शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी पुण्यतिथी विशेष : अध्ययन केंद्रातून विचारांची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:11 IST

जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यांनी मांडलेले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक थरांतून प्रयत्न झाले.

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यांनी मांडलेले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक थरांतून प्रयत्न झाले. अनेक विद्यापीठांत गांधी विचारांचा अभ्यासक्रम सुरू आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानेही अनेक महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम सुरू केला. येथील अहमदनगर महाविद्यालयात गेल्या दहा वर्षांपासून गांधी अध्ययन केंद्र सुरू आहे. या केंद्राच्या माध्यमातून गांधी विचारांची नव्या पिढीमध्ये पेरणी होत आहे.अहिंसा, शांती, ग्रामस्वराज्य, ग्रामोद्योग, साधी राहणी, पर्यावरणरक्षण, आरोग्य, सर्वधर्म समभाव असे त्यांचे एक ना अनेक विचार आजच्या बदलत्या काळात सुसंगत असल्याचे दिसून येते. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राचे माजी प्रमुख बराक ओबामा हे सुद्धा गांधीजींना त्यांचे आदर्श मानतात. यातूनच गांधी विचाराची व्याप्ती स्पष्ट होते. अशा गांधी विचारांची पेरणी अध्ययन केंद्राच्या माध्यमातून होत आहे. प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक प्रा. डॉ. सुनील कवडे, संशोधन सहायक प्रा. फिरोज शेख हे या केंद्राचे कामकाज पाहत आहेत.विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सन २००९मध्ये अहमदनगर महाविद्यालयात गांधी अध्ययन केंद्राला मान्यता दिली. गांधी विचारांचा प्रचार-प्रसार करणे या मुख्य उद्देशाने सुरू झालेल्या या केंद्रात सध्या ‘सर्टिफिकेट कोर्स इन गांधीयन स्टडिज्’ हा अभ्यासक्रम शिकविला जातो. गांधीवादी विचारवंतांची व्याख्याने, चर्चासत्र, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे गांधीविचार समाजात प्रसूत करण्याचे काम येथे सुरू आहे. यूजीसी दरवर्षी या केंद्रासाठी निधी देते. आतापर्यंत गेल्या आठ वर्षांत १८ लाखांचा निधी मिळालेला आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून निधी रखडल्याने महाविद्यालयीन स्तरावरच खर्च भागवला जात आहे. केंद्राने जिल्ह्यातील डिग्रस, जखणगाव, सोनेवाडी, गणेशवाडी, माळीचिंचोरे या शाळा दत्तक घेतल्या असून तेथील विद्यार्थ्यांना गांधी विचारांचे धडे दिले जातात. याशिवाय केंद्रात आतापर्यंत १५० पेक्षा जास्त व्याख्याने, चर्चासत्र झाली आहेत. प्रत्येक महिलादिनी समाजातील वंचित महिलांचा सन्मान केंद्राकडून केला जातो. जालना येथील गांधी विचार शिबिरात दरवर्षी येथील केंद्रातील विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. केंद्रामार्फत स्वच्छता अभियान, संविधान जागृतीसाठी प्रभातफेरी असे अनेक उपक्रम राबवले जातात.‘तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नाही, तर विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेले आहे.सोन्या-चांदीचे तुकडे नव्हे, तर आरोग्य हीच खरी संपत्ती. भीती तुमच्या शरीराचा रोग आहे. तो तुमच्या आत्म्याला मारतो. त्या स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही, ज्यात चूक करण्याचे स्वातंत्र्य नाही. महात्मा गांधीजींच्या अशा एक ना अनेक विचारांनी तरूण भारावलेले आहेत. आमच्या अभ्यास केंद्रातून असेच विचार समाजात पोहोचवण्याचे काम सुरू आहे. - प्रा. डॉ. सुनील कवडे, संचालक, गांधी अध्ययन केंद

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर