शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

साखर नको इथेनॉल तयार करा-नितीन गडकरी, महाराष्ट्र विकासात एक क्रमांकावर असावा हीच इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 12:26 IST

अहमदनगर: मी महाराष्ट्राचा असल्याने नवी दिल्लीत महाराष्ट्राचेच प्रतिनिधीत्त्व करतो. इथल्या संत-महापुरुषांच्या विचारांचा वारसा मला मिळालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नेहमीच विकासात देशात एक क्रमांकावर असावा, अशीच इच्छा आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आता उसापासून साखर निर्मिती बंद करा, तर त्याऐवजी इथेनॉल निर्मिती करा, असे आवाहन त्यांनी केले. 

अहमदनगर: मी महाराष्ट्राचा असल्याने नवी दिल्लीत महाराष्ट्राचेच प्रतिनिधीत्त्व करतो. इथल्या संत-महापुरुषांच्या विचारांचा वारसा मला मिळालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नेहमीच विकासात देशात एक क्रमांकावर असावा, अशीच इच्छा आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आता उसापासून साखर निर्मिती बंद करा, तर त्याऐवजी इथेनॉल निर्मिती करा, असे आवाहन त्यांनी केले. 

अहमदनगर येथे चार महामार्गांचे भूमिपूजन व चार महामार्गांचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे शोषण करू नये.  केवळ उसापासून नव्हे तर तांदुळ, मका व इतर धान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. ब्राझिलच्या धर्तीवर इलेक्ट्रीक व इथेनॉलवर वाहने चालविण्याची गरज आहे.  साखरेचे रुपांतर आता इथेनॉलमध्ये करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. मी पेट्रोलच्या गाडीत नव्हे तर इथेनॉलच्याच गाडीत बसेल, अशी प्रतिज्ञा आता शेतकऱ्यांनी करायला हवी आहे.

गडकरी म्हणाले, भूक, गरिबी, शेतकरी, रोजगार निर्मिती, वॉटर, पॉवर, वाहतूक यामध्ये आता विकसित व्हावे लागेल.  रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत झाली. म्हणून देशात रस्ते करीत आहे. महाराष्ट्र सरकारने जागा दिल्या तर अनेक उद्योग महाराष्ट्रात उभे करण्याचे नियोजन असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

 

यावेळी शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांना आता साखर उत्पादनावर नव्हे तर इथेनॉल निर्मितीवर अवलंबून रहावे लागेल. आता साखर एके साखर असे करून चालणार नाही. तर इथेनॉल आणि त्याहीपुढे जावे लागेल. विकासाचा वास्तव दृष्टिकोन गडकरी यांच्याकडे असल्याचे गौरवोद्वागरही पवार यांनी काढले.

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, काही रस्त्यांचे ठेकेदार पळून गेले आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्गांचे काम नगर जिल्ह्यात प्रगतीपथावर आहे. देशात अहमदनगरमधील विकास कामात एक नंबर आहे. शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्या माध्यमातून राज्याचा-देशाचा विकास होईल, अशी खात्री आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले. पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी शहरातून जाणाऱ्या रस्त्यांच्या मजबुतीकरण करण्याची मागणी केली.         

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNitin Gadkariनितीन गडकरी