शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पारा ४३ अंशापार

By admin | Updated: April 18, 2017 17:19 IST

सध्याच्या उन्हाळ्यातील ‘एप्रिल हीट’ने कोपरगाव शहर व तालुक्यात कहर केला असून मंगळवारी तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहचल्याने कोपरगावकरांचा जीव कासावीस झाला.

अहमदनगर : सध्याच्या उन्हाळ्यातील ‘एप्रिल हीट’ने कोपरगाव शहर व तालुक्यात कहर केला असून मंगळवारी तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहचल्याने कोपरगावकरांचा जीव कासावीस झाला. श्रीरामपूरमध्ये या उन्हाळ्यातील ४३ अंश सेल्सिअस एवढ्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. राहुरीतही मंगळवारी ४२ अंश सेल्सिअसवर तापमापकातील पारा पोहोचला होता.गेल्या वर्षी चांगला पाऊस झालेला असला तरी यंदाचा उन्हाळा अतिशय कडक जाणवत आहे. दिवसेंदिवस पडणारे कडाक्याचे ऊन व सातत्याने वाढणारी प्रचंड उष्णता यामुळे वातावरण भलतेच तापले आहे. रखरखत्या उन्हाने जमीन कमालीची तापून चटके बसू लागले आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सूर्यनारायण कोपू लागल्याने सर्वत्र उन्हाच्या झळा बसत आहेत. दिवसभर अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने अंगाची काहिली असह्य होत आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अंगात पांढºया रंगाचे सुती वस्त्र, डोक्यावर टोपी, उपरणे, डोळ्यावर काळे गॉगल लावण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे उन्हात बचाव करणाºया या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा आहे. श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या तापमापकावर या उन्हाळ्यातील सर्वोच्च ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शनिवार व सोमवारीदेखील श्रीरामपूरच्या मेनरोडवर ४३ अंश सेल्सिअस तापमान पोहोचले होते. मंगळवारी दुपारनंतर उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर थोडा खाली घसरला. श्रीगोंदा शहरात ४० अंश तर श्रीगोंदा कारखाना कार्यस्थळावर ४१ अंश सेल्सिअसवर पारा पोहोचला होता. राहुरीतही मंगळवारी ४२ अंश सेल्सिअसवरच पारा घुटमळत होता. त्यामुळे खंडेरायाच्या यात्रेतील गर्दीवरदेखील परिणाम जाणवत होता. दिवसा उन्हाचे चटके बसत असल्याने रात्री उशिरापर्यंत यात्रेत गर्दी होत आहे. ..................................उष्म्याने जीव झाला कासावीसशीतपेयांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. दुपारी बारा वाजल्यानंतर रस्त्यावर शुकशुकाट पसरत आहे. नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. मंगळवारी दुपारी २ वाजता कोपरगाव शहर व तालुक्यात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या महिनाभरातील हे सर्वोच्च तापमान गणले गेले आहे. पावसाळा सुरू होण्यास दोन महिन्यांचा अवधी बाकी आहे. मात्र आताच कोपरगावकरांचा जीव उष्म्याने कासावीस होऊ लागल्याने त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम जाणवत आहे. आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.