शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आंदोलकांनी महावितरण अधिकाºयांना फोडला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:37 IST

अहमदनगर : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले तातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास वीज बंद करून कार्यालयात कार्यकर्त्यांनी गराडा घातल्याने अधिकाºयांसह सगळेच घामाघूम झाले होते. भारनियमन रद्द करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अहमदनगर : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले तातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास वीज बंद करून कार्यालयात कार्यकर्त्यांनी गराडा घातल्याने अधिकाºयांसह सगळेच घामाघूम झाले होते. भारनियमन रद्द करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. राज्यातील वीजनिर्मिती केंद्रांना पुरेशा प्रमाणात कोळशाची उपलब्धता होत नसल्याने संपूर्ण राज्यात व नगर जिल्ह्यात तातडीचे भारनियमन सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्याची दररोज अंमलबजावणी होत आहे. सुरूवातीला ई, एफ, जी या गटात होणारे भारनियमन मंगळवारी डी व सी गटांतील फिडरवरही काही प्रमाणात झाले. त्यामुळे जवळपास सर्वच शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. सध्या प्रचंड उकाडा असल्याने विजेशिवाय लोक घरात बसू शकत नाहीत. त्यामुळे तातडीने भारनियमन रद्द करण्याची मागणी करत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली उबेद शेख, संजय झिंजे आदींसह १०० ते २०० कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा नेला. महावितरणने वसुलीनुसार शहराची ए, बी, सी, डी, ई, एफ, जी अशी विभागणी केली आहे. नगर शहरात मोठ्या प्रमाणावर वीज थकबाकी आहे. तसेच चोरीचे प्रमाणही वाढलेले आहे. अपेक्षित बिल वसुली होत नसल्याने तसेच गळती वाढल्याने अनेक फिडर ई, एफ, जी या गटात गेले आहेत. त्यामुळे तेथे तातडीचे भारनियमन करण्यात आले आहे, असे अधीक्षक अभियंता बोरसे यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलक आणखीच भडकले. जे ग्राहक वीजबिल भरत नाहीत, ज्यांच्यामुळे थकबाकी वाढली अशांवर महावितरणने कारवाई करावी, त्याचा भुर्दंडसंपूर्ण शहराने का सोसायचा. जो बिल भरतो, त्याला वीज मिळालीच पाहिजे, जोपर्यंत भारनियमन रद्द होण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत अधीक्षक अभियंत्यांसह इतर अभियंत्यांना कार्यालयाबाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेत आंदोलकांनी महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात घोषणाबाजी सुरू केली. कार्यालयातील दिवे बंद करून कार्यकर्त्यानी ठिय्या दिला. तब्बल दोन तास आंदोलन सुरू होते.आंदोलकांच्या मागण्यांशी आम्ही सहमत आहोत. उद्यापासून वसुलीत सुधारणा करू. तसेच १४ सप्टेंबरपासून भारनियमन बंद करू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. -----------फोटो-साजीदलिस्टतातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.