शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

आंदोलकांनी महावितरण अधिकाºयांना फोडला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:37 IST

अहमदनगर : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले तातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास वीज बंद करून कार्यालयात कार्यकर्त्यांनी गराडा घातल्याने अधिकाºयांसह सगळेच घामाघूम झाले होते. भारनियमन रद्द करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अहमदनगर : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले तातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास वीज बंद करून कार्यालयात कार्यकर्त्यांनी गराडा घातल्याने अधिकाºयांसह सगळेच घामाघूम झाले होते. भारनियमन रद्द करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. राज्यातील वीजनिर्मिती केंद्रांना पुरेशा प्रमाणात कोळशाची उपलब्धता होत नसल्याने संपूर्ण राज्यात व नगर जिल्ह्यात तातडीचे भारनियमन सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्याची दररोज अंमलबजावणी होत आहे. सुरूवातीला ई, एफ, जी या गटात होणारे भारनियमन मंगळवारी डी व सी गटांतील फिडरवरही काही प्रमाणात झाले. त्यामुळे जवळपास सर्वच शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. सध्या प्रचंड उकाडा असल्याने विजेशिवाय लोक घरात बसू शकत नाहीत. त्यामुळे तातडीने भारनियमन रद्द करण्याची मागणी करत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली उबेद शेख, संजय झिंजे आदींसह १०० ते २०० कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा नेला. महावितरणने वसुलीनुसार शहराची ए, बी, सी, डी, ई, एफ, जी अशी विभागणी केली आहे. नगर शहरात मोठ्या प्रमाणावर वीज थकबाकी आहे. तसेच चोरीचे प्रमाणही वाढलेले आहे. अपेक्षित बिल वसुली होत नसल्याने तसेच गळती वाढल्याने अनेक फिडर ई, एफ, जी या गटात गेले आहेत. त्यामुळे तेथे तातडीचे भारनियमन करण्यात आले आहे, असे अधीक्षक अभियंता बोरसे यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलक आणखीच भडकले. जे ग्राहक वीजबिल भरत नाहीत, ज्यांच्यामुळे थकबाकी वाढली अशांवर महावितरणने कारवाई करावी, त्याचा भुर्दंडसंपूर्ण शहराने का सोसायचा. जो बिल भरतो, त्याला वीज मिळालीच पाहिजे, जोपर्यंत भारनियमन रद्द होण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत अधीक्षक अभियंत्यांसह इतर अभियंत्यांना कार्यालयाबाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेत आंदोलकांनी महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात घोषणाबाजी सुरू केली. कार्यालयातील दिवे बंद करून कार्यकर्त्यानी ठिय्या दिला. तब्बल दोन तास आंदोलन सुरू होते.आंदोलकांच्या मागण्यांशी आम्ही सहमत आहोत. उद्यापासून वसुलीत सुधारणा करू. तसेच १४ सप्टेंबरपासून भारनियमन बंद करू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. -----------फोटो-साजीदलिस्टतातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.