शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

संवत्सरी पर्वातून मैत्री आणि शांततेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 16:20 IST

प्रत्येक जण चूक करतो. त्या चुकांबद्दल कबुली देणे, त्या मान्य केल्यामुळे अनेक समस्या सुटतात. एकमेकांविषयी गैरसमज दूर होतात. मैत्री व शांततेचे वातावरण तयार होते. संवत्सरी पर्व मैत्री व शांततेचा संदेश देणारे पर्व आहे.

सन्मतीवाणीप्रत्येक जण चूक करतो. त्या चुकांबद्दल कबुली देणे, त्या मान्य केल्यामुळे अनेक समस्या सुटतात. एकमेकांविषयी गैरसमज दूर होतात. मैत्री व शांततेचे वातावरण तयार होते. संवत्सरी पर्व मैत्री व शांततेचा संदेश देणारे पर्व आहे.पर्युषण पर्वात जास्तीत जास्त धर्म आराधना करण्याची सुवर्णसंधी असते. त्या संधीचा फायदा घेऊन धर्म आराधना करुन प्रत्येकाने मन निर्मळ करावे. आत्मशुध्दी, शरीर शुध्दी करण्याची संधी या पर्वात असते. अंतगढ सूत्रात आठ वर्ग असून ९० अध्याय आहेत. या सूत्रात जीवनशैली कशी असावी याचे मार्गदर्शन मिळते. धर्मस्थानावर आपण कशासाठी येतो याचा विचार करा. तुमच्या जवळ सर्वकाही आहे, पण तुम्हाला त्याचा विसर पडला. तुमच्या अंतर्मनावर विषयांची धूळ साचली आहे. ती धूळ साफ करुन मन निर्मळ करा. स्वत:ची नजर बदलली तर सर्व जगच चांगले दिसेल. पर्युषण पर्व ही संधी आहे. संवत्सरी पर्व शांतता व मैत्रीचा संदेश देते. मनुष्य चुका करतो, पण त्या कबुल करण्यातच प्रत्येकाचे हित आहे. आपल्या चुका दुसºयावर ढकलू नका. आपल्या चुकांबद्दल क्षमायाचना केली तर मन साफ होईल. मैत्री व प्रेमाचे वातावरण तयार होईल. नाते संबंधातील दरी दूर करा. वेगळाच आनंद मिळू शकतो. आत्मपरीक्षण करीत रहा. म्हणजे तुम्हाला चुका दुरुस्त करण्याची संधी मिळेल.आपली चूक एक पुस्तकाचे पान आहे. तर नातेसंंबंध हे पुस्तक आहे. केवळ चुकीमुळे आपण पाने फाडू शकतो पण नाती टिकविण्यासाठी पुस्तक फाडू शकत नाही. आधी तुम्ही स्वत: बदला. दुसरे आपोआप बदलतील याची खात्री ठेवा. आपण जी चूक करतो, त्यामुळे आयुष्य खराब होते. आपले जीवन आंब्याप्रमाणे मधूर, गोड बनवा. लिंबाप्रमाणे कडवटपणा नको. जीवनात कडूपणाचा दुर्गंध पसरु देऊ नका. माणसामाणसात मैत्रीचे संबंध निर्माण झाले तर जगातून द्वेषाचे वातावरण कमी होईल. मानव जातीला आनंदाचे, सुखाचे दिवस येतील.-पू.श्री.सन्मती महाराज

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर