शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

टँकर ठेकेदारांवर मेहेरनजर : ठोस कारवाईस जिल्हा प्रशासनाची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 12:00 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता समोर आली आहे

अहमदनगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता समोर आली आहे. मात्र, ज्या दिवशी टँकर गावात गेलेला आढळला नाही तेवढ्या दिवसापुरती त्याच्या बिलात कपात करण्याची कारवाई केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.नगर जिल्ह्यात आठशेहून अधिक टँकरने पाणीपुरवठा होत आहे. राज्यात टँकरमध्ये हा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये जिल्ह्यात टँकर पुरवठ्यात मोठी अनियमितता आढळून आली. अनेक टँकरमध्ये जीपीएस यंत्रणाच कार्यरत नव्हती. टँकरचे लॉगबुकही भरलेले नव्हते. टँकर उद्भवाऐवजी दुसºयाच ठिकाणी भरले जात होते, असे या तपासणीत आढळले. याशिवाय जीपीएस यंत्रणा कोणत्याच बीडीओ कक्षात आढळली नव्हती. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर जीपीएस यंत्रणा कार्यरत करण्याचा प्रयत्न झाला.‘लोकमत’च्या स्टिंगनंतर प्रशासनाने पथके पाठवून तपासणी केली. त्यातही अनियमितता आढळून आली. मात्र, ज्या दिवशी अनियमितता आढळली तेवढ्या खेपांचे बिल न देण्याची जुजबी कारवाई प्रशासन करत आहे. टँकर पुरवठ्यात गंभीर त्रुटी आढळल्यास ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याची तरतूद आहे. मात्र, अशी कडक पावले प्रशासनाकडून उचलली जाताना दिसत नाहीत.शासनानेही ‘आरटीओ’ यांना वगळलेटँकरच्या टाकीची वहन क्षमता ‘आरटीओ’ यांनी प्रमाणित करावी, असा शासन आदेश आहे. मात्र, नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शुद्धिपत्रक काढून हे अधिकार आरटीओ यांच्याऐवजी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत. आरटीओ यांना का डावलण्यात आले? असा प्रश्न ‘लोकमत’ने उपस्थित केला होता. त्यानंतर शासनाने २३ मे रोजी परिपत्रक काढून हे अधिकार पाणी पुरवठा अभियंत्यांनाच देण्याचे धोरण घेतले.शासनालाही ‘आरटीओ’ यांचे वावडे का आहे ? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. टँकरमध्ये प्रत्यक्षात किती पाणी वाहिले जाते? याबाबत संशयकल्लोळ आहे. दरम्यान ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे ज्या त्रुटी निदर्शनास आणल्या त्यांचाही उल्लेख शासनाने परिपत्रकात केला आहे.गंभीर त्रुटी आढळल्या तरच ठेका रद्दखेपा न होण्यास सर्वस्वी टँकर चालकाला जबाबदार धरता येणार नाही. कधी उद्भवावर पाणी नसते. कधी वीज नसते. अशा कारणांमुळे खेपांत उशीर होऊ शकतो. गंभीर त्रुटी आढळल्या तरच ठेका रद्द करण्याची तरतूद आहे, अशी प्रतिक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय