शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

साखर नको इथेनॉल तयार करा-नितीन गडकरी, महाराष्ट्र विकासात एक क्रमांकावर असावा हीच इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 12:26 IST

अहमदनगर: मी महाराष्ट्राचा असल्याने नवी दिल्लीत महाराष्ट्राचेच प्रतिनिधीत्त्व करतो. इथल्या संत-महापुरुषांच्या विचारांचा वारसा मला मिळालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नेहमीच विकासात देशात एक क्रमांकावर असावा, अशीच इच्छा आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आता उसापासून साखर निर्मिती बंद करा, तर त्याऐवजी इथेनॉल निर्मिती करा, असे आवाहन त्यांनी केले. 

अहमदनगर: मी महाराष्ट्राचा असल्याने नवी दिल्लीत महाराष्ट्राचेच प्रतिनिधीत्त्व करतो. इथल्या संत-महापुरुषांच्या विचारांचा वारसा मला मिळालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नेहमीच विकासात देशात एक क्रमांकावर असावा, अशीच इच्छा आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आता उसापासून साखर निर्मिती बंद करा, तर त्याऐवजी इथेनॉल निर्मिती करा, असे आवाहन त्यांनी केले. 

अहमदनगर येथे चार महामार्गांचे भूमिपूजन व चार महामार्गांचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे शोषण करू नये.  केवळ उसापासून नव्हे तर तांदुळ, मका व इतर धान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. ब्राझिलच्या धर्तीवर इलेक्ट्रीक व इथेनॉलवर वाहने चालविण्याची गरज आहे.  साखरेचे रुपांतर आता इथेनॉलमध्ये करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. मी पेट्रोलच्या गाडीत नव्हे तर इथेनॉलच्याच गाडीत बसेल, अशी प्रतिज्ञा आता शेतकऱ्यांनी करायला हवी आहे.

गडकरी म्हणाले, भूक, गरिबी, शेतकरी, रोजगार निर्मिती, वॉटर, पॉवर, वाहतूक यामध्ये आता विकसित व्हावे लागेल.  रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत झाली. म्हणून देशात रस्ते करीत आहे. महाराष्ट्र सरकारने जागा दिल्या तर अनेक उद्योग महाराष्ट्रात उभे करण्याचे नियोजन असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

 

यावेळी शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांना आता साखर उत्पादनावर नव्हे तर इथेनॉल निर्मितीवर अवलंबून रहावे लागेल. आता साखर एके साखर असे करून चालणार नाही. तर इथेनॉल आणि त्याहीपुढे जावे लागेल. विकासाचा वास्तव दृष्टिकोन गडकरी यांच्याकडे असल्याचे गौरवोद्वागरही पवार यांनी काढले.

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, काही रस्त्यांचे ठेकेदार पळून गेले आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्गांचे काम नगर जिल्ह्यात प्रगतीपथावर आहे. देशात अहमदनगरमधील विकास कामात एक नंबर आहे. शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्या माध्यमातून राज्याचा-देशाचा विकास होईल, अशी खात्री आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले. पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी शहरातून जाणाऱ्या रस्त्यांच्या मजबुतीकरण करण्याची मागणी केली.         

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNitin Gadkariनितीन गडकरी