शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोध निवडणूकीसाठी आमदार निलेश लंकेंचा प्रचारक म्हणून  काम करणार- अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 15:44 IST

बिनविरोधरोध निवडणूकांचा उपक्रम महत्वाचा असून ग्रामपंचायतींच्या बिनविरोध निवडणूकांसाठी आ. लंके यांचा प्रचारक म्हणून  मी काम करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे बोलताना जाहिर केले.

पारनेर :  आज प्रत्येक गावात, शहरात, देशात जाती, पाती, धर्म, वंश यावरून वाद निर्माण होत असून पक्ष व पाटर्यांमधील व्देश भावनाही वाढत चालली आहे. त्यामागे निवडणूका हेच कारण आहे.

देशातील व्देशभावना कमी करायची असेल तर आ. निलेश लंके यांनी उचचलेेले पाऊल अतिशय महत्वाचे आहे. लोकशाही बजबूत झाली पहिजे, प्रबळ झाली पाहिजे. ती दिल्लीतून, मुंबईतून होणार नाही तर गल्ली बदलल्याशिवाय दिल्ली बदलणार नाही. त्याचसाठी

बिनविरोधरोध निवडणूकांचा उपक्रम महत्वाचा असून ग्रामपंचायतींच्या बिनविरोध निवडणूकांसाठी आ. लंके यांचा प्रचारक म्हणून  मी काम करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे बोलताना जाहिर केले.

पारनेर - नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी रोजी होणार असून त्या त्या गावांतील नागरीकांनी बिनविरोध निवडणूक करावी, आमदार निधीमधून त्या गावांना २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा आ. नीलेश लंके यांनी केली आहे. निवडणूका बिनविरोध करण्यासाठी आ. लंके हे स्वतः विविध गावांच्या बैठका घेत असून शुक्रवारी सुपे गटातील बैठकांदरम्यान राळेगणसिद्धीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्‍वभुमिवर शनिवारी सकाळी आ. नीलेश लंके यांनी राळेगणसिद्धीत जाउन हजारे यांची भेट घेतली. बिनविरोध निवडणूकांदर्भातील माहीती  त्यांनी हजारे यांना दिली. यावेळी बोलताना हजारे यांनी संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायतींनी राळेगणसिद्धीचा आदर्श घेण्याचा आवाहन केले.

देश संकटातून चालला आहे यावेळी बोलताना हजारे म्हणाले, आ. लंके यांनी उचललेले हे पाऊल गावापुतं मर्यादीत नाही. आपली दृष्टी दुर केली पाहिजे.  आमची लोकशाही बळकट व्हावी, मजबुत व्हावी अशा दृष्टीने उचललेलं हे पाऊल आहे. आपण मर्यादीत विचार करतो. देशासाठी, समाजासाठी दुरदृष्टी हवी.  आपण रोज वर्तमानपत्रे वाचतो, देश एका संकटातून चालला आहे. जाती, पाती, धर्म, वंश यांच्यातील व्देश भावना वाढत आहे. शेजाऱ्या शेजाऱ्यांमध्ये मतभेद होत आहेत, मारामाऱ्या होत आहेत. दोन पक्ष व पार्ट्यांमध्ये वाद आहेत. काय चाललंय बिहारमध्ये ? काय चाललंच बंगालमध्ये ? कशामुळे ? तर निवडणूकांमुळे. राजकिय व्देश, पक्ष व पार्ट्यांमधील व्देश हे वाढत असून देशाल  हा धोका आहे. हा धोका टाळायचा असेल तर आ. लंके यांनी हाती घेतलेल्या उपक्रमास गावागावातून प्रतिसाद मिळाला पाहिजे.  तसे  झाले तर ते तालुक्याचे उदाहरण होईल. महाराष्ट्राला दिशा मिळेल. महाराष्ट्राला दिशा मिळाली तर देशातील अनेक राज्ये त्याचं अनुकरण करतील असा विश्‍वास हजारे यांनी व्यक्त केला.

