शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

नगरला गाळपासोबतच वाढला साखर उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 20:18 IST

अहमदनगर जिल्ह्यात ऊस गाळपाचे प्रमाण वाढत असतानाच साखरेच्या उता-यातही वाढ होऊ लागली आहे. या हंगामात उतारा वाढल्यास त्यानुसार पुढील हंगामात ऊस उत्पादकांना उता-याच्या प्रमाणात जादा दराने एफ. आर. पी. ची रक्कम मिळू शकणार आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : २०१७-१८ ऊस गळीत हंगामातील साडेतीन महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात ऊस गाळपाचे प्रमाण वाढत असतानाच साखरेच्या उता-यातही वाढ होऊ लागली आहे. या हंगामात उतारा वाढल्यास त्यानुसार पुढील हंगामात ऊस उत्पादकांना उता-याच्या प्रमाणात जादा दराने एफ. आर. पी. ची रक्कम मिळू शकणार आहे.१ नोव्हेंबरपासून यंदा राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला. १५ नोव्हेंबरपर्यंत साखर आयुक्तालयाच्या अहमदनगर उपप्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील १३ सहकारी व ८ खासगी अशा २१ कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.६३ टक्के होता. १८ डिसेंबरला २४ कारखाने सुरू असताना ३९.९५ मेट्रिक टन ऊस गाळप होऊन ९.३३ टक्के सरासरी उतारा निघाला. ९ जानेवारीस २६ कारखान्यातून ६१.८० लाख मेट्रिक टन ऊस गाळप होऊन ९.८३ टक्के एवढा सरासरी उतारा निघाला. १३ फेब्रुवारीअखेर २२ कारखाने सुरू असून ८७ लाख १२ हजार ५६७.५९ मेट्रिक टन ऊस गाळप होऊन ९० लाख ८७ हजार ७५५ क्विंटल साखरेचे उत्पादन होऊन १०.४३ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला आहे. या हंगामातील हा सर्वोच्च साखर उतारा गणला जातो.

गाळपात अंबालिका, ज्ञानेश्वर, विखेची आघाडी

अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी कारखान्यांमध्ये भेंडा येथील ज्ञानेश्वर कारखान्याने आघाडी घेतली आहे. १३ फेब्रुवारीअखेर या कारखान्याने ७ लाख ९ हजार ९०० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख ५९ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून १०.७ टक्के सरासरी उतारा मिळाला आहे. खासगी अंबालिका कारखान्याने खासगी व सहकारी अशा सर्वच कारखान्यांमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक १० लाख ६३ हजार ३१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ११ लाख ९१ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन करताना ११.२ टक्के उतारा मिळविला आहे. उताºयामध्ये प्रवरानगरच्या पद्मश्री विखे कारखान्याने ११.१२ टक्के सरासरी उतारा मिळवित उताºयात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. १३ फेब्रुवारीअखेर अहमदनगर जिल्ह्यातील ८ खासगी व १४ सहकारी अशा एकूण २२ साखर कारखान्यांमधून ८७ लाख १२ हजार ५६७.५० मेट्रिक टन ऊस गाळप होऊन ९० लाख ८७ हजार ७५५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने