शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
4
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
5
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
6
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
7
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
8
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
9
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
10
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
11
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
12
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
13
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
14
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
15
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
16
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
17
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
18
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
19
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
20
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...

पाणी वळविण्यासाठी पंतप्रधानांना भेटणार

By admin | Updated: June 13, 2014 01:14 IST

कोपरगाव : ८० टीएमसी पाणी गोदावरी, प्रवरा, मुळा खोऱ्यात वळविण्याच्या मुद्यांवर आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आ़ अशोक काळे यांनी दिली़

कोपरगाव : पश्चिमवाहिनी नद्यांमधून समुद्राला वाहून जाणारे सुमारे ८० टीएमसी पाणी गोदावरी, प्रवरा, मुळा खोऱ्यात वळविण्याच्या मुद्यांवर आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आ़ अशोक काळे यांनी दिली़या प्रश्नाबाबत नुकतीच जलसंपदा मंत्र्यांनी बैठक घेतली, मात्र पाणी वळविण्यासाठी लागणारा निधी केंद्र सरकारकडूनच मिळणार असल्याने पंतप्रधानांशी चर्चा करणे महत्त्वाचे ठरेल, असे आ़ काळे म्हणाले़ महाराष्ट्रातील सह्याद्री घाटमाथा आणि पश्चिमवाहिनी नद्यांमधून पावसाच्या वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी सुमारे ८० टीएमसी पाणी पूर्वेकडे जाऊ शकते़ यासाठी महाराष्ट्र शासनाने २००१ मध्ये एका समितीची स्थापना केली़ या समितीनेही त्याबाबत अनुकूल अहवाल दिलेला आहे़ मात्र शासनाने निष्क्रीय भूमिका घेतल्यामुळे आम्ही २०१२ साली मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली़ याबाबत लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे़ मात्र तब्बल बारा वर्षे आघाडी सरकार झोपलेले होते़ आता त्यांना जाग आली असून त्यांनी सर्वेक्षणाच्या सूचना दिल्याचे आ़ काळे यांनी म्हटले आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान पाणी वळविण्याचे संकेत दिले होते़ त्यामुळे आपण स्वत: व खा. सदाशिव लोखंडे मोदी यांच्यासह केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, जलसंपत्ती नियामक मंडळाच्या अध्यक्षांची भेट घेणार आहोत, असेही काळे म्हणाले़ (प्रतिनिधी)