शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

शेतक-यांचे समाधान हेच प्रमुख उद्दिष्ट; जिल्हाधिकारी द्विवेदी यांचा नववर्ष संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:01 IST

केंद्र शासनाने जाहीर केलेली पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारची कर्जमुक्ती योजना अधिकाधिक शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याला प्राधान्य  दिले जाईल. याशिवाय या वर्षात आपले शहर, गाव स्वच्छ ठेवण्याचा संकल्प प्रत्येकाने केला तर स्वच्छता मोहीम आपसूक यशस्वी होईल, अशा शब्दांत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आपला नववर्षांचा संकल्प ‘लोकमत’कडे बोलून दाखवला.

संडे स्पेशल मुलाखत / चंद्रकांत शेळके । अहमदनगर : नववर्षात संकल्प तर अनेक गोष्टींचा आहे, परंतु त्यातील काही गोष्टी प्राधान्याने करता येण्यासारख्या आहेत. केंद्र शासनाने जाहीर केलेली पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारची कर्जमुक्ती योजना अधिकाधिक शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याला प्राधान्य  दिले जाईल. याशिवाय या वर्षात आपले शहर, गाव स्वच्छ ठेवण्याचा संकल्प प्रत्येकाने केला तर स्वच्छता मोहीम आपसूक यशस्वी होईल, अशा शब्दांत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आपला नववर्षांचा संकल्प ‘लोकमत’कडे बोलून दाखवला.नववर्षात कोणत्या कामांना प्राधान्य असेल?केंद्र शासनाने मागील वर्षीपासून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी ६ हजार रूपये तीन हप्प्यांत शेतक-यांच्या मिळणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेसाठी सर्वाधिक सुमारे साडेपाच लाख शेतकरी नगर जिल्ह्यात आहेत. प्रारंभीचा पहिला, दुसरा हप्ता काही शेतक-यांना मिळाला आहे. परंतु अजूनही यातील ५० टक्के शेतकºयांचे आधार लिंकिंग झालेले नाही. त्यामुळे महिनाभरात हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कोणत्याही परिस्थितीत सर्वच्या सर्व पात्र शेतक-यांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. शेतक-यांच्या दृष्टीने दुसरी महत्त्वपूर्ण कर्जमुक्ती योजना राज्य सरकारने जाहीर केलेली आहे. यामध्ये २ लाख रूपयांपर्यंतचे पीककर्ज माफ होणार आहे. या दोन्ही योजनांचे लाभ अधिकाधिक शेतक-यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची यंत्रणा काम करेल. नव्या प्रशासकीय इमारतीत प्रवेश?नव्या प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून हे काम लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे या वर्षातच नवीन इमारतीत कारभार सुरू होईल. उड्डाणपूल, बाह्वळण रस्ता, महामार्गांची दुरूस्ती  अशी कामेही वर्षभराच्या काळात मार्गी लागतील. वर्षभरात जिल्ह्यात उपलब्ध पाण्याचे नियोजन कसे असेल?जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला पडलेला आहे. परिणामी पाणीपातळीत वाढ झाली. सर्व धरणेही भरलेली आहेत. त्यामुळे किमान मार्चपर्यंत तरी पाणी टंचाई जाणवण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. तेथून पुढे एप्रिल, मे मध्ये जिल्ह्तील पठार भागात टंचाई जाणवू शकते. तेथे तातडीने टँकरने पाणी उपलब्ध केले जाईल. एकूणच मागील वर्षीइतकी तीव्र टंचाईची तीव्रता यंदा असणार नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे शक्य आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollectorजिल्हाधिकारीinterviewमुलाखतNew Yearनववर्ष