शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

शेतकऱ्यांचे दु:ख पहायला मोदींना वेळ नाही का?

By admin | Updated: June 26, 2016 00:35 IST

आश्वी : सरकार नावाची कोणतीही व्यवस्था दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही. व्यापारधार्जिण्या शेतकऱ्यांना

आश्वी : सरकार नावाची कोणतीही व्यवस्था दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही. व्यापारधार्जिण्या शेतकऱ्यांना ग्रामीण भागाचे प्रश्न समजलेले नाहीत. मत मागण्यासाठी आलेले पंतप्रधान राज्यातील शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घ्यायला फिरकलेही नाहीत. आता स्मार्ट सिटीच्या उद्घाटनाला येत आहात तर, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनाही भेटून जा, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी भाजप सरकारला मारला आहे. निमगावजाळी आणि प्रतापपूर (ता. संगमनेर) येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभात विखे बोलत होते. सरकारच्या धोरणावर कडाडून हल्ला चढवताना ते म्हणाले, राज्यातील जनता दुष्काळाने होरपळली आहे. पण आवश्यक उपाययोजना करायला सरकारकडून चालढकल होत आहे. उलट चुकीची परिपत्रके काढून शेतकऱ्यांना शासकीय अनुदानापासून वंचित ठेवण्याचे काम होत आहे. राज्यात पावसाअभावी मोठे चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांकडील उत्पन्नाची सर्व साधने संपली आहेत. समन्यायी पाणी वाटप कायद्याचा चुकीचा अर्थ काढून भंडारदरा, निळवंडे धरणांसह गोदावरी खोऱ्यातील धरणांतून पाणी सोडण्यात आले. याचा मोठा परिणाम दोन्हीही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना भोगावा लागलो. शेतीक्षेत्र उद्ध्वस्त झाले असून, भविष्यात पिण्याच्या पाण्याचे मोठे आव्हान समोर उभे राहणार आहे. मागील सरकारने शेतकऱ्यांना पॉलिहाऊस, शेडनेटसाठी अनुदान दिले होते. मात्र या सरकारने हे अनुदान विनाकारण रखडविले आहे. राज्याला महसूल मंत्री, कृषी मंत्री नसल्याने सरकारचे सर्व कामकाज ठप्प झाले असल्याकडे विखे यांनी लक्ष वेधले.(वार्ताहर)सरकारला भ्रष्टाचाराची कीड लागली असून सरकार नावाची व्यवस्थाच अस्तित्वात राहिलेली नाही. वाळूमाफियांना मंत्र्यांचे संरक्षण मिळत असून अधिकाऱ्यांच्या बदलीचे भाव वाढत चालले आहेत, अशी टीका विखे यांनी पाथरे बुद्रूक येथे केली. जोर्वेतील वाळू माफियांना माजी मंत्र्यांचे संरक्षण मिळत आहे. मागील काळापासूनच महसूलच्या अधिकाऱ्यांचे भाव वाढत चालले आहेत. आता तर सरकारने बदलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे सांगत विखे यांनी सरकारवर निशाणा साधला.