शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

संवत्सरी पर्वातून मैत्री आणि शांततेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 16:20 IST

प्रत्येक जण चूक करतो. त्या चुकांबद्दल कबुली देणे, त्या मान्य केल्यामुळे अनेक समस्या सुटतात. एकमेकांविषयी गैरसमज दूर होतात. मैत्री व शांततेचे वातावरण तयार होते. संवत्सरी पर्व मैत्री व शांततेचा संदेश देणारे पर्व आहे.

सन्मतीवाणीप्रत्येक जण चूक करतो. त्या चुकांबद्दल कबुली देणे, त्या मान्य केल्यामुळे अनेक समस्या सुटतात. एकमेकांविषयी गैरसमज दूर होतात. मैत्री व शांततेचे वातावरण तयार होते. संवत्सरी पर्व मैत्री व शांततेचा संदेश देणारे पर्व आहे.पर्युषण पर्वात जास्तीत जास्त धर्म आराधना करण्याची सुवर्णसंधी असते. त्या संधीचा फायदा घेऊन धर्म आराधना करुन प्रत्येकाने मन निर्मळ करावे. आत्मशुध्दी, शरीर शुध्दी करण्याची संधी या पर्वात असते. अंतगढ सूत्रात आठ वर्ग असून ९० अध्याय आहेत. या सूत्रात जीवनशैली कशी असावी याचे मार्गदर्शन मिळते. धर्मस्थानावर आपण कशासाठी येतो याचा विचार करा. तुमच्या जवळ सर्वकाही आहे, पण तुम्हाला त्याचा विसर पडला. तुमच्या अंतर्मनावर विषयांची धूळ साचली आहे. ती धूळ साफ करुन मन निर्मळ करा. स्वत:ची नजर बदलली तर सर्व जगच चांगले दिसेल. पर्युषण पर्व ही संधी आहे. संवत्सरी पर्व शांतता व मैत्रीचा संदेश देते. मनुष्य चुका करतो, पण त्या कबुल करण्यातच प्रत्येकाचे हित आहे. आपल्या चुका दुसºयावर ढकलू नका. आपल्या चुकांबद्दल क्षमायाचना केली तर मन साफ होईल. मैत्री व प्रेमाचे वातावरण तयार होईल. नाते संबंधातील दरी दूर करा. वेगळाच आनंद मिळू शकतो. आत्मपरीक्षण करीत रहा. म्हणजे तुम्हाला चुका दुरुस्त करण्याची संधी मिळेल.आपली चूक एक पुस्तकाचे पान आहे. तर नातेसंंबंध हे पुस्तक आहे. केवळ चुकीमुळे आपण पाने फाडू शकतो पण नाती टिकविण्यासाठी पुस्तक फाडू शकत नाही. आधी तुम्ही स्वत: बदला. दुसरे आपोआप बदलतील याची खात्री ठेवा. आपण जी चूक करतो, त्यामुळे आयुष्य खराब होते. आपले जीवन आंब्याप्रमाणे मधूर, गोड बनवा. लिंबाप्रमाणे कडवटपणा नको. जीवनात कडूपणाचा दुर्गंध पसरु देऊ नका. माणसामाणसात मैत्रीचे संबंध निर्माण झाले तर जगातून द्वेषाचे वातावरण कमी होईल. मानव जातीला आनंदाचे, सुखाचे दिवस येतील.-पू.श्री.सन्मती महाराज

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर