्रणा काम करते आहे. अशा स्थितीत निवडणुका घेता येणे शक्य नाही. त्यामुळे कायद्याचा आधार आणि विधी विभागाने दिलेला सल्ला यानुसारच ग्रामपंचायतीवर योग्य व्यक्तीची निवड करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना दिलेले आहेत. पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा शासनाचाच एक प्रतिनिधी असतो. त्यामुळे यामध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याचे कारण नाही, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना तत्काळ दिलेल्या पत्रात म्हटले आहे.  या पत्रात पालकमंत्र्यांचे काय अधिकार असतात, हेच मुश्रिफ यांनी अण्णांना पटवून दिले आहे.

ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश हा राजकीय हेतुने प्रेरीत असून यामुळे घोडेबाजार होईल. पालकमंत्र्यांना प्रशासक नियुक्तीचा अधिकार हा घटनाबाह्य असल्याचे अण्णा हजारे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळविले होते. त्याला मंत्री मुश्रिफ यांनी तत्काळ उत्तर दिले आहे. पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा शासनाचा प्रतिनिधी म्हणूनच कामकाज पाहत असतो. विविध समित्यांवरील सदस्य पालकमंत्रीच नियुक्त करतात. जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचा भाग म्हणून पालकमंत्री कार्यरत असतो. जिल्ह्याच्या नियोजन मंडळाचा तो अध्यक्ष असतो. जिल्ह्याच्या आपत्कालीन स्थितीमध्ये जिल्हा प्रशासन व शासन यामध्ये तो दुवा म्हणून काम करतो. पालकमंत्र्यांना माझ्या स्वत:च्या सहीने पत्र देऊन चांगल्या, कार्यक्षम व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे. चुकीचे काही झाल्यास नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार ग्रामविकास खात्याला आले. याबाबत उच्च न्यायालयातही याचिका दाखल झालेल्या आहेत. याबाबत न्यायालयाचाही निर्णय स्वागतार्ह असेल, असे मुश्रिफ यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे