शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

संवत्सरी पर्वातून मैत्री आणि शांततेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 16:20 IST

प्रत्येक जण चूक करतो. त्या चुकांबद्दल कबुली देणे, त्या मान्य केल्यामुळे अनेक समस्या सुटतात. एकमेकांविषयी गैरसमज दूर होतात. मैत्री व शांततेचे वातावरण तयार होते. संवत्सरी पर्व मैत्री व शांततेचा संदेश देणारे पर्व आहे.

सन्मतीवाणीप्रत्येक जण चूक करतो. त्या चुकांबद्दल कबुली देणे, त्या मान्य केल्यामुळे अनेक समस्या सुटतात. एकमेकांविषयी गैरसमज दूर होतात. मैत्री व शांततेचे वातावरण तयार होते. संवत्सरी पर्व मैत्री व शांततेचा संदेश देणारे पर्व आहे.पर्युषण पर्वात जास्तीत जास्त धर्म आराधना करण्याची सुवर्णसंधी असते. त्या संधीचा फायदा घेऊन धर्म आराधना करुन प्रत्येकाने मन निर्मळ करावे. आत्मशुध्दी, शरीर शुध्दी करण्याची संधी या पर्वात असते. अंतगढ सूत्रात आठ वर्ग असून ९० अध्याय आहेत. या सूत्रात जीवनशैली कशी असावी याचे मार्गदर्शन मिळते. धर्मस्थानावर आपण कशासाठी येतो याचा विचार करा. तुमच्या जवळ सर्वकाही आहे, पण तुम्हाला त्याचा विसर पडला. तुमच्या अंतर्मनावर विषयांची धूळ साचली आहे. ती धूळ साफ करुन मन निर्मळ करा. स्वत:ची नजर बदलली तर सर्व जगच चांगले दिसेल. पर्युषण पर्व ही संधी आहे. संवत्सरी पर्व शांतता व मैत्रीचा संदेश देते. मनुष्य चुका करतो, पण त्या कबुल करण्यातच प्रत्येकाचे हित आहे. आपल्या चुका दुसºयावर ढकलू नका. आपल्या चुकांबद्दल क्षमायाचना केली तर मन साफ होईल. मैत्री व प्रेमाचे वातावरण तयार होईल. नाते संबंधातील दरी दूर करा. वेगळाच आनंद मिळू शकतो. आत्मपरीक्षण करीत रहा. म्हणजे तुम्हाला चुका दुरुस्त करण्याची संधी मिळेल.आपली चूक एक पुस्तकाचे पान आहे. तर नातेसंंबंध हे पुस्तक आहे. केवळ चुकीमुळे आपण पाने फाडू शकतो पण नाती टिकविण्यासाठी पुस्तक फाडू शकत नाही. आधी तुम्ही स्वत: बदला. दुसरे आपोआप बदलतील याची खात्री ठेवा. आपण जी चूक करतो, त्यामुळे आयुष्य खराब होते. आपले जीवन आंब्याप्रमाणे मधूर, गोड बनवा. लिंबाप्रमाणे कडवटपणा नको. जीवनात कडूपणाचा दुर्गंध पसरु देऊ नका. माणसामाणसात मैत्रीचे संबंध निर्माण झाले तर जगातून द्वेषाचे वातावरण कमी होईल. मानव जातीला आनंदाचे, सुखाचे दिवस येतील.-पू.श्री.सन्मती महाराज

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर