शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मंत्री प्राजक्त तनपुरे  म्हणतात...मीच परीक्षा पास झालो की काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 14:58 IST

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी विद्यापीठांच्या अंतिम परीक्षांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे मीच परीक्षा पास झालो की, काय? अशी फिलींग मला झाली आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी विद्यार्थी मित्रांना फेसबुकवरुन दिली आहे. 

अहमदनगर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी विद्यापीठांच्या अंतिम परीक्षांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे मीच परीक्षा पास झालो की, काय? अशी फिलींग मला झाली आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी विद्यार्थी मित्रांना फेसबुकवरुन दिली आहे. 

 कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरचा काळ  मला माझ्या अंतिम परीक्षेसारखा वाटला. तेच टेंशन, तेच प्रेशर मला जाणवले. सतत विविध माध्यमातून मी तुमच्याशी बोलत राहिलो. कोणी शहरात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी गावी गेले होते. कोणी कोरोनाच्या भीतीने परीक्षा केंद्रात जायला घाबरत होते. अभ्यासू विद्यार्थी परीक्षेसाठी तयार होते. कोणी परीक्षेबाबत पसरलेल्या अफवांना बळी पडत होते. भीतीसारखी असली तरी प्रत्येकाच्या मनातील संभ्रम वेगळा होता. सुवर्णमध्य गाठणे कठीण होते. मानसिक, आरोग्यदृष्ट्या तुम्हाला कसलीच अडचण येऊ नये ही हूरहूर मनात कायम होती. त्यात तुमच्या भविष्याची चिंता अधिक तीव्रतेने जाणवत होती. त्याच सर्व गोष्टींचा सारासार विचार करीत आम्ही निर्णय घेतला आहे, असेही तनपुरे यांनी म्हटले आहे. 

आता तुम्हाला सरासरी मार्क्स मिळतील. मान्य आहे की माझे काही मित्र दुखावले जातील. मात्र आपण त्यावरही मार्ग काढू. पण खरं सांगू का मित्रानो, या कागदावरच्या परीक्षा होत राहतील. मात्र खरी परीक्षा काय असते ते आपल्याला जीवनात येणारे चढउतार शिकवत असतात. आता एका नैसर्गिक परीक्षेतून आपण जात आहोत. ही परीक्षा खूप अवघड आहे, पण कठीण नाही. पुढे येणा-या सर्व संकटांना सामोरे जाण्याचा धडा यातून आपल्याला मिळणार आहे. चला मग धैर्याने, एकीने आणि सकारात्मकतेने पुढे जाऊ यात, असेही मंत्री तनपुरे यांनी विद्यार्थ्यांना म्हटले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरेEducation Sectorशिक्षण क्षेत्र