शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

साखर नको इथेनॉल तयार करा-नितीन गडकरी, महाराष्ट्र विकासात एक क्रमांकावर असावा हीच इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 12:26 IST

अहमदनगर: मी महाराष्ट्राचा असल्याने नवी दिल्लीत महाराष्ट्राचेच प्रतिनिधीत्त्व करतो. इथल्या संत-महापुरुषांच्या विचारांचा वारसा मला मिळालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नेहमीच विकासात देशात एक क्रमांकावर असावा, अशीच इच्छा आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आता उसापासून साखर निर्मिती बंद करा, तर त्याऐवजी इथेनॉल निर्मिती करा, असे आवाहन त्यांनी केले. 

अहमदनगर: मी महाराष्ट्राचा असल्याने नवी दिल्लीत महाराष्ट्राचेच प्रतिनिधीत्त्व करतो. इथल्या संत-महापुरुषांच्या विचारांचा वारसा मला मिळालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नेहमीच विकासात देशात एक क्रमांकावर असावा, अशीच इच्छा आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आता उसापासून साखर निर्मिती बंद करा, तर त्याऐवजी इथेनॉल निर्मिती करा, असे आवाहन त्यांनी केले. 

अहमदनगर येथे चार महामार्गांचे भूमिपूजन व चार महामार्गांचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे शोषण करू नये.  केवळ उसापासून नव्हे तर तांदुळ, मका व इतर धान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. ब्राझिलच्या धर्तीवर इलेक्ट्रीक व इथेनॉलवर वाहने चालविण्याची गरज आहे.  साखरेचे रुपांतर आता इथेनॉलमध्ये करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. मी पेट्रोलच्या गाडीत नव्हे तर इथेनॉलच्याच गाडीत बसेल, अशी प्रतिज्ञा आता शेतकऱ्यांनी करायला हवी आहे.

गडकरी म्हणाले, भूक, गरिबी, शेतकरी, रोजगार निर्मिती, वॉटर, पॉवर, वाहतूक यामध्ये आता विकसित व्हावे लागेल.  रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत झाली. म्हणून देशात रस्ते करीत आहे. महाराष्ट्र सरकारने जागा दिल्या तर अनेक उद्योग महाराष्ट्रात उभे करण्याचे नियोजन असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

 

यावेळी शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांना आता साखर उत्पादनावर नव्हे तर इथेनॉल निर्मितीवर अवलंबून रहावे लागेल. आता साखर एके साखर असे करून चालणार नाही. तर इथेनॉल आणि त्याहीपुढे जावे लागेल. विकासाचा वास्तव दृष्टिकोन गडकरी यांच्याकडे असल्याचे गौरवोद्वागरही पवार यांनी काढले.

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, काही रस्त्यांचे ठेकेदार पळून गेले आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्गांचे काम नगर जिल्ह्यात प्रगतीपथावर आहे. देशात अहमदनगरमधील विकास कामात एक नंबर आहे. शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्या माध्यमातून राज्याचा-देशाचा विकास होईल, अशी खात्री आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले. पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी शहरातून जाणाऱ्या रस्त्यांच्या मजबुतीकरण करण्याची मागणी केली.         

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNitin Gadkariनितीन गडकरी