शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

पारा ४३ अंशापार

By admin | Updated: April 18, 2017 17:19 IST

सध्याच्या उन्हाळ्यातील ‘एप्रिल हीट’ने कोपरगाव शहर व तालुक्यात कहर केला असून मंगळवारी तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहचल्याने कोपरगावकरांचा जीव कासावीस झाला.

अहमदनगर : सध्याच्या उन्हाळ्यातील ‘एप्रिल हीट’ने कोपरगाव शहर व तालुक्यात कहर केला असून मंगळवारी तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहचल्याने कोपरगावकरांचा जीव कासावीस झाला. श्रीरामपूरमध्ये या उन्हाळ्यातील ४३ अंश सेल्सिअस एवढ्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. राहुरीतही मंगळवारी ४२ अंश सेल्सिअसवर तापमापकातील पारा पोहोचला होता.गेल्या वर्षी चांगला पाऊस झालेला असला तरी यंदाचा उन्हाळा अतिशय कडक जाणवत आहे. दिवसेंदिवस पडणारे कडाक्याचे ऊन व सातत्याने वाढणारी प्रचंड उष्णता यामुळे वातावरण भलतेच तापले आहे. रखरखत्या उन्हाने जमीन कमालीची तापून चटके बसू लागले आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सूर्यनारायण कोपू लागल्याने सर्वत्र उन्हाच्या झळा बसत आहेत. दिवसभर अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने अंगाची काहिली असह्य होत आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अंगात पांढºया रंगाचे सुती वस्त्र, डोक्यावर टोपी, उपरणे, डोळ्यावर काळे गॉगल लावण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे उन्हात बचाव करणाºया या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा आहे. श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या तापमापकावर या उन्हाळ्यातील सर्वोच्च ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शनिवार व सोमवारीदेखील श्रीरामपूरच्या मेनरोडवर ४३ अंश सेल्सिअस तापमान पोहोचले होते. मंगळवारी दुपारनंतर उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर थोडा खाली घसरला. श्रीगोंदा शहरात ४० अंश तर श्रीगोंदा कारखाना कार्यस्थळावर ४१ अंश सेल्सिअसवर पारा पोहोचला होता. राहुरीतही मंगळवारी ४२ अंश सेल्सिअसवरच पारा घुटमळत होता. त्यामुळे खंडेरायाच्या यात्रेतील गर्दीवरदेखील परिणाम जाणवत होता. दिवसा उन्हाचे चटके बसत असल्याने रात्री उशिरापर्यंत यात्रेत गर्दी होत आहे. ..................................उष्म्याने जीव झाला कासावीसशीतपेयांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. दुपारी बारा वाजल्यानंतर रस्त्यावर शुकशुकाट पसरत आहे. नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. मंगळवारी दुपारी २ वाजता कोपरगाव शहर व तालुक्यात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या महिनाभरातील हे सर्वोच्च तापमान गणले गेले आहे. पावसाळा सुरू होण्यास दोन महिन्यांचा अवधी बाकी आहे. मात्र आताच कोपरगावकरांचा जीव उष्म्याने कासावीस होऊ लागल्याने त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम जाणवत आहे. आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.