लोकशाहीसाठी आ. लंके यांचे प्रयत्न

१८५७ ते १९४७ या ९० वर्षात जी बलीदानं झाली ती कशासाठी ?  आमच्यासाठीच ना ? भगतसिग, राजगुरू, सुखदेव हे फासावर गेले ते कशासाठी तर आमच्या स्वातंत्रयासाठी. काय स्वप्न होतं त्यांचं ? इंग्रजांना घालवायचं व या देशात लोकशाही आणायची.  मात्र घडलं काय ? इंग्रज गेला पण लोकशाही आली नाही. ती लोकशाही यावी या दृष्टीने आ. लंके यांनी जो प्रयत्न चालविला आहे तो मला महत्वाचा वाटतो.

स्वतः साठी नाही समाजासाठी, गावासाठी काम केलं कोण सरपंच झाला, कोण आमदार, खासदार झाला याच्याशी मला कर्तव्य नाही. परंतू लोकशाही मजबूत होण्यासाठी उचललेलं पाउल मला महत्वाचंं वाटतं.  मी ५० वर्षे गावात काम केले. त्यात माझा काय लाभ आहे ? मला काही मिळवायचं नव्हतं. लोकांकडून काही मागायचं नव्हतं. जे केलं ते गावासाठी समाजासाठी केलं. 

निवडणुकांमुळे विकास खुंटला 

गांधीजी सांगत गाव बदलल्याशिवाय देश बदलणार नाही. आधी गावच बदलावं लागेल. आज खेडयांतील विकास थांबला आहे तो निवडणूकांमुळे. राजकीय गट, तटामुळे विकास थांबला. एका निवडणूकीतील मतभेदाचे लोण पाच वर्षेे राहते.  त्यामुळेच आ. लंके यांनी हाती घेतलेल्या उपक्रमामुळे लोकशाही मजबूत होईल. प्रत्येक गावातील व्देश भावना कमी होणे गरजेचे आहे. गट, तट, राजकारण थांबले पाहिजे. लोकशाहीत निवडणूक करणे दोष नाही. परंतू सत्ता व पैसा हा निवडणूकीतील दोष असून लोक त्यात अडकले आहेत. त्यासाठीच बिनविरोध निवडणूक होणे गरजेचे आहे. 

बिनविरोध निवडणुकांमुळे राळेगणचा विकास          राळेगणसिद्धीत ५० वर्षात २ ते ३ निवडणूका झाल्या. त्यामुळेच येथे विकास झाला. त्यामुळेच येथील नागरीक गावाला परिवार माणतात. असेच प्रत्येक गावागावांत व्हावं अशी आमदार लंके यांची इच्छा आहे. त्यांच्या प्रयत्नांना माझ्या शुभेच्छा आहेत. बिनविरोध निवडणूका करण्यासाठी आ. लंके यांचा प्रचारक म्हणून मी काम करेल असेही हजारे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

किती दिवस संघर्ष करायचा ?

     आ. लंके यांनी आपसांतील व्देश, मतभेद दुर ठेवण्याचे आवाहन केले. आपला तालुका वेगळया उंचीवर आहे. आपण एकमेकांत का लढायचं ? आपण एकमेकांचे नातेवाईक आहोत, सुख दुःखात सहभागी होतो मग मनात कटूता का ठेवायची ? कीती दिवस संघर्ष करायचा ? आपण अण्णांच्या सहवासात राहतो. त्यांचा गुण आपण घेतला पाहिजे. गट, तट, पक्ष, पाटर्या न पाहता आपल्या कुटूंबाचाच एक भाग म्हणून आपण निवडणूका बिनविरोध करू अशी साद आ. लंके यांनी यावेळी बोलताना घातली. सुरेश पठारे यांनी प्रास्ताविक केले. जयसिंग मापारी, लाभेश औटी यांचीही यावेळी भाषणे झाली.

     यावेळी माजी सरपंच सदाशिव मापारी, माजी सभापती सुदाम पवार, वनकुट्याचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे, संदीप चौधरी, दत्ता आवारी, किसन मापारी, किसन पठारे, भाउ गाजरे, मेजर दादा पठारे, गिताराम औटी,  रामहरी भोसले, सौ. विजया पठारे, गणेश हजारे, अनिल उगले, रूपेश फटांगडे, रोहिदास पठारे, दादा गाजरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे