शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

मार्चएण्ड संपला, जिल्हा परिषदेचे ७३ कोटी अजूनही शिल्लकच

By चंद्रकांत शेळके | Updated: April 4, 2023 15:40 IST

मार्च एण्ड संपल्यानंतरही दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषदेचा निधी अखर्चितच राहिला आहे.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : मार्च एण्ड संपल्यानंतरही दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषदेचा निधी अखर्चितच राहिला आहे. जिल्हा परिषदेला मिळालेल्या ३६३ पैकी २९० कोटी खर्च झाले असून अजूनही ७३ कोटी शिल्लक आहेत. मात्र मागील वर्षीपेक्षा हा खर्च २० टक्के अधिक आहे. मागील वर्षी जिल्हा परिषदेचा खर्च मार्चअखेर ६० टक्क्यांपर्यंतच पोहोचला होता.

दरवर्षी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला निधी दिला जातो. २०२१-२२ या वर्षात ३६८ कोटी ७० लाखांचा निधी जिल्हा परिषदेला मंजूर झाला होता. त्यापैकी ३६३ कोटी ६३ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला प्रत्यक्ष मिळाला. पुढील दोन वर्षे म्हणजे मार्च २०२३ अखेर हा निधी खर्च करण्याची मुदत होती. गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुखांनी बैठकांवर बैठका घेऊन अधिकाधिक खर्चाचे नियोजन केले. परंतु मार्चअखेर जिल्हा परिषदेचा खर्च ८० टक्क्यांपर्यंतच पोहोचला. एकूण मिळालेल्या ३६३ कोटींपैकी २९० कोटी मार्चअखेर खर्च झाले असून अजूनही ७३ कोटी अखर्चित दिसत आहे.

शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम उत्तर, पशुसंवर्धन विभागांचे खर्च ७० टक्क्यांच्या खाली असल्याने एकूण खर्चाची सरासरी घसरली आहे. दरम्यान हा खर्च मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. मागील वर्षी पदाधिकारी असतानाही खर्चाचे प्रमाण केवळ ६० टक्के होते. गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी हेच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. त्या तुलनेत त्यांनी चांगला खर्च केलेला दिसत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"