शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कोरोनासोबत मलेरिया, डेंग्यू ठरणार ‘ताप’दायक;  सरकारी यंत्रणा, जिल्हा हिवताप कार्यालय सतर्क

By अनिल लगड | Updated: June 17, 2020 14:54 IST

यंदाचा पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात कीटकजन्य जीव मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. यामुळे  मलेरिया, डेंग्यू, चिकनगुणियासारखे आजार बळावण्याचा धोका वाढला आहे. त्यामळे प्रत्येक नागरिकांनी कोरोनासोबत आता इतर आजारांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

अहमदनगर : यंदाचा पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात कीटकजन्य जीव मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. यामुळे  मलेरिया, डेंग्यू, चिकनगुणियासारखे आजार बळावण्याचा धोका वाढला आहे. त्यामळे प्रत्येक नागरिकांनी कोरोनासोबत आता इतर आजारांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

पावसाळा सुरू झाला की कीटकांची उत्पत्ती होते. या कीटकापांसून हिवताप, डेंग्यू, चिकनगुणिया, हत्तीरोग आजार दरवर्षी मोठ्या प्रमाणात बळावतात. या रोगांपासून अनेक जणांना जीवही गमवावा लागतो. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, महापालिका पातळीवर पावसाळ्यात स्वच्छतेबाबत काळजी घेतली जाते.

 डेंग्यू हा एडिस एजिप्सी डासापासून होते. या डासांच्या दूषित मादीने चावा घेतल्यानंतर डेंग्यू तापाची लक्षणे आढळतात. कोणत्याही व्यक्तीला डेंग्यू होऊ शकतो. मात्र प्रामुख्याने लहान मुलांना संसर्गाचा धोका अधिक असतो. नगर जिल्हा सामान्य रुग्णालयात सेंटीनल सेंटर आहे. येथे डेंग्यूची मोफत तपासणी होते. खासगी रुग्णालयातही या रोगाचे निदान केले जाते. खासगी रुग्णालयातील रॅपीड कीटमध्ये ९५ टक्के निदान होते. तर चिकनगुण्यासाठी पुणे येथील राष्टÑीय विषाणू संस्थेत रक्तजल तपासणीसाठी रक्तनमुने पाठविले जातात. ज्या भागात या आजारांचा उद्रेक आहे. त्या भागात नियमित ताप सर्वेक्षण, हिवताप रक्तनमुने घेऊन प्रयोगशाळेला पाठविणे. 

रुग्ण दूषित आढळल्यास रुग्णास उपचार करणे. डेंग्यू संवेदनशील गावात धूर फवारणी करणे.  कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करणे, डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडणे, ताप रुग्णाचे रक्तजल नमुने घेणे. तत्काळ सेंटीनल सेंटरकडून तपासणी करुन घेणे, कंटेनर सर्वेक्षण करणे, दूषित कंटेनर रिकामे करणे, त्यात अ‍ॅबेट द्रावण टाकणे, आरोग्य शिक्षणाव्दारे जनजागृती करण्याचे काम जिल्हा हिवताप कार्यालयाकडून करण्यात येते, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रजनी खुणे यांनी सांगितले. 

रोगाची लक्षणे अशी..तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, अंगावर पुरळ येणे, सांधेदुखी, शरीरातील पेशी कमी होणे, नाकातून, हिरड्यातून रक्तस्त्राव होणे. 

हिवताप रक्त तपासणीराष्टÑीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत नगर जिल्ह्यात सन २०१७ मध्ये ६ लाख २१ हजार २८९ रक्तनमुने तपासले. यातील १३ हिवताप रुग्ण आढळले. २०१८ मध्ये ६ लाख २४ हजार ८९५ रक्तनमुने तपासले. यात ११ रुग्ण आढळून आले. २०१९ मध्ये ४ लाख ८२ हजार १३२ रक्तनमुने तपासले. त्यात फक्त २ रुग्ण आढळले.  एप्रिल २०२० मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान १ लाख ५३ हजार ९४४ रक्तनमुने संकलित करण्यात आले. त्यात फक्त दोनच रुग्ण हिवतापाचे आढळून आले आहेत. 

तीन वर्षात ५८९ डेंग्यूचे रुग्ण४सन २०१७-३६५ रक्तनमुने-७८ रुग्ण आढळले. एकाचा मृत्यू. २०१८-६१५ रक्तनमुने-१४५ रुग्ण आढळले. २०१९-१४४० रक्तनमुने-३५९ रुग्ण आढळले. २०२०-जानेवारी ते मार्च ४९ रक्त नमुने-७ रुग्ण आढळले. 

चिकणगुणिया तपासणी२०१७-७, २०१८-२५, २०१९-९, २०२०-८ रुग्ण आढळून आले आहेत. 

सर्व नागरिकांनी कोरोनाच्या आजाराकडे लक्ष द्यावे. पण, इतर आजारांकडेही लक्ष ठेवावे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकसहभागातून नायनाट करणे हाच प्रमुख उद्देश आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया यासारखे आजाराला प्रतिबंध बसतो. याबाबत कार्यालयाकडून उपाययोजना सुरू आहेत.-डॉ.रजनी खुणे, जिल्हा हिवताप अधिकारी, अहमदनगर.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरdengueडेंग्यूTemperatureतापमानHealthआरोग्य