शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातील आपत्तीसाठी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST

संगमनेर : देशभरात यंदा समाधानकारक पाऊस असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानंतर, अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने मे ...

संगमनेर : देशभरात यंदा समाधानकारक पाऊस असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानंतर, अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने मे महिन्याच्या २० तारखेला बैठक घेतली होती. कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. त्या दृष्टीने प्रशासकीय आता यंत्रणा कामाला लागली आहे.

आपत्ती व्यवस्थापनाच्या झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भाेसले यांनी कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या होत्या. उपविभागीय अधिकारी, अहमदनगर महानगरपालिका, जिल्हा परिषद यांचे अधिकारी, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील तहसीलदार, जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपालिका, नगरपंचायतींचे मुख्याधिकारी, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी आदी या बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.वीरेंद्र बडदे यांनी सांगितले.

पावसाळ्यात कोणतीही आपत्ती आली, तरी त्याला सक्षमपणे तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. लागणाऱ्या बोटी आणि इतर वस्तूंची सज्जता ठेवण्यात आली आहे. कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा, राहुरी येथे फायटर बोटी आहेत. आवश्यकतेनुसार इतर वस्तूही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तालुक्याच्या ठिकाणी लाइफ जॅकेट उपलब्ध आहेत. महसूल विभाग, पोलीस प्रशासन यांच्याकडेही लाइफ जॅकेट आहेत, असेही डॉ.बडदे यांनी सांगितले. महावितरणची जिल्हा पातळीवर कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. असे महावितरणच्या संगमनेर उपविभागाचे प्रभारी अधिकारी एस.एस. मुळे यांनी सांगितले. अहमदनगर महानगर पालिकेने प्रत्येक प्रभागात प्रभागनिहाय आपतकालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन केले आहेत.

माळीवाडा येथील अग्निशमन विभागात मुख्य कक्ष कार्यरत आहे. येथून या प्रभाग निहाय स्थापन केलेल्या कक्षांना सूचना देण्यात येतात.

--------------

अग्निशमन दल सज्ज

एखादी मोठी आपत्ती आल्यास प्रभागनिहाय स्थापन केलेल्या कक्षातील कर्मचारी एकत्र मिळून काम करतात. १ जूनपासून ते पावसाळा संपेपर्यंत २४ तास कर्मचारी येणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी नियुक्त केले आहेत. कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दल सज्ज आहे. असे अहमदनगर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शंकर मिसाळ यांनी सांगितले.

---------------

आपत्ती व्यवस्थापन संदर्भाने संगमनेर नगर परिषदेच्या वतीने आराखडा तयार करण्यात आला असून, तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. नदी काठच्या नागरिकांना पूर्वसूचना म्हणून नोटीस दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य एकत्र करत, नगरपरिषदेत विशेष कक्ष स्थापन केला आहे. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येईल. या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

डॉ.सचिन बांगर, मुख्याधिकारी, संगमनेर नगरपरिषद.

-----------

हवामान खात्याकडून माहिती मिळते. त्यानुसार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून इतर सर्व विभागांना माहिती देण्यात येते. नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांना सूचना देण्यासाठी अलर्ट सीस्टिम असून, मोबाइलवर संदेशाद्वारे त्यांना माहिती कळविली जाते. आपत्तीचा सामना करण्यासाठी सैन्य दलाची तुकडीही सज्ज आहे.

डॉ.वीरेंद्र बडदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अहमदनगर

------------------

790