शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

उद्या वैद्यकीय सेवा बंद : एनएमसी विधेयकाला आयएएमचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 16:57 IST

संसदेत सादर झालेल्या ‘राष्ट्रीय मेडिकल कमिशन’ विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी शहरातील सर्व वैद्यकीय सेवा उद्या (शनिवारी) बंद राहतील.

अहमदनगर : संसदेत सादर झालेल्या ‘राष्ट्रीय मेडिकल कमिशन’ विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी शहरातील सर्व वैद्यकीय सेवा उद्या (शनिवारी) बंद राहतील. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अहमदनगर शाखेचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मिश्रा व सचिव डॉ. शंकर शेळके यांनी आज पत्रकाद्वारे ही माहिती दिली. आणीबाणीच्या परिस्थितीतीसाठी आवश्यक व जीवरक्षक प्रणाली सेवा मात्र नेहमीप्रमाणेच सुरू राहील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.या विधेयकाला राष्ट्रीय पातळीवर विरोध करण्याचा निर्णय ‘आयएमए’ने घेतला आहे. त्यानुसार शहरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद राहतील. हे विधेयक गरीब, सर्वसामान्य आणि संघराज्ये यांच्या विरोधात असल्याने ते मंजूर करू नये, अशी संघटनेची मागणी असल्याचे डॉ. मिश्रा व डॉ. शेळके यांनी सांगितले. याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी वैद्यकीय व्यावसायिकांना, रुग्णालयांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ‘आयएमए’च्या केंद्रीय कृतिसमितीच्या व त्यानंतर संघटनेच्या राज्य शाखांचे अध्यक्ष, सचिव व विस्तारित कृतिसमिती यांच्या बैठकांमध्ये नॅशनल मेडिकल कमिशन बिल (२०१७) च्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा झाली. हे विधेयक गरीब, सर्वसामान्य जनता, तसेच संघराज्य विरोधी असल्याचे चचेर्तून स्पष्ट झाले. त्यातल्या सुधारणांसह हे बिल धनिकधार्जिणे असल्याचा ठाम निष्कर्ष आयएमने काढला आहे. अतिशय घाईने आणलेले हे विधेयक मंजूर करू नये, या मागणीसाठीच वैद्यकीय सेवांचा उद्याचा ‘राष्ट्रीय बंद’ आहे, असे डॉ. मिश्रा व डॉ. शेळके यांनी सांगितले.विधेयकामुळे वैद्यकीय शिक्षण गरीब- वंचितांच्या आवाक्याबाहेर जाईल. प्रामुख्याने समाजाच्या धनिक व नागरी वगार्तून डॉक्टर तयार होणे स्वीकारार्ह नाही. वंचितांचा आवाज बनून या काळ्या कायद्याशी लढणे संघटना आपले राष्ट्रीय कर्तव्य समजते. असा कायदा होणार याची चाहूल लागताच उत्तराखंड व महाराष्ट्रातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी एमबीबीएसचे शुल्क २५ ते ३० लाख रुपयांनी वाढविले. वैद्यकीय शिक्षणासाठी धनिक बाळांसाठीच ५० टक्के जागा राखून ठेवण्याचा हा प्रकार समान संधी नाकारणारा आणि त्यामुळेच जनविरोधी आहे, असे निवेदनात म्हटले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सध्या बहुतांश राज्यांमध्ये शुल्क निर्धारण समित्या असल्यामुळे राज्य सरकारांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५० जागांचा कोटा ठेवणे शक्य झाले. सरकारच्या प्रक्रियेतून निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांप्रमाणे शुल्क भरणे त्यामुळेच शक्य झाले आहे. नव्या कायद्यामुळे हे सगळे बदलेल. एमबीबीएससाठी केंद्रीकृत अंतिम परीक्षेची संकल्पना ग्रामीण-आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी ठरेल. त्यात नागरी व श्रीमंत विद्यार्थ्यांना अंगभूत अनुकूलता आहे.राज्यांची वैद्यकीय विद्यापीठे अभ्यासक्रम ठरविण्यामध्ये निर्णायक भूमिका वठवितात. वैद्यकीय स्नातकांना पदवी प्रदान करण्याचे काम त्यांचे असते. परंतु नव्या आयोगात त्यांना राष्ट्रीय सल्लागार परिषदेहून दुय्य्म स्थान देण्यात आलेले आहे. राज्य सरकारे, वैद्यकीय परिषद व विद्यापीठे यांना दुय्यम स्थान देणारे या विधेयकाचे स्वरूप राज्यघटनेतील तरतुदींवर कठोर आघात करणारे आहे. भारतीय वैद्यकीय परिषद कायद्यानव्ये (१९५६) वैद्यकीय व्यवसायाला स्वायत्तता प्रदान करण्यात आली. त्यामुळे देशात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर निर्माण होऊन उत्तम रुग्णसेवेचा पाय घातला गेला. विधेयकातील जुजबी सुधारणांमुळे तिचे रक्षण होणार नाही. वैद्यकीय व्यवसायाच्या स्वायत्ततेशी केली जाणारी ही छेडछाड देशाच्या व पुढच्या अनेक पिढ्यांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम करणारी ठरेल. हे विधेयक आहे तसे रेटण्याचा प्रयत्न केल्यास, सरकारला विरोधाचा सामना करावा लागेल, असा इशाराही ‘आयएमए’ने दिला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMedicalवैद्यकीय