शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सभासदांनी ऊस राहुरी कारखान्याला द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST

तनपुरे साखर कारखान्याने पंधरवडा पेमेंट २१०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केले आहे. दुसरा पंधरवडा येत्या दोन दिवसांत वर्ग करण्यात ...

तनपुरे साखर कारखान्याने पंधरवडा पेमेंट २१०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केले आहे. दुसरा पंधरवडा येत्या दोन दिवसांत वर्ग करण्यात येणार आहे. मागील वर्षाची एफआरपी रक्कम ११६ रुपये प्रतिटन हीदेखील चालू महिनाअखेर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

राहुरी तालुक्यात फक्त अडीच लाख टन ऊस शिल्लक राहिलेला आहे. राहिलेला सर्व ऊस राहुरी कारखान्याला आला तरच शिल्लक दिवसांत चांगले गळीत होऊन जिल्हा सहकारी बँकेला मागील थकीत हप्ता जाईल. चालू गळीत हंगामात तयार होणाऱ्या प्रत्येक क्विंटल साखरेमागे पाचशे रुपये जिल्हा बँक भरून घेत आहे. त्यामुळे डॉ. सुजय विखे व संचालक मंडळ प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. तेव्हा तालुक्यातील सर्व सभासदांनी कारखाना वाचवायचा असेल तर आपला ऊस आपल्याच कारखान्याला द्या, असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.

....

बाहेरून टोळ्या आणण्याचे काम सुरू

तनपुरे सहकारी साखर कारखाना नियमितपणे सुरू झाला असून, बाहेरून टोळ्या आणण्याचे काम सुरू झाले आहे. यंदाचा गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी तनपुरे साखर कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे.

-नामदेवराव ढोकणे, अध्यक्ष, तनपुरे सहकारी साखर कारखाना, राहुरी