शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

वृक्षलागवडीने जिल्हा हिरवागार करा : राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 18:01 IST

ज्या ज्या ठिकाणी वनाच्छादित परिसर आहे, तेथे पाऊस चांगला पडतो आणि पर्यावरण चांगले राहते. त्यामुळे जिल्ह्यात लोकसहभागाने अधिकाधिक संख्येने वृक्षारोपण करुन जिल्हा हिरवागार करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

टाकळी ढोकेश्वर : ज्या ज्या ठिकाणी वनाच्छादित परिसर आहे, तेथे पाऊस चांगला पडतो आणि पर्यावरण चांगले राहते. त्यामुळे जिल्ह्यात लोकसहभागाने अधिकाधिक संख्येने वृक्षारोपण करुन जिल्हा हिरवागार करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.राज्यातील वनआच्छादन वाढविण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या ५० कोटी वृक्षलागवड मोहिमेत यावर्षी राज्यभरात १३ कोटी वृक्षलागवड केली जाणार आहे. या वृक्षलागवड मोहिमेचा जिल्ह्यातील शुभारंभ पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळा येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आदर्श गाव समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपवनसंरक्षक एम. आदर्श रेड्डी, विभागीय वनाधिकारी कीर्ति जमदाडे-कोकाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, विश्वनाथ कोरडे, राजेंद्र कोरडे, वसंतराव चेडे, तहसीलदार भारती सागरे, तहसीलदार विशाल तनपुरे, सरपंच छाया शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती. मुख्य कार्यक्रमानंतर टाकळी ढोकेश्वर शिवार आणि धोत्रे शिवारातही पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनीही प्रा. शिंदे यांच्यासह सावताळा वनक्षेत्रावर वृक्षारोपण केले.पालकमंत्री म्हणाले, १ ते ३१ जुलै या कालावधीत होणाऱ्या वृक्षलागवड मोहिमेचे नियोजन वर्षभरापासून सुरु आहे. जिल्ह्यातही ४९ लाख ९४ हजार रोपांची लागवड होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. राज्याचे वन आच्छादन वाढविण्यासाठी वृक्षलागवडीचा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.प्रत्येक गावालगतचे मोकळे डोंगर, टेकड्या, परिसर हिरवागार करावा आणि पर्यावरण रक्षणासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.पवार म्हणाले, वनव्यवस्थापन समित्यांमार्फत राज्यात चांगले काम होत आहे. त्यातही आपला अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. जलसंधारण कामे चांगल्या प्रमाणात झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियान ही आपल्या राज्याने देशाला दिलेली देणगी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्यातील उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, ग्रामपंचायत आणि इतर शासकीय यंत्रणा वृक्षलागवड करण्याचे नियोजन या मोहिमेत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना, शाळा-महाविद्यालये, विविध औद्योगिक आस्थापना, व्यापारी संस्था, असोसिएशन्स यांनीही शासनाच्या या कामात लोकसहभाग दिला आहे. विविध ठिकाणी त्यांच्या वतीनेही वृक्षलागवड मोहिम राबविण्यात येणार, असे रेड्डी यांनी सांगितले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदे