श्रीगोंदा : विवाहानंतर अवघ्या १५ दिवसातच पतीराजाला गुडबाय करीत नववधूने तिच्या पसंतीच्या तरुणाबरोबर गुरुवारी (दि़१९) लग्नाची गाठ बांधली. गळ्यात फुलांचा हार आणि कपाळी मोत्याचे बाशींग अशा अवस्थेतच या नववधू-वराने पोलीस ठाणे गाठून पोलिसांचे आशीर्वाद घेतले. याबाबत समजलेली माहिती अशी की, कोंडेगव्हाण येथील एका मुलीचा लोणीव्यंकनाथ येथील एका तरुणाशी १५ दिवसापूर्वी थाटामाटात विवाह झाला. मात्र, आई-वडिलांनी थाटून दिलेल्या संसाराचा डाव या नववधूने अवघ्या १५ दिवसातच मोडला़ इच्छेच्या विरोधात आई-वडिलांनी तिला नापसंत असणाऱ्या तरुणाशी तीचे लग्न लावून दिले़ त्यामुळे या नववधूने तीच्या पसंतीच्या तरुणाबरोबर पळून जाऊन गुरुवारी कायदेशीर पद्धतीने विवाह केला. विवाहानंतर दोघांनीही थेट बेलवंडी पोलीस ठाणे गाठले. माझा पहिला विवाह माझ्या मनाविरुद्ध झाला म्हणून मी या आवडत्या तरुणाशी विवाह केला. पहिल्या पती विरोधात माझी कोणतीही तक्रार नाही, असे नववधूने पोलिसांना सांगितले़ (तालुका प्रतिनिधी)
पोलिसांच्या साक्षीने ‘आवडत्या’शी विवाह
By admin | Updated: June 20, 2014 00:38 IST