शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

पारा ४३ अंशापार

By admin | Updated: April 18, 2017 17:19 IST

सध्याच्या उन्हाळ्यातील ‘एप्रिल हीट’ने कोपरगाव शहर व तालुक्यात कहर केला असून मंगळवारी तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहचल्याने कोपरगावकरांचा जीव कासावीस झाला.

अहमदनगर : सध्याच्या उन्हाळ्यातील ‘एप्रिल हीट’ने कोपरगाव शहर व तालुक्यात कहर केला असून मंगळवारी तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहचल्याने कोपरगावकरांचा जीव कासावीस झाला. श्रीरामपूरमध्ये या उन्हाळ्यातील ४३ अंश सेल्सिअस एवढ्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. राहुरीतही मंगळवारी ४२ अंश सेल्सिअसवर तापमापकातील पारा पोहोचला होता.गेल्या वर्षी चांगला पाऊस झालेला असला तरी यंदाचा उन्हाळा अतिशय कडक जाणवत आहे. दिवसेंदिवस पडणारे कडाक्याचे ऊन व सातत्याने वाढणारी प्रचंड उष्णता यामुळे वातावरण भलतेच तापले आहे. रखरखत्या उन्हाने जमीन कमालीची तापून चटके बसू लागले आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सूर्यनारायण कोपू लागल्याने सर्वत्र उन्हाच्या झळा बसत आहेत. दिवसभर अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने अंगाची काहिली असह्य होत आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अंगात पांढºया रंगाचे सुती वस्त्र, डोक्यावर टोपी, उपरणे, डोळ्यावर काळे गॉगल लावण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे उन्हात बचाव करणाºया या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा आहे. श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या तापमापकावर या उन्हाळ्यातील सर्वोच्च ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शनिवार व सोमवारीदेखील श्रीरामपूरच्या मेनरोडवर ४३ अंश सेल्सिअस तापमान पोहोचले होते. मंगळवारी दुपारनंतर उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर थोडा खाली घसरला. श्रीगोंदा शहरात ४० अंश तर श्रीगोंदा कारखाना कार्यस्थळावर ४१ अंश सेल्सिअसवर पारा पोहोचला होता. राहुरीतही मंगळवारी ४२ अंश सेल्सिअसवरच पारा घुटमळत होता. त्यामुळे खंडेरायाच्या यात्रेतील गर्दीवरदेखील परिणाम जाणवत होता. दिवसा उन्हाचे चटके बसत असल्याने रात्री उशिरापर्यंत यात्रेत गर्दी होत आहे. ..................................उष्म्याने जीव झाला कासावीसशीतपेयांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. दुपारी बारा वाजल्यानंतर रस्त्यावर शुकशुकाट पसरत आहे. नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. मंगळवारी दुपारी २ वाजता कोपरगाव शहर व तालुक्यात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या महिनाभरातील हे सर्वोच्च तापमान गणले गेले आहे. पावसाळा सुरू होण्यास दोन महिन्यांचा अवधी बाकी आहे. मात्र आताच कोपरगावकरांचा जीव उष्म्याने कासावीस होऊ लागल्याने त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम जाणवत आहे. आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.