शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचा करणार निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:21 IST

बहुमताच्या जोरावर कलम ३७० रद्द करणे, घाईने नागरिकत्व नोंदणी कायदा निर्माण करून जनतेत दहशत आणि भय निर्माण केले. सार्वजनिक ...

बहुमताच्या जोरावर कलम ३७० रद्द करणे, घाईने नागरिकत्व नोंदणी कायदा निर्माण करून जनतेत दहशत आणि भय निर्माण केले. सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएल, रेल्वे, कोळसा व अन्य खनिज उद्योग भांडवलदार आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना विकण्याचे मोठे षडयंत्र या सरकारने यशस्वी केले. सरकारच्या भांडवलदारधार्जीण्या धोरणांमुळे देशात बेरोजगारी वाढली आहे. देशातील शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांच्या चळवळीने संघर्ष करून मिळवलेले हक्क आणि कायदे बहुमताच्या जोरावर संघटनांशी आणि संसदेत चर्चा न करता नष्ट करण्यात आले आहेत.

शेतकरी संघटनांनी मागणी केलेली नसताना, या संघटनांचा विरोध असताना गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटात घाईने तीन काळे कृषी कायदे घाईने मंजूर केले. या कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या किसान संघर्ष समितीच्या आंदोलनास २६ मे ला सहा महिने पूर्ण होत आहेत. सरकारने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तरीही शेतकरी हटले नाहीत. कोरोनाकाळात जनता उपचार, औषधे आणि ऑक्सिजनअभावी मृत्यूचा सामना करत असताना मोदी, शहा निवडणूक प्रचारात दंग होते. सेंट्रल विस्टा प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. देश संकटात असताना पक्षीय राजकारण आणि द्वेषाचे राजकारण करण्यात सरकार दंग आहे. सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने देशभर ‘मोदी सरकार निषेध दिवस’ पाळण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनात संगमनेर तालुका किसान संघर्ष समिती सहभागी होणार आहे, असे संयोजक शिवाजी गायकवाड यांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या घरावर, कार्यालयावर काळा झेंडा फडकावून मोदी सरकार निषेध दिवस पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.