शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

लाखो विद्यार्थी राहतात सवलतीच्या गुणांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST

अहमदनगर : विविध स्तरावरील क्रीडास्पर्धेत सहभागी आणि प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण देण्यात ...

अहमदनगर : विविध स्तरावरील क्रीडास्पर्धेत सहभागी आणि प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण देण्यात येतात. मात्र हे गुण देताना सरकारने एक अट घातली आहे. या अटीमुळे दरवर्षी राज्यातील लाखो विद्यार्थी सवलतीच्या गुणापासून वंचित राहतात. त्यामुळे ही अट रद्द करून सरसकट सवलतीचे गुण देण्याची मागणी होत आहे. यंदा तर कोरोनामुळे स्पर्धाच न झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर संक्रांत आली आहे.

सहावी ते दहावी आणि सहावी ते बारावी दरम्यान जिल्हा ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थी खेळला असल्यास दहावी, बारावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण मिळतात. हे गुण मिळण्यासाठी खेळाडूंना १० वी आणि १२ वीच्या वर्गात शिकत असताना स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची अट आहे. जर १० वी अथवा १२ वीच्या वर्गात असताना स्पर्धेमध्ये सहभागी न झाल्यास त्या विद्यार्थ्याला गुण मिळत नाहीत. सहावी, सातवी, आठवी आणि अकरावीत स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवले असले तरी गुण मिळत नाहीत. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.

जिल्हास्तरावरील प्रावीण्यास ५, विभागस्तर सहभागास ५ तर प्रावीण्यास १०, राज्यस्तर सहभाग १० व १२ प्रावीण्यास १५, राष्ट्रीयस्तर सहभाग १५ तर प्रावीण्य २० तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागास २० तर प्रावीण्यास २५ गुण दिले जातात.

...............

विनाअट गुण द्यावेत

ही अट शिथिल करून विनाअट गुण देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर, शारीरिक शिक्षण महामंडळ, शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीच्या वतीने सरकारकडे करण्यात आली. क्रीडामंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी केली आहे. मात्र या मागणीवर सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

….……………..

यंदा कोरोनामुळे यांना मिळणार गुण

कोरोनामुळे या वर्षी कोणत्याही स्पर्धा पार पडल्या नाहीत. त्यामुळे गतवर्षी इयत्ता ९ वी आणि ११ वीमध्ये ज्या खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यांनाच सवलतीचे गुण दिले जाणार आहेत.

….…………

कोट -

विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतल्यापासून विविध क्रीडाप्रकारात नैपुण्य मिळवत असतो. सवलतीचे गुण मिळवण्यासाठी दहावी व बारावीच्या वर्गात असताना स्पर्धेत सहभागाची अट आहे. सहभाग नसल्यास हे गुण मिळत नाहीत. ही अट अन्यायकारक आहे. अनेक विद्यार्थी परीक्षेच्या अभ्यासामुळे दहावी, बारावीत असताना खेळांच्या स्पर्धेत सहभागी होत नाहीत. त्यामुळे सरकारने ही अटक रद्द करून सरसकट गुण द्यावेत.

- राजेंद्र कोतकर, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ

….………………………………