शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

आमदार कोल्हेंना बोलण्यापासून रोखले : कोपरगावात उपोषणस्थळी गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 10:58 IST

दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत कोपरगाव तालुक्याचा समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शंकरराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या उपोषणस्थळी मंगळवारी नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या.

कोपरगाव : दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत कोपरगाव तालुक्याचा समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शंकरराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या उपोषणस्थळी मंगळवारी नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. सायंकाळी उपोषणस्थळी पाठिंबा देण्यासाठी आमदार स्नेहलता कोल्हे दाखल झाल्या असताना शेतकऱ्यांच्या रोषामुळे त्यांना व्यासपीठावरुन पायउतार व्हावे लागले. तसेच त्यांना कार्यकर्त्यांनी भाषणासाठी माईक देखील वापरु दिला नाही. यावेळी काळे-कोल्हे समर्थकांची समोरासमोर घोषणाबाजी सुरू झाल्याने गोंधळ होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.काळे यांचे तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी सोमवारपासून उपोषण सुरु होते. या उपोषणाला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक गावातील शेतकºयांनी उपोषणस्थळी येऊन आपला पाठिंबा जाहीर केला. या उपोषणाची दखल आमदार कोल्हे यांनाही घ्यावी लागली. त्या सायंकाळी उपोषणस्थळी आल्या होत्या. यावेळी अधिकारी व काळे यांच्या चर्चेत कोल्हे सहभागी झाल्या.चर्चेचा तपशील सांगण्यासाठी काळे यांनी भाषण सुरु केले. त्यानंतर प्रांताधिकारी ठाकरे यांचे भाषण झाले. त्यानंतर आमदार कोल्हे बोलण्यासाठी संधी मागत होत्या. मात्र, त्यांना माईकच देण्यात आला नाही. त्यांनी भाषण करण्यासाठी वारंवार माईक मागूनही त्यांना माईक दिला गेला नाही. उपोषणकर्त्या शेतकºयाच्या प्रचंड रोषामुळे त्यांना व्यासपीठावरून खाली उतरावे लागले. यावेळी दोन्ही बाजूच्या समर्थकांत तणाव निर्माण होऊन घोषणाबाजी झाली. काही कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीही झाली. आमदार नंतर निघून गेल्या. त्यावेळी काळे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले.सायंकाळी काळे यांनी शिर्डीचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले. यावेळी प्रशासनाने दिलेला शब्द पाळावा अन्यथा पुन्हा उपोषण करू, असा इशारा प्रशासनाला त्यांनी दिला. जिल्हाधिकाºयांनी वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठविला असल्याचे लेखी पत्र देऊन दुष्काळ जाहीर होणार असल्याचे आश्वासन दिले. दिवाळीपर्यंत शेतकºयांना बोंडअळीचे पैसे देणार, विजेचे सुधारित वेळापत्रक तयार करणार, कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाºया चार नंबर साठवण तलावाच्या कामासाठी जनरल बोर्डाच्या बैठकीत १४ व्या वित्त आयोजनाचे पैसे मंजूर करून घेणार, २०१५ च्या रब्बीचे अनुदान देणार असे आश्वासन दिल्यानंतर आशुतोष काळे यांनी उपोषण सोडले. उपोषणाला बसलेल्या विष्णू शिंदे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, तालिबभाई सय्यद या तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती.शेतक-यांचा लोकप्रतिनिधींवर रोषगेल्या दोन दिवसापासून कोपरगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा यासाठी मी व माझे सहकारी तसेच तालुक्यातून आलेले सर्व शेतकरी बांधव आम्ही उपोषण केले. मंगळवारी संध्याकाळी उशिरा प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार किशोर कदम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आमच्या मागण्यांसंदर्भात लेखी स्वरुपात दिलेल्या पत्रावरून आम्ही उपोषण सोडले आहे. आमदारांच्या नाही हे महत्वाचे. परंतु कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्या नेहमीच्या नको त्या कामाचे श्रेय लाटण्याच्या सवयीप्रमाणे आमच्या उपोषणस्थळी आम्ही सोडलेल्या उपोषणाचे श्रेय घेऊ पाहणा-या आमदार स्नेहलता कोल्हे यांना आमच्या कार्यकर्त्यांनी व शेतक-यांनी त्यांना त्याची जागा दाखवून देत उपोषणस्थळावरुन पायउतार होऊन निघून जावे लागल्याचे आशुतोष काळे यांनी सांगितले.चैताली काळे आक्रमककार्यकर्त्यांचे व शेतक-यांचे आभार मानताना आशुतोष काळे व चैताली काळे भावुक झाल्याचे पहावयास मिळाले. यानंतर आपल्या खास आक्रमक शैलीत चैताली काळे यांनी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.मी लोकप्रतिनिधी म्हणून सदर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते. तालुक्याच्या दुष्काळाच्या संदर्भात महिन्यापासून मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करीत आहे. या उपोषणाला भेट देण्यासाठी प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांंना मीच उपोषणस्थळी पाठविले होते. दुष्काळापेक्षा विरोधकांनी उपोषणाच्या व्यासपीठावरून लोकप्रतिनिधीच्या विरोधात राजकारणच जास्त केले. एका लोकप्रतिनिधीला आपले म्हणणे मांडू न देणे हे राजकीय अपरिपक्वतेचेच लक्षण आहे. - स्नेहलता कोल्हे, आमदार.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव