शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

जागरण गोंधळ पार्टीत रमणारा मुंबईचा पोलीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:34 IST

मुंबई पोलीस दलात नोकरी सांभाळून अविनाश विलास धुमाळ हा जागरण गोंधळ पार्टीत काम करून लोककला जपण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कौतुकास्पद काम करणारा अविनाश हा मूळचा देऊळगाव (ता. श्रीगोंदा) येथील आहे. लहानपणापासूनच तो जागरण गोंधळ पार्टीत काम करत आहे.

बाळासाहेब काकडे। श्रीगोंदा : मुंबई पोलीस दलात नोकरी सांभाळून अविनाश विलास धुमाळ हा जागरण गोंधळ पार्टीत काम करून लोककला जपण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कौतुकास्पद काम करणारा अविनाश हा मूळचा देऊळगाव (ता. श्रीगोंदा) येथील आहे. लहानपणापासूनच तो जागरण गोंधळ पार्टीत काम करत आहे.अविनाश हा २०१० ला मुंबई पोलीस दलात भरती झाला. सध्या तो कमांडो पथकात काम करत आहे. मात्र ज्या जागरण गोंधळ पार्टीने शिकण्यासाठी बळ दिले. त्या जागरण गोंधळ पार्टीत मुंबईचा हा कमांडो कधी वाघ्या तर कधी संबळ वादकाचे काम करत आहे. देऊळगाव येथील विलास व अनुसया जाधव यांचा पिढीजात जागरण गोंधळ पार्टीचा व्यवसाय आहे. त्यांना दीपाली व अविनाश ही दोन मुले आहेत. अविनाश दोन वर्षाचा असतानाच विलास यांचे निधन झाले. अनुसया यांनी जागरण गोंधळामध्ये मुरळीचे काम चालू ठेवले. या माध्यमातूनच त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले.अविनाश हा लहानपणी सुट्टीत जागरण गोंधळ पार्टीत जायचा. देऊळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी बारामती येथील दादा चंदर गोसावी (काका) यांच्याकडे पाठवले. अकरावी, बारावी विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात झाली. अविनाश हा मुंबई पोलीस दलात भरती झाला. अविनाशने मुंबई विद्यापीठात बी. ए. केले. सध्या तो क्यूआरटी पथकात कमांडो म्हणून सेवा करीत आहे. त्याची बहीण दीपालीचा विवाह झाला असून तीही श्रीगोंदा शहरात ब्युटी पार्लरचे काम करते. अविनाशचा पदवीधर प्राचीबरोबर विवाह झाला. ती स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. अविनाश लहानपणापासून जागरण गोंधळ पार्टीत काम करण्याची आवड आहे. त्याने लोककला जोपासण्यासाठी जागरण गोंधळ पार्टीत काम करणे सुरूच ठेवले आहे. तो काम सांभाळून या पार्टीत काम करतो. सुटीत जागरण गोंधळाचे काम किल्लारीला भूकंप झाला. त्या दरम्यान पतीचे निधन झाले. अविनाश व दीपालीला गरिबीचे चटके बसले. तरही मुले शिकली. अविनाश मुंबईत पोलीस झाला. तो गावी सुटीला आला की माझ्याबरोबर जागरण गोंधळ पार्टीत काम करतो, असे देऊळगावच्या अनुसया धुमाळ यांनी सांगितले. आईसाठी शिकलो लोककलामाझ्या वडिलांचा लहानपणीच मृत्यू झाला. आईने जागरण गोंधळ पार्टीत असताना मला मुरळी, संबळ वादन, वाघ्याचे काम शिकविले. त्यामुळे तिला मदत व्हायची. याशिवाय काकांनी आधार दिला. त्यामुळे पोलीस दलात जाऊ शकलो. आज त्यांना आधार व्हावा व लोककला जोपण्यासाठी सुटीच्या काळात जागरण गोंधळ पार्टीत काम करतो, असे मुंबई पोलीस दलातील कर्मचारी अविनाश धुमाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़.

टॅग्स :artकलाshrigonda-acश्रीगोंदा