शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

महात्मा गांधी पुण्यतिथी विशेष : अध्ययन केंद्रातून विचारांची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:11 IST

जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यांनी मांडलेले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक थरांतून प्रयत्न झाले.

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यांनी मांडलेले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक थरांतून प्रयत्न झाले. अनेक विद्यापीठांत गांधी विचारांचा अभ्यासक्रम सुरू आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानेही अनेक महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम सुरू केला. येथील अहमदनगर महाविद्यालयात गेल्या दहा वर्षांपासून गांधी अध्ययन केंद्र सुरू आहे. या केंद्राच्या माध्यमातून गांधी विचारांची नव्या पिढीमध्ये पेरणी होत आहे.अहिंसा, शांती, ग्रामस्वराज्य, ग्रामोद्योग, साधी राहणी, पर्यावरणरक्षण, आरोग्य, सर्वधर्म समभाव असे त्यांचे एक ना अनेक विचार आजच्या बदलत्या काळात सुसंगत असल्याचे दिसून येते. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राचे माजी प्रमुख बराक ओबामा हे सुद्धा गांधीजींना त्यांचे आदर्श मानतात. यातूनच गांधी विचाराची व्याप्ती स्पष्ट होते. अशा गांधी विचारांची पेरणी अध्ययन केंद्राच्या माध्यमातून होत आहे. प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक प्रा. डॉ. सुनील कवडे, संशोधन सहायक प्रा. फिरोज शेख हे या केंद्राचे कामकाज पाहत आहेत.विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सन २००९मध्ये अहमदनगर महाविद्यालयात गांधी अध्ययन केंद्राला मान्यता दिली. गांधी विचारांचा प्रचार-प्रसार करणे या मुख्य उद्देशाने सुरू झालेल्या या केंद्रात सध्या ‘सर्टिफिकेट कोर्स इन गांधीयन स्टडिज्’ हा अभ्यासक्रम शिकविला जातो. गांधीवादी विचारवंतांची व्याख्याने, चर्चासत्र, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे गांधीविचार समाजात प्रसूत करण्याचे काम येथे सुरू आहे. यूजीसी दरवर्षी या केंद्रासाठी निधी देते. आतापर्यंत गेल्या आठ वर्षांत १८ लाखांचा निधी मिळालेला आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून निधी रखडल्याने महाविद्यालयीन स्तरावरच खर्च भागवला जात आहे. केंद्राने जिल्ह्यातील डिग्रस, जखणगाव, सोनेवाडी, गणेशवाडी, माळीचिंचोरे या शाळा दत्तक घेतल्या असून तेथील विद्यार्थ्यांना गांधी विचारांचे धडे दिले जातात. याशिवाय केंद्रात आतापर्यंत १५० पेक्षा जास्त व्याख्याने, चर्चासत्र झाली आहेत. प्रत्येक महिलादिनी समाजातील वंचित महिलांचा सन्मान केंद्राकडून केला जातो. जालना येथील गांधी विचार शिबिरात दरवर्षी येथील केंद्रातील विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. केंद्रामार्फत स्वच्छता अभियान, संविधान जागृतीसाठी प्रभातफेरी असे अनेक उपक्रम राबवले जातात.‘तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नाही, तर विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेले आहे.सोन्या-चांदीचे तुकडे नव्हे, तर आरोग्य हीच खरी संपत्ती. भीती तुमच्या शरीराचा रोग आहे. तो तुमच्या आत्म्याला मारतो. त्या स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही, ज्यात चूक करण्याचे स्वातंत्र्य नाही. महात्मा गांधीजींच्या अशा एक ना अनेक विचारांनी तरूण भारावलेले आहेत. आमच्या अभ्यास केंद्रातून असेच विचार समाजात पोहोचवण्याचे काम सुरू आहे. - प्रा. डॉ. सुनील कवडे, संचालक, गांधी अध्ययन केंद

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर