शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

आंदोलकांनी महावितरण अधिकाºयांना फोडला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:37 IST

अहमदनगर : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले तातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास वीज बंद करून कार्यालयात कार्यकर्त्यांनी गराडा घातल्याने अधिकाºयांसह सगळेच घामाघूम झाले होते. भारनियमन रद्द करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अहमदनगर : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले तातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास वीज बंद करून कार्यालयात कार्यकर्त्यांनी गराडा घातल्याने अधिकाºयांसह सगळेच घामाघूम झाले होते. भारनियमन रद्द करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. राज्यातील वीजनिर्मिती केंद्रांना पुरेशा प्रमाणात कोळशाची उपलब्धता होत नसल्याने संपूर्ण राज्यात व नगर जिल्ह्यात तातडीचे भारनियमन सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्याची दररोज अंमलबजावणी होत आहे. सुरूवातीला ई, एफ, जी या गटात होणारे भारनियमन मंगळवारी डी व सी गटांतील फिडरवरही काही प्रमाणात झाले. त्यामुळे जवळपास सर्वच शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. सध्या प्रचंड उकाडा असल्याने विजेशिवाय लोक घरात बसू शकत नाहीत. त्यामुळे तातडीने भारनियमन रद्द करण्याची मागणी करत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली उबेद शेख, संजय झिंजे आदींसह १०० ते २०० कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा नेला. महावितरणने वसुलीनुसार शहराची ए, बी, सी, डी, ई, एफ, जी अशी विभागणी केली आहे. नगर शहरात मोठ्या प्रमाणावर वीज थकबाकी आहे. तसेच चोरीचे प्रमाणही वाढलेले आहे. अपेक्षित बिल वसुली होत नसल्याने तसेच गळती वाढल्याने अनेक फिडर ई, एफ, जी या गटात गेले आहेत. त्यामुळे तेथे तातडीचे भारनियमन करण्यात आले आहे, असे अधीक्षक अभियंता बोरसे यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलक आणखीच भडकले. जे ग्राहक वीजबिल भरत नाहीत, ज्यांच्यामुळे थकबाकी वाढली अशांवर महावितरणने कारवाई करावी, त्याचा भुर्दंडसंपूर्ण शहराने का सोसायचा. जो बिल भरतो, त्याला वीज मिळालीच पाहिजे, जोपर्यंत भारनियमन रद्द होण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत अधीक्षक अभियंत्यांसह इतर अभियंत्यांना कार्यालयाबाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेत आंदोलकांनी महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात घोषणाबाजी सुरू केली. कार्यालयातील दिवे बंद करून कार्यकर्त्यानी ठिय्या दिला. तब्बल दोन तास आंदोलन सुरू होते.आंदोलकांच्या मागण्यांशी आम्ही सहमत आहोत. उद्यापासून वसुलीत सुधारणा करू. तसेच १४ सप्टेंबरपासून भारनियमन बंद करू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. -----------फोटो-साजीदलिस्टतातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.