शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

गोडी सेद्रिंय आंब्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 11:36 IST

जखणगाव (ता.नगर) येथील शेतकरी बबन भागुजी कार्ले यांनी दोन हजार क्विंटल केशर आंबा सेंद्रिय पध्दतीने पिकवल्यामुळे परिसरातील गावांना या आंब्याची चांगलीच गोडी लागली आहे

नागेश सोनवणे

जखणगाव (ता.नगर) येथील शेतकरी बबन भागुजी कार्ले यांनी दोन हजार क्विंटल केशर आंबा सेंद्रिय पध्दतीने पिकवल्यामुळे परिसरातील गावांना या आंब्याची चांगलीच गोडी लागली आहे. कुठल्याही मार्केटला, बाजारात आंबे घेऊन न जाता घरीच या आंब्यांची विक्री होत आहे.नगर शहरापासन अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जखणगाव येथील कार्ले वस्तीवर शेतकरी बबन भागुजी कार्ले व त्यांची पत्नी रंजना कार्ले यांच्याकडे आंब्याची बाग आहे. जवळपास शंभर झाडे आहेत. ही झाडे सहा वर्षांची झाली आहेत. तीन वर्षांनंतर या झाडाला फळ येण्यास सुरवात झाली. आंबे विकण्याचे हे तिसरे वर्ष आहे. या झाडाला कुठल्याही प्रकारचे रासायनिक औषध फवारणी केली जात नाही किंवा रासायनिक खते दिली नाहीत. प्रत्येक वर्षी शेणखत व पाणी दिले जाते. पाण्यासाठी शेततळे बांधले आहे. आंब्याच्या सिझनमध्ये एक महिना आंबा विक्री होते. झाडाला पाड तयार झाला की तो उतरुन घरामध्ये सेंद्रिय पध्दतीने पिकवला जातो. या आंब्याची गोडी पाहून परिसरातील हिंगणगाव, टाकळी, खातगाव, हिवरेबाजार, पिंपळगाव वाघा, नेप्ती, निमगाव, नगर शहरातून नागरिक आंबे घेण्यासाठी घरी येतात. एका वेळेस दहा ते पंधरा किलो आंबे घेऊन जातात. साठ ते सत्तर रुपये किलो दराने आंब्याची विक्री केली जाते. सरासरी एक लाख सत्तर हजार रुपये प्रत्येक वर्षी मिळतात. विशेष म्हणजे आंबे विक्रीसाठी कुठेही बाजारपेठेत जावे लागत नाही. ग्रामस्थ फोन करुन आंबे बुकिंग करतात. वनराज आंब्याचे एकच झाड आहे या आब्यांच्या झाडाला १४ कॅरेट आंबे निघतात. हे चवदार आहेत. सगळे मिळून दोन हजार क्विंटल आंबा निघतो. एका माहिन्यात एक लाख सत्तर हजार रुपये होतात. सेंद्रिय पध्दतीने आंबा पिकवत असल्यामुळे आंबे घेण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी असते.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMangoआंबा