शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

वृक्षलागवडीने जिल्हा हिरवागार करा : राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 18:01 IST

ज्या ज्या ठिकाणी वनाच्छादित परिसर आहे, तेथे पाऊस चांगला पडतो आणि पर्यावरण चांगले राहते. त्यामुळे जिल्ह्यात लोकसहभागाने अधिकाधिक संख्येने वृक्षारोपण करुन जिल्हा हिरवागार करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

टाकळी ढोकेश्वर : ज्या ज्या ठिकाणी वनाच्छादित परिसर आहे, तेथे पाऊस चांगला पडतो आणि पर्यावरण चांगले राहते. त्यामुळे जिल्ह्यात लोकसहभागाने अधिकाधिक संख्येने वृक्षारोपण करुन जिल्हा हिरवागार करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.राज्यातील वनआच्छादन वाढविण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या ५० कोटी वृक्षलागवड मोहिमेत यावर्षी राज्यभरात १३ कोटी वृक्षलागवड केली जाणार आहे. या वृक्षलागवड मोहिमेचा जिल्ह्यातील शुभारंभ पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळा येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आदर्श गाव समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपवनसंरक्षक एम. आदर्श रेड्डी, विभागीय वनाधिकारी कीर्ति जमदाडे-कोकाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, विश्वनाथ कोरडे, राजेंद्र कोरडे, वसंतराव चेडे, तहसीलदार भारती सागरे, तहसीलदार विशाल तनपुरे, सरपंच छाया शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती. मुख्य कार्यक्रमानंतर टाकळी ढोकेश्वर शिवार आणि धोत्रे शिवारातही पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनीही प्रा. शिंदे यांच्यासह सावताळा वनक्षेत्रावर वृक्षारोपण केले.पालकमंत्री म्हणाले, १ ते ३१ जुलै या कालावधीत होणाऱ्या वृक्षलागवड मोहिमेचे नियोजन वर्षभरापासून सुरु आहे. जिल्ह्यातही ४९ लाख ९४ हजार रोपांची लागवड होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. राज्याचे वन आच्छादन वाढविण्यासाठी वृक्षलागवडीचा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.प्रत्येक गावालगतचे मोकळे डोंगर, टेकड्या, परिसर हिरवागार करावा आणि पर्यावरण रक्षणासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.पवार म्हणाले, वनव्यवस्थापन समित्यांमार्फत राज्यात चांगले काम होत आहे. त्यातही आपला अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. जलसंधारण कामे चांगल्या प्रमाणात झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियान ही आपल्या राज्याने देशाला दिलेली देणगी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्यातील उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, ग्रामपंचायत आणि इतर शासकीय यंत्रणा वृक्षलागवड करण्याचे नियोजन या मोहिमेत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना, शाळा-महाविद्यालये, विविध औद्योगिक आस्थापना, व्यापारी संस्था, असोसिएशन्स यांनीही शासनाच्या या कामात लोकसहभाग दिला आहे. विविध ठिकाणी त्यांच्या वतीनेही वृक्षलागवड मोहिम राबविण्यात येणार, असे रेड्डी यांनी सांगितले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदे