शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

नागपूर अधिवेशनानंतर महापौर बदल?

By admin | Updated: December 11, 2014 00:37 IST

अहमदनगर : महापौर असलेले संग्राम जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडल्याने सुरूवातीच्या काळात सुरू झालेली महापौर बदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

अहमदनगर : महापौर असलेले संग्राम जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडल्याने सुरूवातीच्या काळात सुरू झालेली महापौर बदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर महापालिकेत राजकीय खांदेपालट होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. जगताप समर्थकांनी मात्र या बदलाबाबत बोलण्यास नकार दिला असून राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या गोटातून बदलास दुजोरा दिला. डिसेंबर २०१३ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा मिळवत नगरसेवकांची मोट बांधण्यात यश मिळवत सत्ता स्थापन केली. संग्राम जगताप यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा महापौर पदाची माळ पडली. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. त्यानंतर लगेचच जगताप राजीनामा देणार, नवीन महापौर शहराला मिळणार याची चर्चा सुरू झाली. पण खुद्द संग्राम जगताप यांनीच असा कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करत ‘घाई करू नका’ असा पक्षश्रेष्ठींचा निरोप असल्याचे समर्थकांना सांगितले. त्यामुळे बदलाची चर्चा थंडावली. आता पुन्हा ही चर्चा जोर धरू लागली आहे. संग्राम जगताप हे महापौर पदाचा राजीनामा देणार असून अभिषेक कळमकर यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत आमदार अरुण जगताप यांची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मिळाली. त्यांनीही अधिवेशनानंतर पाहू असे म्हटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासंदर्भात अरुण जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. आमदार अरुण जगताप यांची अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आहे. पण चर्चेचा तपशील समजू शकला नाही, अशी माहिती माजी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी दिली. (प्रतिनिधी)